शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

बाघ पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे ‘त्या’ मुलांचा मृत्यू

By admin | Updated: June 5, 2017 00:52 IST

येथील चार ते पाच मुले शनिवार (दि.३) सिरपूर धरणाकडे आंघोळीला गेले असता धरणाच्या समोरच्या टाकीत दोन मुलांचा बुडूृन मृत्यू झाला.

नागरिकांचा आरोप : दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करालोकमत न्यूज नेटवर्कसिरपूरबांध : येथील चार ते पाच मुले शनिवार (दि.३) सिरपूर धरणाकडे आंघोळीला गेले असता धरणाच्या समोरच्या टाकीत दोन मुलांचा बुडूृन मृत्यू झाला. ही घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. दिगंबर उर्फ बंटी हेमराज कोसरे व नितेश सुरज कोसरकर अशी मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत. ते दुपारी घरी न आल्यामुळे घरच्या लोकांनी इकडे-तिकडे शोध घेतला. परंतु त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. नंतर त्यांच्या मित्रांना विचारणा केली असता उलट-सुलट माहिती दिली आणि धरणाकडे आंघोळीला गेले असल्याचे म्हटले तेव्हा त्यांचे नातेवाईक आणि गावातील लोकांनी धरणाकडे धाव घेतली. धरणाजवळ सायकल उभी दिसली. धरणाच्या खालच्या टाकीकडे त्यांचे कपडे आढळले. प्रथम दिगंबर हेमराज कोसरे (१४) याचा मृतदेह तरंगत आढळला. नितेश सुरज कोसरकर (१४) याचा पत्ता लागला नव्हता. गावातील मासेमाऱ्यांकडून नितेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. तेव्हा प्रशासनाने गोंदियावरुन गोताखोरांना बोलविले. त्या टाकीत पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला.दोन मुलांचा जीव गेल्यामुळे लोकांनी बाघ पाटबंधारे विभागावर आक्रोश व्यक्त केला. सिरपुरबांध येथील जलाशयावर दर दिवशी पर्यटक लोक येत असतात. परंतु त्यांच्या सुरक्षेविषयी काहीही उपाययोजना नसल्याकारणाने या ठिकाणी छोट्या-मोठ्या घटना घडतच असतात. या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी हजेरी पटावर हजेरी लावून आपल्या कामाला निघत असतात. त्यांच्या अनुपस्थिती या धरणाची पूर्ण व्यवस्था वाऱ्यावरच असते. बाघ पाटबंधारे विभागाच्या अभियंता कर्मचाऱ्याचे जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. या ठिकाणी तणावाचे वातावरण असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.संततप्त नागरिकांनी बाघ पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. बाघ पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी घटनेच्या दिवशी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करुन निलंबनाचे लिखीत आश्वासन दिले. शाखा अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांना सुद्धा निलंबीत करण्याची मागणी रेटून धरली. आ. संजय पुराम यांनी जिल्हाधिकारी यांना फोन करुन १२ तासाच्या आत उपकार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता यांना निलंबित करण्याची मागणी केली. या ठिकाणी लावण्यात आलेले पथदिवे अनेक दिवसापासून बंद आहेत.