शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

अवैध वृक्षतोडीमुळे जंगलांचा होतोय ऱ्हास

By admin | Updated: April 25, 2016 01:37 IST

आधुनिक युगात देखील ग्रामीण भागात लाकडांचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.

सडक-अर्जुनी : आधुनिक युगात देखील ग्रामीण भागात लाकडांचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. इमारतीसाठी असो की सरपणासाठी, लाकडांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. लाकडांचा उपयोग वाढल्यामुळे जंगले नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. ज्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते त्या प्रमाणात प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत नसल्याने दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्यामुळे जंगले नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात सरपणासाठी मोठ्या प्रमाणात लाकडांचा उपयोग होत असतो. त्यामुळे झाडांची कत्तल दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जाते. एक झाड जगविण्यासाठी अनेक वर्षे खर्ची घालावी लागतात; पण ते कापण्यासाठी थोडासाच वेळ लागतो. त्यामुळे झाडे मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. जंगले विरळ होत आहेत. वन विभागातर्फे वाळलेली लाकडे नेण्यास मज्जाव करण्यात येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ते जंगलात जाऊन प्रथम झाडे कापून ठेवतात व नंतर ती वाळ्ल्यावर घरी आणतात. यामुळे वन विभागाला काहीही करता येत नाही. सध्या लग्नाचा हंगाम असून अन्न शिजविण्यासाठी लाकडांचा उपयोग होत असतो. दरवर्षी मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ होत असतात. त्यामुळे एका लग्नासाठी एका मोठ्या झाडाची कत्तल करावी लागते. जर एका गावात सरासरी एका वर्षी २० लग्ने झाली तर २० मोठ्या झाडांना आपले प्राण गमवावे लागते. पण त्या प्रमाणात त्यांची लागवड होताना दिसत नाही. झाडांमुळेच पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. मात्र मागील काही वर्षांपासून झपाट्याने जंगलांचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. निसर्गाशी खेळणे एक दिवस मानवाला फार महाग पडणार आहे.त्याचे परिणाम देखील आता हळूहळू दिसू लागले आहे. जंगले नष्ट होत चालली असल्यामुळे याचा पर्जन्यमानावर देखील परिणाम होत आहे. पावसाचे प्रमाण देखील कमी होत चालले असून उष्णतामानात दरवर्षी वाढ होत आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वृक्षतोडीमुळे काही जातींची झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. झाडे ही निसर्गाने मानवाला दिलेली अनमोल भेट आहे. प्रत्येक झाड हे मानवाला नि:स्वार्थ भावनेने काहीना काही देत असतो. मानवाने आपल्या स्वार्थी भावनेतून त्याला संपविण्याचा कट रचलेला आहे. कुणी पैशासाठी झाड कापतो, कुणी फर्र्निचरसाठी तर कुणी सरपणासाठी; पण झाडे लावायला कुणीही पुढे येत नाही. सरकार लाखो रुपये खर्च करून सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून झाडाची लागवड करते. मात्र त्यात पाहिजे तसे यश आल्याचे दिसून येत नाही. याकडे वनविभागातील वरिष्ट अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. कापण्यात आलेल्या अनेक झाडांना वनकर्मचारी चोरीला गेल्याचे सांगितले जात नाही. त्यामुळे अनेक वृक्षकत्तल प्रकरणे दडपले जातात. (शहर प्रतिनिधी)