शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: June 19, 2014 23:54 IST

तालुक्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे नवीन उद्योगांना चालना मिळत आहे. परंतु प्रदुषणयुक्त उद्योगांनी पर्यावरणाची योग्य काळजी घेतली नसल्याने या उद्योगांमुळे प्रदुषणात वाढ झाली आहे.

आमगाव : तालुक्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे नवीन उद्योगांना चालना मिळत आहे. परंतु प्रदुषणयुक्त उद्योगांनी पर्यावरणाची योग्य काळजी घेतली नसल्याने या उद्योगांमुळे प्रदुषणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आमगाव तालुक्यात धानाच्या वाढत्या पिकामुळे या ठिकाणी तांदुळ भरडाई उद्योगांचे मोठ्या प्रमाणात मोठे मिल उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणात पोल्ट्री उद्योग, खासगी व शासकीय रुग्णालयातील घनकचरा, ग्रामपंचायतीच्या सांडपाण्यातील साचलेले गाळ या सर्वांमुळे प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.आमगाव तालुक्यात राईस मिलर्सचा उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. या राईस मिलमध्ये कुजलेले धान्य भरडाई अधिक प्रमाणात आहे. या तालुक्यात उष्णाचे तांदुळ बनविण्यासाठी अनेक रासायनिक पद्धतीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे तांदुळ बनविण्याच्या प्रक्रियेनंतर निघणारे रासायनिक टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट व्यवस्थित नसल्याने प्रदुषणयुक्त टाकाऊ पदार्थ व घाणयुक्त पाण्याचा नागरिकांच्या वस्तीतून निचरा होत नाही. त्यामुळे नागरिक वस्तीतील पिण्याच्या सोईयुक्त असलेल्या सिंचन विहिरी, पाण्याचे डोह यामध्ये मिसळून हे रासायनिक टाकाऊ पदार्थ व पाणी नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरले आहे. बनगाव येथील द्वारकाधाम येथील राईस मिलमधून मोठ्या प्रमाणात कुजलेले धान्य उडून परिसरातील रहिवाशांच्या घरांवर पसरत आहे. यामुळे नागरिकांना मोठा धोका निर्माण झालेला आहे. सदर काळ्या रंगाच्या राखेमुळे लहानमुलांना फुफ्फुसांचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उष्णा तांदुळाची निर्मिती करताना वापरण्यात येणारे रासायनिक पदार्थ व टाकाऊ पाण्यामुळे होणारे जलप्रदुषण वातावरणात पसरले आहे. तर राईस उद्योग व इतर उद्योगांच्या टाकाऊ कचऱ्यामुळे शेतकऱ्यांनाही फटका बसत आहे. परिसरातील शेतात या पाण्याचा निचरा होत असल्याने शेतीसुद्धा नापीक होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील प्रदुषणयुक्त उद्योगांना मंजुरी देताना जिल्हा प्रदूषण नियंत्रण बोर्ड नियमांना डावलून प्रस्ताव पारीत करीत असते. नुकतेच उद्योग सुरु झाले की त्यांच्याकडून कितीही प्रदुषण पसरले तरीही प्रदुषण नियंत्रण बोर्ड लक्ष घालत नाही. या विभागात तक्रार करुनही नागरिकांना दाद मिळत नाही. जिल्हा प्रदुषण नियंत्रण बोर्ड केवळ कागदावरच असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. सदर होणाऱ्या या राखेच्या दुषित कणांमुळे आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्रदुषण नियंत्रण बोर्ड व मिल मालकाने योग्य ती कार्रवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा द्वारकाधाम नगरातील नागरिकांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)