शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

पोळा सणावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: September 9, 2015 01:53 IST

पावसाळ््याचे तीन महिने संपूनही गेले तरी हवालदिल झालेला शेतकरी अन् शेतमजूर अजूनही चातकाप्रमाणे वाट बघत आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

शेतकरी हवालदिल : कोरड्या दुष्काळाने हिरावला पुरणपोळीचा घास राहुल भुतांगे  तुमसरपावसाळ््याचे तीन महिने संपूनही गेले तरी हवालदिल झालेला शेतकरी अन् शेतमजूर अजूनही चातकाप्रमाणे वाट बघत आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. आठवडाभरावर पोळा सण येवून ठेपला आहे. तरीही पाऊस बेपत्ताच असल्याने शेतकऱ्यांच्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. परिणामी शेतकऱ्याबरोबर दिवस-रात्र काळ््या मातीची (आईची) सेवा करत राब-राब राबणाऱ्या बैलांच्या व शेतकऱ्यांच्या मुखातील पुरणपोळीचा घास यंदांच्या दुष्काळाने हिरावून घेतल्याची खंत शेतकरी व्यक्त करित आहेत.तुमसर तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत तसेच चिखलाजिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या गणेशपूर, पवनारखारी, लोभी, नाकाडोंगरी, पाथरी, कवलेवाडा, धुटेरा, चिखला, सितासांवगी, खंडाळे, गुढरी, सक्करदरा, मोकोटोला, चिचोली, राजापूर, हिरापूर, हमेशा, घानोड, भोंडकी, गोबरवाही, हेटी धामनेवाडा या गावात भीषण कोरड्या दुष्काळाचे चित्र बघावयास मिळत आहे. या गावातील ९० टक्के शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. मात्र पावसाने चांगलाच दगा दिल्याने गावातील तलाव तर सोडाच, परंतु जंगलव्याप्त रानतलावात बैलांना आंघोळ घालावी, इतकेही पाणी जमा झाले नाही. शेतकरी धान पिकाची शेती करणार तरी कसा, असा सवाल उपस्थित झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या हजारो हेक्टर जमिनी पडीकच ठेवल्याचे विदारक चित्र बघावयास मिळते. ज्या शेतकऱ्यांनी कसेबसे मिळेल त्या साधनांने धान पिकाची शेती केली त्या शेतकऱ्यांच्या विहरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. परिणामी शेतात घातलेला हजारो रुपयांचा रासायनिक खत दृष्टीस पडत असून मोठमोठ्या भेगा शेतात पडल्या आहेत. पिके करपायला लागले आहेत. चारा-पाण्याअभावी अर्धपोटी असलेली अशक्त झालेली जनावरे दावणीला हंबरडा फोडतांना पाहून शेतऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळू लागले आहे. हिरव्या शेताचे गत वैभव आठवत परिसरातील शेतकरी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन देत आहेत. शेतकऱ्यांच्या पोळा सणानिमित्त बैलांना आंघोळ घालण्यासाठी पाणी नाही आणि बाजारासाठी जवळ पैसे नाही.महागाईने उच्चांक गाठल्याने तिखटमिठावरच पोळा सण साजरा करण्याची वेळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांचा मित्र, आद्यदैवत बैलाना जिवंत ठेवण्याकरिता शेतकऱ्यांनी लावलेले मात्र पूर्णत: करपलेले पऱ्हे जनावरांसाठी वैरण बनविले आहेत.पोळा सण तोंडावर आला असून आता पावसाच्या आशा संपूर्णत: मावळत्या असून शासनानी या परिसरात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करावे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची व्यवस्था करुन शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळापासून दिलासा देण्याची गरज आहे.