शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

रानभाज्या खा अन्‌ निरोगी राहा....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:32 IST

गोंदिया : आधुनिकतेकडे वाटचाल करीत असताना मानवी आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आजघडीला पारंपरिक आणि दुर्मिळ रानभाज्या दैनंदिन आहारामध्ये सेवन ...

गोंदिया : आधुनिकतेकडे वाटचाल करीत असताना मानवी आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आजघडीला पारंपरिक आणि दुर्मिळ रानभाज्या दैनंदिन आहारामध्ये सेवन करण्याची गरज आहे. विविध औषधी रानभाज्या व वनउपज अन्न मानवी आरोग्यास उपयुक्त आहेत. रानभाज्या सेवनामुळे मानवी शरीर सशक्त होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते. गोंदिया जिल्ह्यात आजघडीला ४० प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येतात. रानभाज्या पावसाळ्याच्या सुरुवातीला आढळून येतात. औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. पातूर भाजी, उंदीरकानी, करांदे,वडघर, कडूकंद, कोणताही अळू, तांदूळजा, काटेमाठ कुडा, काकडा, कोरडा, कुर्डू, घोळ कवळा, लोथ, करटोली, वाघेडी, चिचुर्डी, पायार, मोह, कपाळफोडी, काकड, कुडा, शेवळ, उळशी,तरोटा,मोहफुल कुडाच्या शेंगा अशा रानभाज्या गोंदिया जिल्ह्यात आहेत.

..................

या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का?

कंदभाज्या- रानभाज्यांमध्ये कंदस्वरुपात असलेल्या भाज्यांमध्ये पातूर भाजी, उंदीरकानी, करांदे ,वडघर, कडूकंद, कोणताही अळू इत्यादी.

...............

हिरव्या भाज्या- तांदूळजा, काटेमाठ कुडा, काकडा, कोरडा, कुर्डू, घोळ कवळा, लोथ इत्यादी.

................

फळभाज्या- या फळभाज्यांमध्ये करटोली, वाघेडी, चिचुर्डी,पायार, मोह, कपाळफोडी, काकड इत्यादींचा समावेश आहे.

.................

फुलभाजी- रानभाज्यांत फुलं असलेल्या भाज्यांमध्ये कुडा,शेवळ, उळशी तसेच विदर्भातील तरोटा,मोहफुल कुडाच्या शेंगा यांचा समावेश आहे.

.......................

पावसाळा रानभाज्यांवर: गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात रानभाज्यांना पसंती आहे. महागडी भाजी बाजारातून घेण्यापेक्षा रानभाज्यांवरही आपले घर चालविले जाते. पावसाळ्यात रानभाज्या व परसबागेत लावलेल्या भाज्यांतून पावसाळा ग्रामीण लोक काढतात.

................

या रानभाज्या झाल्या गायब

तांदूळजा: या रानभाज्यांची संख्या अत्यंत कमी होऊ लागली आहे. दरवर्षी जंगलांना लागणाऱ्या आगी त्यामुळे वनस्पती व जंगले नष्ट होत आहेत. त्याचबरोबर भाज्याही नष्ट होत आहेत.

..........

घोळ कवळा: विशेषत: जंगलात तलावाच्या काठावर दिसणारी ही भाजी आताही गोंदिया जिल्ह्यात आहे; परंतु तिचीही संख्या कमी होत आहे.

...........

शक्तीवर्धक रानभाज्या

गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येतात. रानभाज्या पावसाळ्याच्या सुरुवातीला आढळून येत असतात. औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त रानभाज्या आहेत. या रानभाज्यांचे सेवन करणे हे शरीरासाठी शक्तीवर्धक आहे.

डॉ. श्रीराम भुस्कुटे, वनस्पती शास्त्र