शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

‘सेंद्रीय शेती’ देईल शेतकºयांना आर्थिक समृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:42 IST

धान उत्पादक असलेल्या गोंदिया जिल्ह्यात रासायनिक खतांचा वापर करून उत्पादन केलेल्या तांदळाला ३ हजार रूपये क्विंटल भाव आहे. परंतु याच जिल्ह्यात सेंद्रीय खतांच्या माध्यमातून पिकविलेल्या तांदळाला सरळ दुप्पट म्हणजे ६ हजार रूपये क्विंटल भाव देण्याची तयारी ग्राहकांची आहे.

ठळक मुद्दे६ हजार रूपये मिळेल दर : सेंद्रीय शेतमालाला ग्राहकांची पसंती

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धान उत्पादक असलेल्या गोंदिया जिल्ह्यात रासायनिक खतांचा वापर करून उत्पादन केलेल्या तांदळाला ३ हजार रूपये क्विंटल भाव आहे. परंतु याच जिल्ह्यात सेंद्रीय खतांच्या माध्यमातून पिकविलेल्या तांदळाला सरळ दुप्पट म्हणजे ६ हजार रूपये क्विंटल भाव देण्याची तयारी ग्राहकांची आहे. शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही अशी ओरड करण्यापेक्षा सेंद्रीय शेतीची कास धरून आपली आर्थिक समृध्दी गाठण्याची संधी मिळाली आहे. शेतकºयांना आर्थिक संपन्नतेसाठी सेंद्रीय शेतीकडे वळावे लागेल.अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी जमिनीची पोत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या माध्यमातून पिकविलेले अन्न सेवन केल्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. रासायनिक खतातून पिकविलेल्या अन्नामुळे विविध आजाराला सामोरे जावे लागत आहे. परंतु सेंद्रिय शेतीतून पिकविलेले अन्न आरोग्यासाठी लाभदायक असल्यामुळे सेंद्रीय खतातून पिकविलेल्या तांदळाकडे आता अनेकांचा कल वाढला आहे. त्यामुळे सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता आर्थिक समृध्दीचा मार्ग गवसला आहे. शेतकऱ्यांच्या धानाला १५०० रूपये क्विंटल भाव आहे. त्या धानापासून शेतकऱ्यांनी भरडाई करून तांदूळ तयार केल्यास त्या तांदळाला बाजारात ३ हजार रूपये क्विंटल भाव मिळतो. परंतु सेंद्रीय शेतीतून पिकविलेल्या तांदळाला प्रती क्विंटल ६ हजार रूपये आहे.यंदा कमी पाऊस झाल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन झाले नाही. मात्र यानंतर ५०० क्विंटल सेंद्रीय तांदूळ विक्रीसाठी तयार करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने सेंद्रीय शेती संदर्भात केलेल्या जनजागृतीमुळे आता सेंद्रीय तांदळाची मागणी वाढली आहे.प्रकल्प संचालक आणि आत्मा गोंदिया अंतर्गत परंपरागत कृषि विकास योजना सेंद्रीय शेती सन २०१६-१७ मध्ये गोंदिया जिल्ह्यात २० शेतकरी गट स्थापन केले. या २० गटांमध्ये हजारो शेतकºयांचा समावेश आहे.सेंद्रीय पध्दतीने तांदळाचे उत्पादन घेत आहेत. या गटांना आत्मा अंतर्गत प्रशिक्षण, शेतकरी सहल, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सेंद्रीय कीटकनाशके, बुरशी नाशके, आणि सेंद्रीय खते यांचे युनिट उभारण्याकरीता साहित्य, उपकरणे, व प्रशिक्षण दिले जात आहे.५१ गटांमध्ये २५०० शेतकरीसेंद्रीय शेती करणारे शेतकºयांचे गट तयार करण्यात आले. आधीचे शेतकऱ्यांचे २० गट तयार करण्यात आले आहेत. सेंद्रीय शेतीवर भर देण्यासाठी पुन्हा जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांनी ३१ गट तयार करण्यास सांगितले. जिल्ह्यात सेंद्रीय शेती करणारे ५१ गटात आजघडीला २ हजार ५०० शेतकऱ्यांचा समावेश आहे.फसवणूक होणार नाही म्हणून सबळ यंत्रणासेंद्रीय शेतीतून पिकविलेल्या तांदूळाला रासायनिक खातातून पिकविलेल्या तांदळाच्या तुलनेत दुप्पट किंमत मिळत आहे. दोन्ही प्रकारचे तांदूळ समोरा-समोर ठेवले तर कोणते तांदूळ सेंद्रीय आहे हे ओळखता येत नाही. त्यामुळे सेंद्रीय शेतीच्या नावावर फसवणुक होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून सबळ यंत्रणा उभी केली.५० हजार एकरात होऊ शकते सेंद्रीय शेतीसेंद्रीय शेतीसाठी पशूधनाची मोठ्या प्रमाणात गरज असते.जिल्ह्यात सध्यास्थितीत २ लाख जनावरे असल्याने या जनावरांपासून मिळणाºया शेणापासून सेंद्रीय खत तयार होऊ शकतो. जिल्ह्यातील ५० हजार एकरवर सेंद्रीय शेती करू शकतो एवढे पशूधन उपलब्ध आहे.