शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रिमझिम पावसाने पिके बहरली

By admin | Updated: September 9, 2014 23:34 IST

गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे धानपिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११७२.८४ मिमी पाऊस पडतो.

७९ टक्के पाऊस : दोन जलाशयातून साठ्यापेक्षा अधिक विसर्गगोंदिया : गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे धानपिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११७२.८४ मिमी पाऊस पडतो. मात्र आतापर्यंत ९२१.०३ टक्के पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत ७९ टक्के पडलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील धानपिक चांगलेच बहरल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे वातावरणातील या बदलामुळे काही प्रमाणात किडींचा प्रादुर्भावही कमी झाला आहे.यावर्षी सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जिल्ह्यातील चार मुख्य जलाशयांपैकी पुजारीटोला व कालीसराड या दोन जलाशयातून जलसाठ्याच्या क्षमतेएवढे पाणी खरीप पीक वाचविण्यासाठी सोडण्यात आले आहे. तसेच सिंचनासाठी पाणी सोडणे सुरूच आहे. अशीच स्थिती राहीली तर उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जलाशय रिक्त होतील, अशी चिंता संबंधित विभागात व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील इटियाडोह जलाशयाच्या जलसाठ्याची क्षमता ३१८.८५ दलघमी आहे. सिरपूर जलाशयाची १९२.५२ दलघमी, पूजारीटोलाची ४८.६९ दलघमी व कालीसराड जलाशयाची २७.७५ दलघमी जलसाठ्याची क्षमता आहे. आतापर्यंत कालीसराडच्या डाव्या कालव्यातून ४४.९७४ एमएमक्यू व उजव्या कालव्यातून २७.०४७ एमएमक्यू पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले आहे. एकूण ७२.०२१ दलघमी पाण्याचा विसर्ग झालेला आहे. याशिवाय इटियाडोह जलाशयातून ७०.६२ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. इटियाडोहाच्या डाव्या कालव्यातून आताही पाणी सोडले जात आहे. यावर्षी सुरूवातीपासूनच पाऊस योग्य प्रमाणात पडला नाही. त्यामुळे पूजारीटोला, कालीसराड व इटियाडोह जलाशयातून सिंचनासाठी वेळेपूर्वीच पाणी सोडावे लागले. सिंचन विभागाच्या म्हणण्यानुसार २५ आॅक्टोबरपर्यंत शेतातील पीक वाचविण्यासाठी पाणी सोडण्याचा शासकीय आदेश आहे. त्यानुसार आता दीड महिन्यापर्यंत पाणी सोडले जावू शकते. परंतु जलसाठा कमी झाला तर पाणी सोडण्यात समस्या उद्भवू शकते. यानंतरही कमीत कमी एक महिन्यापर्यंत शेतातील पिकांना पाणी दिले जाईल. (प्रतिनिधी)