शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' सीन; आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
10
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
11
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
13
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
14
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
15
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
16
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
17
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
18
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
19
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
20
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट

उन्हाळी सिंचनक्षेत्रात यावर्षी होणार घट

By admin | Updated: November 27, 2014 23:35 IST

बाघ-ईटियाडोह पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यावर्षी रबी-उन्हाळी पिकांसाठी मिळणाऱ्या पाण्यात घट होणार आहे. यावर्षी कमी पावसामुळे धरणात पुरेशा प्रमाणात जलसाठा नाही.

अपुरा पाणीसाठा : गतवर्षीपेक्षा चार हजार हेक्टर कमी सिंचनाचे नियोजनगोंदिया : बाघ-ईटियाडोह पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यावर्षी रबी-उन्हाळी पिकांसाठी मिळणाऱ्या पाण्यात घट होणार आहे. यावर्षी कमी पावसामुळे धरणात पुरेशा प्रमाणात जलसाठा नाही. त्यामुळे अवघ्या लाभक्षेत्रातील तीन जिल्ह्यांमिळून ७९०० हेक्टर क्षेत्रातच उन्हाळी हंगामाचे पिकाच्या लागवडीचे नियोजन प्रस्तावित करण्यात आले आहे.ईटियाडोह प्रकल्पाचे पाणी गोंदियासह भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांनाही मिळते. यावर्षी प्रस्तावित नियोजनात गोंदिया जिल्ह्याला प्रस्तावित जलसाठ्याच्या ३५ टक्के पाणी मिळणार आहे. त्यातून २७६५ हेक्टरमध्ये सिंचन होणार आहे. भंडारा जिल्ह्याला २५ टक्के पाणी मिळणार असून त्यातून १९७५ हेक्टर सिंचन होणार आहे. तर गडचिरोली जिल्ह्याला सर्वाधिक ४० टक्के पाणी मिळणार असून त्यातून त्या जिल्ह्यातील ३१६० हेक्टर शेतीचे सिंचन होणार आहे.ईटियाडोह प्रकल्पस्तरिय, वितरिकास्तरिय व पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत उपविभाग अर्जुनी मोरगाव व वडसा यांच्या अधिकाऱ्यांची बैठक कार्यकारी अभियंता वसंत गोन्नाडे यांच्या उपस्थितीत वडसा येथे झाली. त्यात रबी-उन्हाळी हंगाम २०१४-१५ चे नियोजन करण्यात आले. त्यानुसार अर्जुनी मोरगाव उपविभागातील पाणी वापर संस्थांना ४७०० हेक्टर क्षेत्राकरिता तर वडसा उपविभागातील पाणी वापर संस्थांना ३२०० हेक्टर क्षेत्राकरिता उन्हाळी पिकांसाठी पाणी देण्यात येणार आहे.गेल्यावर्षी १२ हजार हेक्टरला सिंचनाचे नियोजन बाघ-ईटियाडोह विभागाने केले होते. प्रत्यक्षात त्यापेक्षाही जास्त सिंचन झाले होते. त्या तुलनेत यावर्षी केवळ ७९०० हेक्टर सिंचनाचे नियोजन करता आले. याबाबत सांगताना कार्यकारी अभियंता गोन्नाडे यांनी म्हणाले, यावर्षी खरिप हंगामात पाऊस कमी पडल्यामुळे पिकांसाठी ३ ते ४ पाळ्या पाणी देण्यात आले. आधीच जलसाठा कमी असताना खरिपातही पाणी वापर झाल्यामुळे रबी-उन्हाळीसाठी कमी नियोजन करावे लागत असल्याचे ते म्हणाले. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे पाण्याचा सदुपयोग होण्यासाठी पाटचाऱ्या सुस्थितीत व प्रवाहक्षम करून ठेवाव्यात तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करून अपव्यय टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)