शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

ई-पीक नोंदणी करणे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:34 IST

केशोरी : शासनाच्या कृषी विभागाने नैैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, या चांगल्या उद्देशाकरिता ई-पीक पाहणी ...

केशोरी : शासनाच्या कृषी विभागाने नैैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, या चांगल्या उद्देशाकरिता ई-पीक पाहणी ॲप निर्माण करून कार्यान्वित केले. मात्र, ई-पीक पाहणी नोंद करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असून, या ॲपची हाताळणी करणे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

ई-पीक पेरा नोंदणीपासून शेतकरी वंचित राहू नये यासाठी शासनाने तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक या शासकीय यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांची ई-पीक पेरा नोंदणी करण्याचे कार्य करण्यात यावे, अशी मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत घाटबांधे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास योग्य पद्धतीने नुकसानभरपाई मिळावी म्हणून शासनाच्या कृषी विभागाने यावर्षीपासून पहिल्यांदाच ई-पीक पेरा पाहणी ॲप निर्माण करून कार्यान्वित केले आहे. ई-पीक पेरा नोंदणी करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांकडे दिली आहे. खरीप हंगामात आणि रब्बी हंगामात विविध प्रकारची पिके शेतकरी घेत असतात. ई-पीक पेरा ॲपच्या माध्यमातून कोणत्या रकान्यात कोणती माहिती भरावी, त्याचे पीक क्षेत्र कसे भरावे, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहेत. चुकीची माहिती भरली गेली तर नुकसान होण्याच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. योजना शेतकऱ्यांच्या हिताची असली तरीही माहिती भरताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कधी सर्व्हर मंदगतीने चालते, कधी कव्हरेज राहात नाही, इत्यादी बाबींमुळे सदर ॲपमध्ये माहिती अपलोड करताना शेतकऱ्यांचा मनस्ताप वाढत आहे. भरलेली माहिती योग्य व बरोबर असल्याची खातरजमा होण्याचा पर्याय नसल्यामुळे नुकसान तर होणार नाही, अशा भीतीमुळे अनेक शेतकरी या ॲपमध्ये माहिती भरण्यासाठी वंचित राहिली आहेत.

.......

३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

शासनाने या ॲपवर माहिती भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत दिली आहे. अधिकतम शेतकऱ्यांजवळ स्मार्ट फोन उपलब्ध नाही. खासगी लोकांजवळ स्मार्ट फोन आहे. ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई-पीक नोंदणी करण्यास तयार नाहीत. त्यामुळे शासनाने गावातील तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांच्या शासकीय यंत्रणेमार्फत ई-पीक नोंदणी करण्याची मागणी युवक राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत घाटबांधे यांनी तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.