शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
2
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
3
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
4
Munbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय महिलेसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
5
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
6
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
7
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
8
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
9
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
10
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
11
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
12
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
13
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
14
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
15
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
16
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
17
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
18
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
19
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
20
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?

चायनीज खाताय की पोटाच्या आजारांना निमंत्रण देताय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:32 IST

कपिल केकत गोंदिया : सध्या भारतीयांना भारतीय खाद्य पदार्थांपेक्षा चायनीज पदार्थांचा भारी चस्का लागला असून, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवड ...

कपिल केकत

गोंदिया : सध्या भारतीयांना भारतीय खाद्य पदार्थांपेक्षा चायनीज पदार्थांचा भारी चस्का लागला असून, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवड चायनीज फूड झाले आहे. हेच कारण आहे की, आजची तरूणाई चाटच्या ठेल्यांवर कमी व चायनीज ठेल्यांवर जास्त प्रमाणात उभी दिसते. हॉटेल्समध्येही भारतीय खाद्य पदार्थांची ऑर्डर सोडून चायनीज फूड्स मागविले जाते. मात्र, या चायनीज फूडमध्ये पदार्थ जास्त चविष्ट व्हावे, यासाठी चायनीज सॉल्टचा वापर केला जातो. या चायनीज सॉल्टलाच अजिनोमोटो व मोनो सोडियम ग्लूटामिट असे म्हटले जाते. पदार्थाची चव वाढविण्यासाठी वापरात येत असलेल्या अजिनोमोटोचा १ किलो पदार्थात १० ग्रामपेक्षाही कमी वापर एवढी मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. कारण अजिनोमोटोचे अधिक प्रमाणात सेवन करणे हे आरोग्यासाठी धोक्याचे आहे. अजिनोमोटोचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने एकतर मोटापा वाढतो. शिवाय, डोकेदुखी, अंगदुखी, हातापायांना झुनझुनी, घाम येणे, छातीत जळजळ, रक्तदाब वाढणे यांसारख्या समस्या उद्भवतात. फूड पॉईझनिंगचे प्रमाण जास्त असते. असे झाल्यास खूप पाणी प्यावे. जेणेकरून अजिनोमोटाे आपल्या शरीरात विरघळेल व निघून जाईल.

--------------------------------

काय आहे अजिनोमोटो ?

अजिनोमोटो म्हणजे चायनीज सॉल्ट असून, यालाच मोनो सोडियम ग्लुटामिट असेही म्हटले जाते. अजिनोमोटो हा चायनीज पदार्थांची चव वाढविण्यासाठी वापरला जातो व त्याची एक ठराविक मात्रा आहे. मात्र, जास्त प्रमाणात वापर होत असल्यास आरोग्यासाठी धोकादायक आहे.

---------------------------

म्हणून चायनीज खाणे टाळा

कोणत्याही पदार्थाचा अति वापर हा धोक्याचा असतो. चायनीज पदार्थांमध्ये चव वाढविण्यासाठी अजिनोमोटोचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. यामुळे एकतर फूड पॉईझनिंग होते. त्यानंतर अन्य आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच चायनीज पदार्थांपेक्षा आपले भारतीय पदार्थ खाणे केव्हाही चांगले आहे.

---------------------------

ताजे पदार्थ खा...

कोणत्याही पदार्थाचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक असतो. चायनीज पदार्थात अजिनोमोटोचा वापर होतोच. यामुळे चायनीज फूडपेक्षा आपले भारतीय ताजे तयार केलेले पदार्थ खावेत. भारतीय खाद्य पदार्थ शुध्द सात्विक असतात. त्यात अजिनोमोटोसारख्या पदार्थांचा वापर होत नाही.

- डॉ. विकास जैन

वरिष्ठ सर्जन, गोंदिया.