शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

डुंडा येथील महिलांची पाण्यासाठी भटंकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:25 IST

अद्याप कडक उन्हाळ्याला सुरूवात झालेली नाही. मात्र पाणी टंचाईची ओरड सुरु झाली आहे.

ठळक मुद्देगावातील विहिरी पडल्या कोरड्या : बोअरवेलने गाठला तळ

लालसिंह चंदेल ।आॅनलाईन लोकमतपांढरी : अद्याप कडक उन्हाळ्याला सुरूवात झालेली नाही. मात्र पाणी टंचाईची ओरड सुरु झाली आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील डुंडा येथील महिलांना फेब्रुवारी महिन्यातच सकाळपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यात काय स्थिती राहील याची कल्पना न केलेली बरी असेच चित्र या परिसरात आहे.ग्राम डुंडा येथे ग्रा. पं. कार्यालयाच्या माध्यमातून आठ बोअरवेल व दोन शासकीय विहिरी आहेत. एक नळ योजना असे पाण्याचे स्त्रोत आहेत. खाजगी विहिरींची पाण्याची पातळी खोल गेल्याने गावकºयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावात नळ योजना असून विद्युत बिल थकीत असल्याने व पाण्याचे मोटार पंप जळाल्यामुळे मागील वर्षभरापासून पाणी पुरवठा बंद आहे. पंचायत विभागाने ग्रा.पं.कार्यालयाला अर्धे पाण्याचे बिल भरण्याची सवलत दिली. मात्र यानंतरही नळ योजना बंद असल्याची माहिती आहे. परिणामी गावातील महिलांना सकाळपासूनच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत. तर गावकरी सायकल व बैलबंडीचा आधार घेत दूरवरुन पाणी आणत असल्याचे चित्र आहे. भूजल पातळी खोल गेल्याने बोअरवेलला देखील पाणी येत नाही. त्यामुळे महिलांना दूरवरुन पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. डुंडा येथील पाणी टंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाय योजना करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे. ग्रामपंचायतच्या सामान्य फंडामध्ये दोन ते तीन लाख रुपये जमा असल्याची माहिती आहे. त्याचा उपयोग मागील सरपंचानी व विद्यमान सरपंचानी केलेला नाही. त्यामुळे हा निधी खर्चाविना परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी गावातील बंद असलेली नळ योजना सुरू करण्याची मागणी आहे.पाणी पुरवठा समितीमध्ये दोन ते तीन लाख रुपये जमा असून समितीमार्फत ठराव घेऊन व नळ योजनेची दुरुस्ती करुन पाणी पुरवठा सुरू करता येते.-शरद चिमनकरसचिव, ग्रा.पं.कार्यालय डुंडा