शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

खोलीकरण व वेस्टवेअर बांधकामात गैरप्रकार

By admin | Updated: July 11, 2017 00:46 IST

सुरगाव-चापटी येथील माजी मालगुजारी तलावातील गाळ काढून खोलीकरण करणे व वेस्टवेअरच्या पाळीचे बांधकाम नियमांना डावलून होत आहे.

गावकऱ्यांनी बंद पाडले काम : जि.प.सदस्यांची चौकशीची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : सुरगाव-चापटी येथील माजी मालगुजारी तलावातील गाळ काढून खोलीकरण करणे व वेस्टवेअरच्या पाळीचे बांधकाम नियमांना डावलून होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी हे काम बंद पाडले. तर या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हा परिषद सदस्य गिरीष पालीवाल यांनी या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सुरगाव-चापटी येथील दोनशे एकराच्या परिसरात व्यापलेला मोठा माजी मालगुजार तलाव आहे. सदर तलावापासून चापटी येथील समस्त शेतकऱ्यांच्या २५० ते ३०० एकर शेतजमिनीला बारमाही ओलिताची सोय होते. लघु पाटबंधारे उपविभागाच्यावतीने तलावाच्या दुरुस्तीचे काम वेळोवेळी करण्यात येते. तलावाचा वेस्टवेअर जमिनीच्या स्तरापासून ५ फूट उंच असल्याचे गावातील शेतकऱ्यांचे म्हणने आहे. ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत सदर तलावाचे खोलीकरण करुन गाळ काढणे व वेस्टवेअर तसेच तुकूमाचे नव्याने बांधकाम करण्याचे काम ई-टेंडर पद्धतीने एका कंत्राटदाराला दिल्याचे सांगण्यात आले. खोलीकरण करताना निघालेला गाळ तलावाच्या पोटात न टाकता तलावाच्या पाळीच्या मागच्या बाजूला टाकण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा गाळ तलावाच्या आतमध्येच टाकण्यात आल्याचे प्रत्यक्षात पाहणी दरम्यान दिसून येत आहे. तलावाचे पाणी लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी पाळीच्या शेवटच्या दोन्ही बाजूला दोन तुकूम असताना, संबंधित कंत्राटदाराने मधोमध पाळ फोडून पाणी जाण्याचा मार्ग बनविण्याचा प्रयत्न केला. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्या कामाला विरोध झाल्याने अर्धवट फोडलेली पाळ पुन्हा बांधण्याचा प्रकार कंत्राटदाराने केला. कंत्राटदाराच्या मनमर्जी कामाला लगाम घालण्याचे काम संबंधित अधिकारी करु शकले नाही. जे पूर्वीचे दोन तुकूम होेते, तेच कायम ठेवून डागडुजी करुन नवीनीकरण केल्याचा प्रताप झाल्याचे दिसून येत आहे. तलावाचा वेस्टवेअरची पूर्वीची उंची ५ फूट होती. नव्याने बांधण्यात येत असलेला वेस्टवेअर जमिनीच्या समतल आहे. तो ३ फूट उंचीचा करावा, असा आग्रह गावातील शेतकऱ्यांनी केला. परंतु कंत्राटदार उंची वाढविण्यास तयार न झाल्याने अखेर गावकऱ्यांनी वेस्टवेअर बांधकामच बंद पाडले . तलाव खोलीकरण व वेस्टवेअरच्या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी उपविभागीय अभियंता घरतकर यांची गुरुवारी प्रत्यक्ष भेट घेऊन चापटी येथील शेतकऱ्यांनी केली. मात्र संबंधितांनी तात्काळ दखल न घेतल्याने गावकऱ्यांनीच तीव्र भूमिका घेऊन काम बंद पाडले.पालीवाल यांनी केली पाहणी जि.प.सदस्य गिरीष पालीवाल यांच्या क्षेत्रातील चापटी हे गाव असल्याने गावकऱ्यांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. यावर त्यांनी गावकऱ्यांसह झालेल्या कामाचे निरीक्षण केले. याप्रसंगी तलावातून काढलेला गाळ तलावाच्या पोटात जमा असलेला दिसला. वेस्टवेअर जमिनीलगत बांधकाम झाल्याचे दिसले. सदर बांधकाम संशयास्पद असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना कामासंबंधी जाब विचारुन तलाव खोलीकरण व वेस्टवेअर बांधकामाची योग्य चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.