शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

विमुक्त भटक्या जमातीचा धडक मोर्चा

By admin | Updated: February 24, 2016 01:43 IST

भारतीय राज्यघटनेचे महान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून समता व सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी गोंदिया जिल्ह्यातील ....

संघर्ष वाहिनी : सातही तहसीलवर धडकगोंदिया : भारतीय राज्यघटनेचे महान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून समता व सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी गोंदिया जिल्ह्यातील ८ व भंडारा जिल्ह्यातील ७ अशा एकूण १५ तहसील कार्यालयांवर एकाच दिवशी दि.२९ ला विमुक्त भटक्या जमातीचा मोर्चा धडकणार आहे. संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषद नागपूर या सामाजिक संस्थेच्या आवाहनानुसार महत्वपूर्ण मागण्यांसाठी प्रत्येक तालुकास्तरावर मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील या मोर्च्यानंतर महाराष्ट्रातील इतर दोन-दोन जिल्ह्यात क्रमाक्रमाने सदर मोर्चे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी धडकणार असल्याची माहिती संघर्ष वाहिणीचे प्रमुख दिनानाथ वाघमारे आणि सहकाऱ्यांनी दिली आहे. विमुक्त भटक्या जमातींना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगर पालिका यामध्ये ११ टक्के स्वतंत्र आरक्षण द्या, क्रिमिलेअरची जाचक अट रद्द करा, राज्याच्या अर्थसंकल्पात विमुक्त भटक्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विशेष आर्थिक तरतूद करा, अनुसूचित जाती-जमातीच्या धर्तीवर व्हीजे-एनटीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुका व जिल्हास्तरावर वसतीगृह तयार करावे, भूमिहिनांना पडीत जमिनी, बेघरांसाठी घरकूल योजना, बेरोजगारांना व्यवसायिक प्रशिक्षण देऊन अल्प दराने कर्ज योजना लागू करा, जननी सुरक्षा योजनेंतर्गत प्रसूती पश्चात मिळणारा निधी विमुक्त भटक्या जमातीच्या गरोदर महिलांनासुध्दा मिळावा, मच्छिमारांना २०० दिवस काम व विकास योजना लागू करा, अशा मागण्या असल्याचे संघर्ष वाहिनीचे कार्यकर्ते परेश दुरूगवार, अनिल मेश्राम, दिलीप कोसरे, जयचंद नगरे, धनपाल मेश्राम, रमेश मेश्राम, विनोद मेश्राम आदींनी कळविले.