शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बाघ पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे ‘त्या’ मुलांचा मृत्यू

By admin | Updated: June 5, 2017 00:52 IST

येथील चार ते पाच मुले शनिवार (दि.३) सिरपूर धरणाकडे आंघोळीला गेले असता धरणाच्या समोरच्या टाकीत दोन मुलांचा बुडूृन मृत्यू झाला.

नागरिकांचा आरोप : दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करालोकमत न्यूज नेटवर्कसिरपूरबांध : येथील चार ते पाच मुले शनिवार (दि.३) सिरपूर धरणाकडे आंघोळीला गेले असता धरणाच्या समोरच्या टाकीत दोन मुलांचा बुडूृन मृत्यू झाला. ही घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. दिगंबर उर्फ बंटी हेमराज कोसरे व नितेश सुरज कोसरकर अशी मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत. ते दुपारी घरी न आल्यामुळे घरच्या लोकांनी इकडे-तिकडे शोध घेतला. परंतु त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. नंतर त्यांच्या मित्रांना विचारणा केली असता उलट-सुलट माहिती दिली आणि धरणाकडे आंघोळीला गेले असल्याचे म्हटले तेव्हा त्यांचे नातेवाईक आणि गावातील लोकांनी धरणाकडे धाव घेतली. धरणाजवळ सायकल उभी दिसली. धरणाच्या खालच्या टाकीकडे त्यांचे कपडे आढळले. प्रथम दिगंबर हेमराज कोसरे (१४) याचा मृतदेह तरंगत आढळला. नितेश सुरज कोसरकर (१४) याचा पत्ता लागला नव्हता. गावातील मासेमाऱ्यांकडून नितेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. तेव्हा प्रशासनाने गोंदियावरुन गोताखोरांना बोलविले. त्या टाकीत पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला.दोन मुलांचा जीव गेल्यामुळे लोकांनी बाघ पाटबंधारे विभागावर आक्रोश व्यक्त केला. सिरपुरबांध येथील जलाशयावर दर दिवशी पर्यटक लोक येत असतात. परंतु त्यांच्या सुरक्षेविषयी काहीही उपाययोजना नसल्याकारणाने या ठिकाणी छोट्या-मोठ्या घटना घडतच असतात. या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी हजेरी पटावर हजेरी लावून आपल्या कामाला निघत असतात. त्यांच्या अनुपस्थिती या धरणाची पूर्ण व्यवस्था वाऱ्यावरच असते. बाघ पाटबंधारे विभागाच्या अभियंता कर्मचाऱ्याचे जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. या ठिकाणी तणावाचे वातावरण असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.संततप्त नागरिकांनी बाघ पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. बाघ पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी घटनेच्या दिवशी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करुन निलंबनाचे लिखीत आश्वासन दिले. शाखा अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांना सुद्धा निलंबीत करण्याची मागणी रेटून धरली. आ. संजय पुराम यांनी जिल्हाधिकारी यांना फोन करुन १२ तासाच्या आत उपकार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता यांना निलंबित करण्याची मागणी केली. या ठिकाणी लावण्यात आलेले पथदिवे अनेक दिवसापासून बंद आहेत.