शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सडक-अर्जुनीत भीषण पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 21:55 IST

मागील वर्षीच्या अत्यल्प पावसामुळे नद्या, नाले, तलाव, बोड्यांमध्ये पाणी साचले नाही. भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. बोअरवेलमधून पाणी येत नाही.

ठळक मुद्देनगर पंचायतने लक्ष द्यावे : बहुजन रिपब्लिकन पक्षाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : मागील वर्षीच्या अत्यल्प पावसामुळे नद्या, नाले, तलाव, बोड्यांमध्ये पाणी साचले नाही. भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. बोअरवेलमधून पाणी येत नाही. त्यामुळे सडक अर्जुनी नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्र.५ मध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. परिणामीे पाण्यासाठी सकाळपासूनच महिलांची भटकंती सुरू आहे. यासाठी बहुजन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पाण्याव्यतिरिक्त इतरही मागण्यांचे निवेदन प्रभारी मुख्याधिकारी अखिलकुमार मेश्राम यांना दिले आहे.उन्हाळ्याला सुरुवात होवून तापमानात कमालीची वाढ झाली आहे. अशातच वॉर्ड क्र. ५ मधील रहिवाशांचे पाण्यासाठी बेहाल होत आहे. सर्वांना शुद्ध व पुरेशा पाण्याचा पुरवठा करणे ही नगर पंचायतची नैतिक जबाबदारी आहे. मात्र नगर पंचायतच्या भोंगळ कारभाराने प्रचलित असलेल्या नगर पंचायतच्या पदाधिकाऱ्यांना जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचा आरोप आहे. याचेच उदाहरण म्हणजे येथील वॉर्ड क्र. ५ मधील महिलांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पिण्याच्या पाण्याची सोय करणे नगर पंचायतची जबाबदारी आहे. जर पिण्याच्या पाण्याची उपाययोजना केली असती तर वॉर्ड क्र. ५ मध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली नसती.याच वॉर्डातील काही लोकांनी टिल्लू पंप लावला आहे. त्यामुळे काही लोकांना पाणी मिळते तर काही लोक पाण्यापासून वंचित आहेत. ज्या लोकांनी टिल्लू पंपाचा वापर करुन इतरांना पाण्यापासून वंचित ठेवले आहे. अशांवर कारवाई होणे गरजेचे आहे.मात्र नगर पंचायतचे पदाधिकारी मंूग गिळून गप्प का? असा सवाल निर्माण होत आहे. नगर पंचायतने या भीषण समस्येकडे जातीने लक्ष घालून सर्वांसाठी पाण्याची सोय करावी, अशी मागणी आहे. या मागणीसह इतरही मागण्यांचा निवेदनात समावेश असून बहुजन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार अखिलेशकुमार मेश्राम यांना निवेदन देण्यात आले.सदर मागण्या एका आठवड्यात पूर्ण कराव्या अन्यथा नगरपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी बीआरएसपीचे तालुकाध्यक्ष महेंद्र तागडे, महासचिव दिनेश ईलमकर, हिवराज अंबादे, जाधव अंबादे, प्रल्हाद बडोले, देवचंद टेंभुर्णे, धनलाल अंबादे, गीता अंबादे, वर्षा अंबादे, निरंजना अंबादे, लिला अंबादे, भगवान मांढरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.वीज पुरवठा सुरळीत कराशहरात वीज पुरवठा नेहमी खंडित होत असते. अशातच शाळकरी विद्यार्थ्यांना अभ्यास करतेवेळी नाहक त्रास होतो. तसेच उन्हाळ्यात स्वत:च्या बचावासाठी घरोघरी कुलर, पंखे आहेत. परंतु विजेच्या लपंडावाने त्या शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. नियमित वीज पुरवठा होईल, त्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे.बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सौंदर्यीकरण कराजि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेसमोर अनेक वर्षांपासून घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. राष्ट्रीय सणानिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले जाते. मात्र पायऱ्यांची सोय नसल्याने पाहुण्यांना माल्यार्पण करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. एवढेच नाही तर माल्यार्पण करतेवेळी पाहुणे खाली कोसळण्याची भीती नाकारता येत नाही. त्यासाठी सिमेंट कांक्रिटच्या पायऱ्या तयार कराव्यात. तसेच बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या डोक्यावर छत्रीची व्यवस्था करण्याची मागणी केली.