शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

जागतिक मंदीमुळे धानाचे भाव पडले

By admin | Updated: June 28, 2015 01:10 IST

जागतिक मंदीमुळे धानाची निर्यात बंद झाली. धानाला योग्य भाव मिळेनासा झाला आहे, असे सांगतानाच शेतकऱ्यांनी धानाचे पिक बदलून आता दुसऱ्या पिकांकडे वळून आर्थिक संपन्नता साधली पाहीजे,

नितीन गडकरी : शेतकऱ्यांनी पिकात बदल करण्याची सूचनाआमगाव : जागतिक मंदीमुळे धानाची निर्यात बंद झाली. धानाला योग्य भाव मिळेनासा झाला आहे, असे सांगतानाच शेतकऱ्यांनी धानाचे पिक बदलून आता दुसऱ्या पिकांकडे वळून आर्थिक संपन्नता साधली पाहीजे, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. आमगाव येथील प्रचारसभेत ते बोलत होते.भाजपाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ना.गडकरी यांची जाहीर सभा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात दुपारी झाली. यावेळी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा.नाना पटोले, आ.संजय पुराम, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी आ.केशव मानकर, हेमंत पटले आदी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.प्रास्ताविक भाषणात विनोद अग्रवाल यांनी विरोधकांकडे मुद्देच नसल्यामुळे ते काहीतरी आरोप करून मतदारांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.ना.गडकरी यांनी आपल्या भाषणात गेल्या ६०-६५ वर्षांपासून सत्तारूढ असलेल्या काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. नेहरूजी, इंदिराजींच्या काळापासून आता राहुल गांधीपर्यंत सर्वजण गरीबी हटविण्याचा नारा देत आहेत. पण प्रत्यक्षात जनता तशीच आहे. नेत्यांची गरीबी मात्र दूर झाल्याचे ते म्हणाले. त्यांनी इतक्या वर्षात जे करून ठेवले ते बदलविणे एक वर्षात शक्य नाही. मात्र आमच्या पाच वर्षाच्या काळात नक्कीच बदल दिसेल असे ते म्हणाले.यावेळी त्यांनी ७० हजार कोटींचे विमान खरेदी करण्याच्या निर्णयावरही टिका केली. तत्कालीन सरकारची निती चुकीची होती. धानाचे भाव वाढले नाही हे सुद्धा तत्कालीन सरकारच्या चुकीच्या नितीचाच परिणाम असल्याचे ते म्हणाले.शेतकऱ्यांनी दुग्धोत्पादन, मध, मच्छोत्पादन अशा वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करावे, असा सल्ला गडकरींनी दिला. (शहर प्रतिनिधी)शिवणकरांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळलाएकेकाळी भाजपाचे राष्ट्रीय नेता असलेले माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांना भाजपाने वाळीत टाकले आहे. त्याचे पुत्र विजय शिवणकर राष्ट्रवादीच्या तंबूत गेले आहे. आमगाव आणि शिवणकर हे भाजपासाठी एक समीकरण होते. आता ती परिस्थिती राहिली नसताना प्रथमच गडकरी आमगावात आले. त्यामुळे ते शिवणकरांवर ताशेरे ओढण्याची संधी सोडणार नाही, असा अंदाज असताना त्यांनी जाणीवपूर्वक त्यांचा कोणताही उल्लेख भाषणात केला नाही.