शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

भीषण पाणीटंचाईकडे वाटचाल

By admin | Updated: February 16, 2016 03:24 IST

उन्हाळ्याला सुरूवात होण्याआधीच यंदा फेब्रुवारीच्या सुरूवातीला तालुक्यातील छोटे तलाव आटले असून मोठे व मध्यम

सालेकसा : उन्हाळ्याला सुरूवात होण्याआधीच यंदा फेब्रुवारीच्या सुरूवातीला तालुक्यातील छोटे तलाव आटले असून मोठे व मध्यम तलावसुध्दा आटण्याच्या मार्गावर आहेत. अनेक बोरवेलसुध्दा आटू लागल्या आहेत. त्यामुळे येत्या एप्रिल, मे महिन्यात काय परिस्थिती असेल, असा प्रश्न तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. यंदा तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होणार असून पाण्यासाठी हाह:कार माजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सालेकसा तालुक्यात जवळपास प्रत्येक गावालगत छोटे-मोठे तलाव, गावबोडीची व्यवस्था आहे. या बोडीच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या पाण्यासंबंधीच्या अनेक समस्या सुटत असतात. तलावाखालील शेतीत सिंचनाची सोय, जनावरांना पिण्यासाठी पाणी, जनावरे धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, घर बांधण्यासाठी तसेच इतर अनेक कामासाठी गावकरी लोक तलावाच्या पाण्याचा उपयोग करतात. जंगलू पशु -पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी या तलावामध्येच उपलब्ध असते. तलावात उपलब्ध पाण्याच्या आधारावरच परिसरातील जंगलात वन्यजीव पशू-पक्षी भ्रमण करीत असतात. जर पाण्याची सोय नसेल तर वन्यजीव इतर परिसराकडे गमन करतात. परंतु परिसरात पाणी नसेल तर वन्यजीव अनेक वेळा मानवी वस्त्यांकडेही धाव घेतात. याचा मोठा फटका गावकऱ्यांना सहन करावा लागतो. यंदा कदाचित अशीच परिस्थिती उद्भवणार असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्याच्या काही भाग ओलीत क्षेत्राखाली असून त्या क्षेत्रात सिरपूरबांध, पुजारीटोला धरण आणि कालीसराड धरणाचे पाणी कालव्याद्वारे जाते. परंतु कालीसराड, पुजारीटोला धरणात नाममात्र पाणी उरले आहे. तर सिरपूरबांधमध्ये सुध्दा अतिरीक्त जलसाठा नसल्याने यंदा उन्हाळी पिकासाठी पाणी देण्यात आले नाही. रबी पिकासाठी पाणी दिल्यास अनेक गावात पाणी टंचाईची समस्या काही प्रमाणात कमी होते. परंतु यंदा उन्हाळी धान पिकासाठी पाणी मिळत नसून दुहेरी समस्या निर्माण होत आहे. तालुक्यातून वाहणारे नदी-नाले सुध्दा कोरडे झाले आहेत. त्यामुळे तेथील पाण्याचे स्त्रोतसुध्दा संपले आहेत. एकंदरीत परिस्थिती बघता यंदा तालुक्याची भीषण पाणी टंचाईकडे वाटचाल सुरू झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)