शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पुढच्या वर्षी लवकर या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:41 IST

मागील दहा ते बारा दिवस गणेशोत्सवामुळे मंगलमय आणि भक्तीमय वातावरण होते. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात आणि पुष्प वर्षाव करित ‘गणपती बाप्पा मोरया...’

ठळक मुद्देगणरायाला दिला निरोप : सकाळपासूनच गणपती विसर्जनाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दहा ते बारा दिवस गणेशोत्सवामुळे मंगलमय आणि भक्तीमय वातावरण होते. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात आणि पुष्प वर्षाव करित ‘गणपती बाप्पा मोरया...’ च्या जयघोषात पुढच्या वर्षी येण्याचे साकडे घालत सर्वांनी आपल्या लाडक्या बाप्पाला मंगळवारी (दि.५) निरोप दिला. विसर्जनाला सुरूवात झाल्याने शहरात सर्वत्र गणपतीच्या मिरवणुका दिसत होत्या.विघ्नहर्ता व मांगल्याच्या देवताच्या उत्सवाची परिसरासह लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांत ख्याती आहे. त्यात शहरातील गणपती उत्सवाची बात काही औरच आहे. येथील काही मोठ्या मंडळांकडून साजरा करण्यात येणारा उत्सव शहराची शानच आहे. त्यामुळे बाहेरगावहून भाविक शहरातील उत्सव बघण्यास येतात. २५ आॅगस्ट रोजी मोठ्या थाटात गणरायांची स्थापना करण्यात आली होती. गणपतीच्या उत्सवाचे हे दिवस नवचैतन्याचेच असतात. त्यामुळेच हे १२ दिवस भुर्रकन निघून गेले व अखेर दिवस उजाडला तो लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा. मंगळवारी सकाळपासूनच गणपती विसर्जनाला सुरूवात झाल्याचे चित्र होते. कुणी हातात, कुणी डोक्यावर, कुणी हातठेल्यांवर, कुणी रिक्शात तर कुणी चारचाकी वाहनांत गणरायांना घेऊन विसर्जनासाठी नदी व तलावांवर जात असल्याचे चित्र होते. यात गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणूका आकर्षणाचे केंद्रच होत्या. ढोलताशांवर नाचत गात तरूणाई गुलाल उधळत ‘गणपती बाप्पा मोरया... ’चा जयघोष करीत जात असल्याचे दिसून आले. मागल्यांचे देवता गणपती यंदा १२ दिवस आपल्या घरात विराजमान असल्याने त्यांना सहाजीकच भारी मनाने निरोप देण्यात आला. मात्र पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रणही बाप्पांना देण्यात आले.प्रथमच डिजेविना विसर्जनशासनाने डिजे वाजविण्यावर बंदी घातली आहे. नियमांचे पालन करुन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला शहरातील व जिल्ह्यातील गणेश मंडळांनी साथ देत डिजेचा वापर टाळीत ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून गणेश विसर्जन केले.मंगळवारी सर्वाधिक विसर्जनव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून मंडळांना विसर्जनासाठी दिवस वाटून देण्यात आले आहेत. त्यानुसार २ तारखेपासूनच विसर्जनाला सुरूवात झाली आहे. तर शेवटचे विसर्जन ९ तारखेला होणार असल्याचे दिसून येत आहे. यात मात्र मंगळवारी (दि.५) सर्वाधिक विसर्जन करण्यात आले. शहर पोलिसांनी ४८ मंडळांना तर रामनगर पोलिसांनी २० मंडळांना विसर्जनाच्या तारखा दिल्या होत्या. शिवाय हजारोंच्या संख्येत खाजगी गणपतींचे विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे, गणपती विसर्जनाच्या तारखांना घेऊन पोलीस विभागाकडून शेवटचा दिवस कोणता हे कळले नाही. तर रामनगर पोलिसांकडून ठरवून दिलेल्या तारखांबाबत संभ्रम होता.विसर्जनस्थळांवर गर्दीशहरातील पांगोली नदी छोटा गोंदिया- खमारी, सरकारी तलाव, साई मंदिर नाग तलाव, रजेगाव घाट, छोटा गोंदिया देवतलाव येथे मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते. त्यामुळे या विसर्जन स्थळांवर एकच गर्दी दिसून आली. शहरात हजारोंच्या संख्येत खाजगी गणपतींची स्थापना केली जात असल्याने त्यात सार्वजनिक मंडळांची भर पडत असल्याने विसर्जन स्थळांवर भाविकांची एकच गर्दी दिसून आली.शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्तविसर्जनाला सुरूवात झाली असून सुरक्षा व व्यवस्थेच्या दृष्टीने शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. बंदोबस्तांतर्गत चौकाचौकांत पोलीस कर्मचाºयांची ड्यूटी लावण्यात आली होती. यासह वाहतूक पोलीसही त्यांच्या सोबत होते. तसेच विसर्जन स्थळांवरही पोलिसांसह होमगार्डचा बंदोबस्त होता. याशिवाय पेट्रोलींग पथक व पोलीस निरीक्षकांचे पथक सुद्धा नजर ठेऊन होते.