शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

पावसाअभावी जिल्ह्यातील धरणे कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST

आमगाव : महाराष्ट्रात मान्सूनने चांगली धडक दिली असली तरीही विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नसल्याने धरणात अत्यल्प उपयुक्त ...

आमगाव : महाराष्ट्रात मान्सूनने चांगली धडक दिली असली तरीही विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नसल्याने धरणात अत्यल्प उपयुक्त जलसाठा असून पावसाअभावी धरणे भरली नाही तर जलसंकटाचा सामना करण्याची स्थिती उद्भवू शकते.

गोंदिया जिल्हा अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून पावसाअभावी जिल्ह्यातील धरण तहानलेलेच आहेत. निम्मा पावसाळा संपला असला तरी जिल्ह्यातील धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे आजची स्थिती पाहता जिल्हयात पाणी टंचाई अटळ आहे. जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था ही धरणाच्या पावसावर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असली तरी जिल्ह्यात दमदार पाऊस अजून कोसळलेलाच नाही. निम्मा पावसाळा लोटूनही दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. सर्वात मोठ्या ईटियाडोह धरणात आजच्या घडीला केवळ ३०.९५ टक्के ( ९८.३८ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा आहे. तर सिरपूर धरणात १५.९१ टक्के ( २५.४२ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा, पुजारीटोला धरणात ६२ टक्के (२६.९९ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा, कालीसराड धरणात ८.९३ टक्के (२.३३ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील शेतकरी हे भात शेतीवर अवलंबून आहेत. सध्या शेतात पेरणी करण्यापुरता पाऊस झालेला असला, तरी नद्यानाल्यांना पाणी येण्यासाठी पावसाची गरज आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत पावसाची अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांना व जिल्हावासीयांना जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो.