शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
3
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
4
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
5
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
6
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
7
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
8
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
9
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
10
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
12
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
13
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
14
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
15
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
16
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
17
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
18
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
19
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
20
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!

ई-पीक नोंदणी करणे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:34 IST

केशोरी : शासनाच्या कृषी विभागाने नैैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, या चांगल्या उद्देशाकरिता ई-पीक पाहणी ...

केशोरी : शासनाच्या कृषी विभागाने नैैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, या चांगल्या उद्देशाकरिता ई-पीक पाहणी ॲप निर्माण करून कार्यान्वित केले. मात्र, ई-पीक पाहणी नोंद करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असून, या ॲपची हाताळणी करणे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

ई-पीक पेरा नोंदणीपासून शेतकरी वंचित राहू नये यासाठी शासनाने तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक या शासकीय यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांची ई-पीक पेरा नोंदणी करण्याचे कार्य करण्यात यावे, अशी मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत घाटबांधे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास योग्य पद्धतीने नुकसानभरपाई मिळावी म्हणून शासनाच्या कृषी विभागाने यावर्षीपासून पहिल्यांदाच ई-पीक पेरा पाहणी ॲप निर्माण करून कार्यान्वित केले आहे. ई-पीक पेरा नोंदणी करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांकडे दिली आहे. खरीप हंगामात आणि रब्बी हंगामात विविध प्रकारची पिके शेतकरी घेत असतात. ई-पीक पेरा ॲपच्या माध्यमातून कोणत्या रकान्यात कोणती माहिती भरावी, त्याचे पीक क्षेत्र कसे भरावे, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहेत. चुकीची माहिती भरली गेली तर नुकसान होण्याच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. योजना शेतकऱ्यांच्या हिताची असली तरीही माहिती भरताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कधी सर्व्हर मंदगतीने चालते, कधी कव्हरेज राहात नाही, इत्यादी बाबींमुळे सदर ॲपमध्ये माहिती अपलोड करताना शेतकऱ्यांचा मनस्ताप वाढत आहे. भरलेली माहिती योग्य व बरोबर असल्याची खातरजमा होण्याचा पर्याय नसल्यामुळे नुकसान तर होणार नाही, अशा भीतीमुळे अनेक शेतकरी या ॲपमध्ये माहिती भरण्यासाठी वंचित राहिली आहेत.

.......

३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

शासनाने या ॲपवर माहिती भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत दिली आहे. अधिकतम शेतकऱ्यांजवळ स्मार्ट फोन उपलब्ध नाही. खासगी लोकांजवळ स्मार्ट फोन आहे. ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई-पीक नोंदणी करण्यास तयार नाहीत. त्यामुळे शासनाने गावातील तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांच्या शासकीय यंत्रणेमार्फत ई-पीक नोंदणी करण्याची मागणी युवक राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत घाटबांधे यांनी तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.