शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

पावसाअभावी जिल्ह्यातील धरणे कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST

आमगाव : महाराष्ट्रात मान्सूनने चांगली धडक दिली असली तरीही विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नसल्याने धरणात अत्यल्प उपयुक्त ...

आमगाव : महाराष्ट्रात मान्सूनने चांगली धडक दिली असली तरीही विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नसल्याने धरणात अत्यल्प उपयुक्त जलसाठा असून पावसाअभावी धरणे भरली नाही तर जलसंकटाचा सामना करण्याची स्थिती उद्भवू शकते.

गोंदिया जिल्हा अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून पावसाअभावी जिल्ह्यातील धरण तहानलेलेच आहेत. निम्मा पावसाळा संपला असला तरी जिल्ह्यातील धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे आजची स्थिती पाहता जिल्हयात पाणी टंचाई अटळ आहे. जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था ही धरणाच्या पावसावर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असली तरी जिल्ह्यात दमदार पाऊस अजून कोसळलेलाच नाही. निम्मा पावसाळा लोटूनही दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. सर्वात मोठ्या ईटियाडोह धरणात आजच्या घडीला केवळ ३०.९५ टक्के ( ९८.३८ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा आहे. तर सिरपूर धरणात १५.९१ टक्के ( २५.४२ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा, पुजारीटोला धरणात ६२ टक्के (२६.९९ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा, कालीसराड धरणात ८.९३ टक्के (२.३३ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील शेतकरी हे भात शेतीवर अवलंबून आहेत. सध्या शेतात पेरणी करण्यापुरता पाऊस झालेला असला, तरी नद्यानाल्यांना पाणी येण्यासाठी पावसाची गरज आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत पावसाची अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांना व जिल्हावासीयांना जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो.