शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
6
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
7
आयोग नव्हे, मतदारच राजा !
8
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
9
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
10
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
11
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
12
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
13
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
14
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
15
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
16
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
17
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
18
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
19
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
20
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)

रिमझिम पावसाने पिके बहरली

By admin | Updated: September 9, 2014 23:34 IST

गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे धानपिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११७२.८४ मिमी पाऊस पडतो.

७९ टक्के पाऊस : दोन जलाशयातून साठ्यापेक्षा अधिक विसर्गगोंदिया : गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे धानपिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११७२.८४ मिमी पाऊस पडतो. मात्र आतापर्यंत ९२१.०३ टक्के पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत ७९ टक्के पडलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील धानपिक चांगलेच बहरल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे वातावरणातील या बदलामुळे काही प्रमाणात किडींचा प्रादुर्भावही कमी झाला आहे.यावर्षी सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जिल्ह्यातील चार मुख्य जलाशयांपैकी पुजारीटोला व कालीसराड या दोन जलाशयातून जलसाठ्याच्या क्षमतेएवढे पाणी खरीप पीक वाचविण्यासाठी सोडण्यात आले आहे. तसेच सिंचनासाठी पाणी सोडणे सुरूच आहे. अशीच स्थिती राहीली तर उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जलाशय रिक्त होतील, अशी चिंता संबंधित विभागात व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील इटियाडोह जलाशयाच्या जलसाठ्याची क्षमता ३१८.८५ दलघमी आहे. सिरपूर जलाशयाची १९२.५२ दलघमी, पूजारीटोलाची ४८.६९ दलघमी व कालीसराड जलाशयाची २७.७५ दलघमी जलसाठ्याची क्षमता आहे. आतापर्यंत कालीसराडच्या डाव्या कालव्यातून ४४.९७४ एमएमक्यू व उजव्या कालव्यातून २७.०४७ एमएमक्यू पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले आहे. एकूण ७२.०२१ दलघमी पाण्याचा विसर्ग झालेला आहे. याशिवाय इटियाडोह जलाशयातून ७०.६२ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. इटियाडोहाच्या डाव्या कालव्यातून आताही पाणी सोडले जात आहे. यावर्षी सुरूवातीपासूनच पाऊस योग्य प्रमाणात पडला नाही. त्यामुळे पूजारीटोला, कालीसराड व इटियाडोह जलाशयातून सिंचनासाठी वेळेपूर्वीच पाणी सोडावे लागले. सिंचन विभागाच्या म्हणण्यानुसार २५ आॅक्टोबरपर्यंत शेतातील पीक वाचविण्यासाठी पाणी सोडण्याचा शासकीय आदेश आहे. त्यानुसार आता दीड महिन्यापर्यंत पाणी सोडले जावू शकते. परंतु जलसाठा कमी झाला तर पाणी सोडण्यात समस्या उद्भवू शकते. यानंतरही कमीत कमी एक महिन्यापर्यंत शेतातील पिकांना पाणी दिले जाईल. (प्रतिनिधी)