शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

बाघ पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे ‘त्या’ मुलांचा मृत्यू

By admin | Updated: June 5, 2017 00:52 IST

येथील चार ते पाच मुले शनिवार (दि.३) सिरपूर धरणाकडे आंघोळीला गेले असता धरणाच्या समोरच्या टाकीत दोन मुलांचा बुडूृन मृत्यू झाला.

नागरिकांचा आरोप : दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करालोकमत न्यूज नेटवर्कसिरपूरबांध : येथील चार ते पाच मुले शनिवार (दि.३) सिरपूर धरणाकडे आंघोळीला गेले असता धरणाच्या समोरच्या टाकीत दोन मुलांचा बुडूृन मृत्यू झाला. ही घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. दिगंबर उर्फ बंटी हेमराज कोसरे व नितेश सुरज कोसरकर अशी मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत. ते दुपारी घरी न आल्यामुळे घरच्या लोकांनी इकडे-तिकडे शोध घेतला. परंतु त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. नंतर त्यांच्या मित्रांना विचारणा केली असता उलट-सुलट माहिती दिली आणि धरणाकडे आंघोळीला गेले असल्याचे म्हटले तेव्हा त्यांचे नातेवाईक आणि गावातील लोकांनी धरणाकडे धाव घेतली. धरणाजवळ सायकल उभी दिसली. धरणाच्या खालच्या टाकीकडे त्यांचे कपडे आढळले. प्रथम दिगंबर हेमराज कोसरे (१४) याचा मृतदेह तरंगत आढळला. नितेश सुरज कोसरकर (१४) याचा पत्ता लागला नव्हता. गावातील मासेमाऱ्यांकडून नितेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. तेव्हा प्रशासनाने गोंदियावरुन गोताखोरांना बोलविले. त्या टाकीत पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला.दोन मुलांचा जीव गेल्यामुळे लोकांनी बाघ पाटबंधारे विभागावर आक्रोश व्यक्त केला. सिरपुरबांध येथील जलाशयावर दर दिवशी पर्यटक लोक येत असतात. परंतु त्यांच्या सुरक्षेविषयी काहीही उपाययोजना नसल्याकारणाने या ठिकाणी छोट्या-मोठ्या घटना घडतच असतात. या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी हजेरी पटावर हजेरी लावून आपल्या कामाला निघत असतात. त्यांच्या अनुपस्थिती या धरणाची पूर्ण व्यवस्था वाऱ्यावरच असते. बाघ पाटबंधारे विभागाच्या अभियंता कर्मचाऱ्याचे जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. या ठिकाणी तणावाचे वातावरण असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.संततप्त नागरिकांनी बाघ पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. बाघ पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी घटनेच्या दिवशी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करुन निलंबनाचे लिखीत आश्वासन दिले. शाखा अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांना सुद्धा निलंबीत करण्याची मागणी रेटून धरली. आ. संजय पुराम यांनी जिल्हाधिकारी यांना फोन करुन १२ तासाच्या आत उपकार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता यांना निलंबित करण्याची मागणी केली. या ठिकाणी लावण्यात आलेले पथदिवे अनेक दिवसापासून बंद आहेत.