शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मुसळधार पावसामुळे वन तलाव फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:55 IST

जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गोरेगाव तालुक्यातील मुरदोली, हिराटोला, कालीमाटी येथील चार वन तलाव फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देलाखो रुपयांचे नुकसान : बांधकामावर प्रश्नचिन्ह

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गोरेगाव तालुक्यातील मुरदोली, हिराटोला, कालीमाटी येथील चार वन तलाव फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कंत्राटदारामार्फत करण्यात आलेल्या तलावाच्या बांधकामावर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.प्राप्त माहितीनुसार मुरदोली, कालीमाटी व हिराटोला येथे (दोन वनतलाव) असे एकूण चार वनतलाव शासनाने २०१७-१८ यावर्षी मंजूर केले. त्या अनुषंगाने शासनाने माती काम मग्रारोहयो अंतर्गत तर पिचिंग व वेस्ट वेयरचे काम कंत्राटदारांना दिले होते. यातील चारही वन तलावाचे कामे जून २०१८ मध्ये पूर्ण करण्यात आले. दरम्यान जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी झालेल्या संततधार पावसामुळे महिनाभरापूर्वी बांधकाम करण्यात आलेले चारही वन तलाव फुटले. तलावाची पाळ फुटल्याने सर्व पाणी वाहून गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रत्येक तलावाच्या कामासाठी शासनाने १५ लाख व उर्वरीत कामासाठी ९ लाख ९९ हजार असे एकूण एका तलावासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. शासनाच्या जलसंवर्धनाच्या उद्देशातूनया तलावांचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र चुकीच्या नियोजनाचा या वन तलावांना फटका बसला. वेस्टवेअरचे बांधकाम चुकीने केल्याने वन तलावाची पाळ फुटल्याचे बोलल्या जाते. विशेष म्हणजे हिराटोला येथील एका वन तलावाच्या पाळीची व वेस्ट वेअरची उंची जवळपास सारखीच असल्यामुळे पाळीला २० फुटाचे भगदाड पडले असल्याचे गावकºयांनी सांगितले. दरम्यान एकाच पावसाने २५ लाख रुपये खर्चून करुन तयार करण्यात आलेल्या वन तलावांच्या बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. यासर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.संततधार पावसामुळे वन तलावात भरपूर पाणी साचले, पाळीचे बांधकाम नुकतेच करण्यात आले होते. त्यामुळे तलावाची पाळ फुटली. मात्र लवकरच तलावाची दुरूस्ती केली जाईल.एस.एम.जाधव, वनक्षेत्राधिकारी गोरेगाव.