शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

योग्य व्यवस्थापनाअभावी पुजारीटोला धोक्यात

By admin | Updated: November 13, 2014 23:04 IST

जिल्ह्यात सिंचनासाठी महत्वपूर्ण ठरलेले पुजारीटोला, कालीसराड व सिरपूर धरण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गलथान व्यवस्थापनामुळे जर्जर होत आहे. धरणावरील दुरुस्तीच्या कामातील

आमगाव : जिल्ह्यात सिंचनासाठी महत्वपूर्ण ठरलेले पुजारीटोला, कालीसराड व सिरपूर धरण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गलथान व्यवस्थापनामुळे जर्जर होत आहे. धरणावरील दुरुस्तीच्या कामातील निधी घश्यात जात असल्याने धरण परिसराची दुरवस्था होत आहे. धरण व परिसरातील हिरवळ पर्यटकांसाठी आकर्षण असताना आता त्याच जागेवर मद्यपी व जुगाऱ्यांनी कब्जा केल्याचे दिसून येते. त्यामुळे धरण व परिसर सद्यस्थितीत ओल्या पार्टीचे स्थळ म्हणून कुप्रसिद्ध होण्याच्या मार्गावर आहे.जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, देवरी या तालुक्यात सिंचन सुविधांसाठी कालीसराड, पुजारीटोला व शिरपूर धरण शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. शासनाने या धरणांचे योग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. धरण परिसराच्या विकासासासाठी अनेक कामे या परिसरात करण्यात आली आहेत. धरण परिसर वनांनी वेढला असल्याने या ठिकाणी वन्यप्राण्यांचे वास्तव्य दिसून येतो. त्यामुळे धरण व या भागातील वनपरिसर पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाते. यातूनच येथे पर्यटक नेहमी आकर्षित होत असतात. परंतु कालांतराने या धरण परिसरातील उपलब्ध सोयी जर्जर होत चालल्याने नागरिकही या भागाकडे पाठ दाखवित आहेत.धरणाचे व परिसरातील व्यवस्थापनाची जबाबदारी बाघ इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागाकडे आहे. शासन निधीअंतर्गत धरण परिसरात वास्तव्यात असलेल्या इमारती, वृक्षलागवड असलेला बगीचा यात भर घालण्यात आली. धरण परिसरात सौंदर्यीकरणाची भर पडावी यासाठी विविध पावले विभागाने उचलली आहेत. परंतु कालांतराने धरण व परिसर योग्य व्यवस्थापनाअभावी जर्जर होत चालला आहे. वास्तव्यासाठी उपयोगी असलेल्या इमारती, धरण परिसरातील दाराजवळील पूल, बगिचा पूर्णत: जर्जर अवस्थेत पोहोचला आहे. यात धरणावरील पुलावरील सुरक्षा भिंत, पुलावरील मोठी भेगा अपघातांना आमंत्रण देत आहेत. याकडे विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. धरणाच्या व्यवस्थापनाकरिता प्रशासनाने तत्पर असायला पाहिजे, परंतु धरण व परिसरातील जर्जर व्यवस्थेकडे स्थानिक अधिकाऱ्यांनी पाठ दाखविली आहे.शासनाकडून दरवर्षी धरणाच्या व्यवस्थापनाकरिता निधी आवंटीत करण्यात येत असल्याची माहिती विभागाकडे आहे. सदर निधीचा उपयोग होतच नसल्याचे धरण व परिसरातील वाताहत बघून लक्षात येते. धरण व परिसरातील वाताहतीमुळे पर्यटकांचा उद्देश सध्या मागे पडत आहे. या परिसरात विभागाच्या कामचुकारपणामुळे अवैध व्यवसायाला आता चालना मिळाली आहे. या परिसरातील विश्रामगृहात जुगाराचे अड्डे तर मद्यपींची मैफल नेहमीचे वास्तव्य ठरले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने या परिसरात येणाऱ्या नागरिकांनी पाठ फिरविली आहे. धरण व परिसरात एकांतपणा असल्याने प्रेमीयुगलांसाठी मनोमिलनाचे स्थळ ठरले आहे. परिसरात वाढत्या अपराधिक वृत्तीमुळे परिसरात मोठी अनुचित घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याची विभागाने कोणतीच दखल अद्याप घेतलेली नाही. या विभागाचा पूर्णत: नकारात्मक दृष्टीकोण असल्याने धरण व परिसरातील व्यवस्था पूर्ववत होत नसल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)