शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

भीषण पाणीटंचाईकडे वाटचाल

By admin | Updated: February 16, 2016 03:24 IST

उन्हाळ्याला सुरूवात होण्याआधीच यंदा फेब्रुवारीच्या सुरूवातीला तालुक्यातील छोटे तलाव आटले असून मोठे व मध्यम

सालेकसा : उन्हाळ्याला सुरूवात होण्याआधीच यंदा फेब्रुवारीच्या सुरूवातीला तालुक्यातील छोटे तलाव आटले असून मोठे व मध्यम तलावसुध्दा आटण्याच्या मार्गावर आहेत. अनेक बोरवेलसुध्दा आटू लागल्या आहेत. त्यामुळे येत्या एप्रिल, मे महिन्यात काय परिस्थिती असेल, असा प्रश्न तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. यंदा तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होणार असून पाण्यासाठी हाह:कार माजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सालेकसा तालुक्यात जवळपास प्रत्येक गावालगत छोटे-मोठे तलाव, गावबोडीची व्यवस्था आहे. या बोडीच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या पाण्यासंबंधीच्या अनेक समस्या सुटत असतात. तलावाखालील शेतीत सिंचनाची सोय, जनावरांना पिण्यासाठी पाणी, जनावरे धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, घर बांधण्यासाठी तसेच इतर अनेक कामासाठी गावकरी लोक तलावाच्या पाण्याचा उपयोग करतात. जंगलू पशु -पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी या तलावामध्येच उपलब्ध असते. तलावात उपलब्ध पाण्याच्या आधारावरच परिसरातील जंगलात वन्यजीव पशू-पक्षी भ्रमण करीत असतात. जर पाण्याची सोय नसेल तर वन्यजीव इतर परिसराकडे गमन करतात. परंतु परिसरात पाणी नसेल तर वन्यजीव अनेक वेळा मानवी वस्त्यांकडेही धाव घेतात. याचा मोठा फटका गावकऱ्यांना सहन करावा लागतो. यंदा कदाचित अशीच परिस्थिती उद्भवणार असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्याच्या काही भाग ओलीत क्षेत्राखाली असून त्या क्षेत्रात सिरपूरबांध, पुजारीटोला धरण आणि कालीसराड धरणाचे पाणी कालव्याद्वारे जाते. परंतु कालीसराड, पुजारीटोला धरणात नाममात्र पाणी उरले आहे. तर सिरपूरबांधमध्ये सुध्दा अतिरीक्त जलसाठा नसल्याने यंदा उन्हाळी पिकासाठी पाणी देण्यात आले नाही. रबी पिकासाठी पाणी दिल्यास अनेक गावात पाणी टंचाईची समस्या काही प्रमाणात कमी होते. परंतु यंदा उन्हाळी धान पिकासाठी पाणी मिळत नसून दुहेरी समस्या निर्माण होत आहे. तालुक्यातून वाहणारे नदी-नाले सुध्दा कोरडे झाले आहेत. त्यामुळे तेथील पाण्याचे स्त्रोतसुध्दा संपले आहेत. एकंदरीत परिस्थिती बघता यंदा तालुक्याची भीषण पाणी टंचाईकडे वाटचाल सुरू झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)