शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

पावसाअभावी जिल्ह्यातील धरणे कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST

आमगाव : महाराष्ट्रात मान्सूनने चांगली धडक दिली असली तरीही विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नसल्याने धरणात अत्यल्प उपयुक्त ...

आमगाव : महाराष्ट्रात मान्सूनने चांगली धडक दिली असली तरीही विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नसल्याने धरणात अत्यल्प उपयुक्त जलसाठा असून पावसाअभावी धरणे भरली नाही तर जलसंकटाचा सामना करण्याची स्थिती उद्भवू शकते.

गोंदिया जिल्हा अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून पावसाअभावी जिल्ह्यातील धरण तहानलेलेच आहेत. निम्मा पावसाळा संपला असला तरी जिल्ह्यातील धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे आजची स्थिती पाहता जिल्हयात पाणी टंचाई अटळ आहे. जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था ही धरणाच्या पावसावर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असली तरी जिल्ह्यात दमदार पाऊस अजून कोसळलेलाच नाही. निम्मा पावसाळा लोटूनही दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. सर्वात मोठ्या ईटियाडोह धरणात आजच्या घडीला केवळ ३०.९५ टक्के ( ९८.३८ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा आहे. तर सिरपूर धरणात १५.९१ टक्के ( २५.४२ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा, पुजारीटोला धरणात ६२ टक्के (२६.९९ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा, कालीसराड धरणात ८.९३ टक्के (२.३३ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील शेतकरी हे भात शेतीवर अवलंबून आहेत. सध्या शेतात पेरणी करण्यापुरता पाऊस झालेला असला, तरी नद्यानाल्यांना पाणी येण्यासाठी पावसाची गरज आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत पावसाची अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांना व जिल्हावासीयांना जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो.