शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

जागतिक मंदीमुळे धानाचे भाव पडले

By admin | Updated: June 28, 2015 01:10 IST

जागतिक मंदीमुळे धानाची निर्यात बंद झाली. धानाला योग्य भाव मिळेनासा झाला आहे, असे सांगतानाच शेतकऱ्यांनी धानाचे पिक बदलून आता दुसऱ्या पिकांकडे वळून आर्थिक संपन्नता साधली पाहीजे,

नितीन गडकरी : शेतकऱ्यांनी पिकात बदल करण्याची सूचनाआमगाव : जागतिक मंदीमुळे धानाची निर्यात बंद झाली. धानाला योग्य भाव मिळेनासा झाला आहे, असे सांगतानाच शेतकऱ्यांनी धानाचे पिक बदलून आता दुसऱ्या पिकांकडे वळून आर्थिक संपन्नता साधली पाहीजे, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. आमगाव येथील प्रचारसभेत ते बोलत होते.भाजपाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ना.गडकरी यांची जाहीर सभा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात दुपारी झाली. यावेळी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा.नाना पटोले, आ.संजय पुराम, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी आ.केशव मानकर, हेमंत पटले आदी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.प्रास्ताविक भाषणात विनोद अग्रवाल यांनी विरोधकांकडे मुद्देच नसल्यामुळे ते काहीतरी आरोप करून मतदारांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.ना.गडकरी यांनी आपल्या भाषणात गेल्या ६०-६५ वर्षांपासून सत्तारूढ असलेल्या काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. नेहरूजी, इंदिराजींच्या काळापासून आता राहुल गांधीपर्यंत सर्वजण गरीबी हटविण्याचा नारा देत आहेत. पण प्रत्यक्षात जनता तशीच आहे. नेत्यांची गरीबी मात्र दूर झाल्याचे ते म्हणाले. त्यांनी इतक्या वर्षात जे करून ठेवले ते बदलविणे एक वर्षात शक्य नाही. मात्र आमच्या पाच वर्षाच्या काळात नक्कीच बदल दिसेल असे ते म्हणाले.यावेळी त्यांनी ७० हजार कोटींचे विमान खरेदी करण्याच्या निर्णयावरही टिका केली. तत्कालीन सरकारची निती चुकीची होती. धानाचे भाव वाढले नाही हे सुद्धा तत्कालीन सरकारच्या चुकीच्या नितीचाच परिणाम असल्याचे ते म्हणाले.शेतकऱ्यांनी दुग्धोत्पादन, मध, मच्छोत्पादन अशा वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करावे, असा सल्ला गडकरींनी दिला. (शहर प्रतिनिधी)शिवणकरांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळलाएकेकाळी भाजपाचे राष्ट्रीय नेता असलेले माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांना भाजपाने वाळीत टाकले आहे. त्याचे पुत्र विजय शिवणकर राष्ट्रवादीच्या तंबूत गेले आहे. आमगाव आणि शिवणकर हे भाजपासाठी एक समीकरण होते. आता ती परिस्थिती राहिली नसताना प्रथमच गडकरी आमगावात आले. त्यामुळे ते शिवणकरांवर ताशेरे ओढण्याची संधी सोडणार नाही, असा अंदाज असताना त्यांनी जाणीवपूर्वक त्यांचा कोणताही उल्लेख भाषणात केला नाही.