शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

भीषण पाणीटंचाईकडे वाटचाल

By admin | Updated: February 16, 2016 03:24 IST

उन्हाळ्याला सुरूवात होण्याआधीच यंदा फेब्रुवारीच्या सुरूवातीला तालुक्यातील छोटे तलाव आटले असून मोठे व मध्यम

सालेकसा : उन्हाळ्याला सुरूवात होण्याआधीच यंदा फेब्रुवारीच्या सुरूवातीला तालुक्यातील छोटे तलाव आटले असून मोठे व मध्यम तलावसुध्दा आटण्याच्या मार्गावर आहेत. अनेक बोरवेलसुध्दा आटू लागल्या आहेत. त्यामुळे येत्या एप्रिल, मे महिन्यात काय परिस्थिती असेल, असा प्रश्न तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. यंदा तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होणार असून पाण्यासाठी हाह:कार माजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सालेकसा तालुक्यात जवळपास प्रत्येक गावालगत छोटे-मोठे तलाव, गावबोडीची व्यवस्था आहे. या बोडीच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या पाण्यासंबंधीच्या अनेक समस्या सुटत असतात. तलावाखालील शेतीत सिंचनाची सोय, जनावरांना पिण्यासाठी पाणी, जनावरे धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, घर बांधण्यासाठी तसेच इतर अनेक कामासाठी गावकरी लोक तलावाच्या पाण्याचा उपयोग करतात. जंगलू पशु -पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी या तलावामध्येच उपलब्ध असते. तलावात उपलब्ध पाण्याच्या आधारावरच परिसरातील जंगलात वन्यजीव पशू-पक्षी भ्रमण करीत असतात. जर पाण्याची सोय नसेल तर वन्यजीव इतर परिसराकडे गमन करतात. परंतु परिसरात पाणी नसेल तर वन्यजीव अनेक वेळा मानवी वस्त्यांकडेही धाव घेतात. याचा मोठा फटका गावकऱ्यांना सहन करावा लागतो. यंदा कदाचित अशीच परिस्थिती उद्भवणार असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्याच्या काही भाग ओलीत क्षेत्राखाली असून त्या क्षेत्रात सिरपूरबांध, पुजारीटोला धरण आणि कालीसराड धरणाचे पाणी कालव्याद्वारे जाते. परंतु कालीसराड, पुजारीटोला धरणात नाममात्र पाणी उरले आहे. तर सिरपूरबांधमध्ये सुध्दा अतिरीक्त जलसाठा नसल्याने यंदा उन्हाळी पिकासाठी पाणी देण्यात आले नाही. रबी पिकासाठी पाणी दिल्यास अनेक गावात पाणी टंचाईची समस्या काही प्रमाणात कमी होते. परंतु यंदा उन्हाळी धान पिकासाठी पाणी मिळत नसून दुहेरी समस्या निर्माण होत आहे. तालुक्यातून वाहणारे नदी-नाले सुध्दा कोरडे झाले आहेत. त्यामुळे तेथील पाण्याचे स्त्रोतसुध्दा संपले आहेत. एकंदरीत परिस्थिती बघता यंदा तालुक्याची भीषण पाणी टंचाईकडे वाटचाल सुरू झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)