शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वृक्षतोडीमुळे जंगलांचा होतोय ऱ्हास

By admin | Updated: April 25, 2016 01:37 IST

आधुनिक युगात देखील ग्रामीण भागात लाकडांचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.

सडक-अर्जुनी : आधुनिक युगात देखील ग्रामीण भागात लाकडांचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. इमारतीसाठी असो की सरपणासाठी, लाकडांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. लाकडांचा उपयोग वाढल्यामुळे जंगले नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. ज्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते त्या प्रमाणात प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत नसल्याने दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्यामुळे जंगले नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात सरपणासाठी मोठ्या प्रमाणात लाकडांचा उपयोग होत असतो. त्यामुळे झाडांची कत्तल दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जाते. एक झाड जगविण्यासाठी अनेक वर्षे खर्ची घालावी लागतात; पण ते कापण्यासाठी थोडासाच वेळ लागतो. त्यामुळे झाडे मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. जंगले विरळ होत आहेत. वन विभागातर्फे वाळलेली लाकडे नेण्यास मज्जाव करण्यात येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ते जंगलात जाऊन प्रथम झाडे कापून ठेवतात व नंतर ती वाळ्ल्यावर घरी आणतात. यामुळे वन विभागाला काहीही करता येत नाही. सध्या लग्नाचा हंगाम असून अन्न शिजविण्यासाठी लाकडांचा उपयोग होत असतो. दरवर्षी मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ होत असतात. त्यामुळे एका लग्नासाठी एका मोठ्या झाडाची कत्तल करावी लागते. जर एका गावात सरासरी एका वर्षी २० लग्ने झाली तर २० मोठ्या झाडांना आपले प्राण गमवावे लागते. पण त्या प्रमाणात त्यांची लागवड होताना दिसत नाही. झाडांमुळेच पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. मात्र मागील काही वर्षांपासून झपाट्याने जंगलांचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. निसर्गाशी खेळणे एक दिवस मानवाला फार महाग पडणार आहे.त्याचे परिणाम देखील आता हळूहळू दिसू लागले आहे. जंगले नष्ट होत चालली असल्यामुळे याचा पर्जन्यमानावर देखील परिणाम होत आहे. पावसाचे प्रमाण देखील कमी होत चालले असून उष्णतामानात दरवर्षी वाढ होत आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वृक्षतोडीमुळे काही जातींची झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. झाडे ही निसर्गाने मानवाला दिलेली अनमोल भेट आहे. प्रत्येक झाड हे मानवाला नि:स्वार्थ भावनेने काहीना काही देत असतो. मानवाने आपल्या स्वार्थी भावनेतून त्याला संपविण्याचा कट रचलेला आहे. कुणी पैशासाठी झाड कापतो, कुणी फर्र्निचरसाठी तर कुणी सरपणासाठी; पण झाडे लावायला कुणीही पुढे येत नाही. सरकार लाखो रुपये खर्च करून सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून झाडाची लागवड करते. मात्र त्यात पाहिजे तसे यश आल्याचे दिसून येत नाही. याकडे वनविभागातील वरिष्ट अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. कापण्यात आलेल्या अनेक झाडांना वनकर्मचारी चोरीला गेल्याचे सांगितले जात नाही. त्यामुळे अनेक वृक्षकत्तल प्रकरणे दडपले जातात. (शहर प्रतिनिधी)