शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पावसाअभावी दीड लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:19 IST

गोंदिया : जुलै महिना संपत आला तरी अद्यापही पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरवरील ...

गोंदिया : जुलै महिना संपत आला तरी अद्यापही पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या आहेत. तर हवामान विभागाचे अंदाज यंदा वांरवार खोटे ठरत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ८१ हजार हेक्टरवर धान पिकाच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यात अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे. मात्र रोवणीयोग्य पाऊस न झाल्याने आतापर्यंत केवळ २० टक्के रोवण्या झाल्या आहेत. तर ८० टक्के रोवण्या होणे अद्यापही शिल्लक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या एकूण २९.८ टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३६३.७ मीमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र सलग पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील नदी-नाले अद्यापही कोरडे पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीत अधिक भर पडली आहे. हवामान विभागाने यंदा १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र हा अंदाज सुरुवातीपासूनच चुकत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. आकाशात दररोज मेघ भरून येतात. मात्र पाऊस हजेरी लावत नसल्याने वातावरणात उकाडा वाढला आहे. त्यामुळे जिल्हावासीय उकाड्याने तर शेतकरी पावसाअभावी चिंतातुर झाल्याचे चित्र आहे.

............

आठ दिवसात पाऊस न झाल्यास स्थिती गंभीर

ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांनी रोवणी सुरू केली आहे. मात्र जे शेतकरी वरथेंबी पावसावरच अवलंबून आहेत त्यांची पावसाअभावी मोठी अडचण झाली आहे. जिल्ह्यात आठ दिवसात पाऊस न झाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.