शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

रिमझिम पावसाने पिके बहरली

By admin | Updated: September 9, 2014 23:34 IST

गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे धानपिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११७२.८४ मिमी पाऊस पडतो.

७९ टक्के पाऊस : दोन जलाशयातून साठ्यापेक्षा अधिक विसर्गगोंदिया : गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे धानपिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११७२.८४ मिमी पाऊस पडतो. मात्र आतापर्यंत ९२१.०३ टक्के पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत ७९ टक्के पडलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील धानपिक चांगलेच बहरल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे वातावरणातील या बदलामुळे काही प्रमाणात किडींचा प्रादुर्भावही कमी झाला आहे.यावर्षी सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जिल्ह्यातील चार मुख्य जलाशयांपैकी पुजारीटोला व कालीसराड या दोन जलाशयातून जलसाठ्याच्या क्षमतेएवढे पाणी खरीप पीक वाचविण्यासाठी सोडण्यात आले आहे. तसेच सिंचनासाठी पाणी सोडणे सुरूच आहे. अशीच स्थिती राहीली तर उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जलाशय रिक्त होतील, अशी चिंता संबंधित विभागात व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील इटियाडोह जलाशयाच्या जलसाठ्याची क्षमता ३१८.८५ दलघमी आहे. सिरपूर जलाशयाची १९२.५२ दलघमी, पूजारीटोलाची ४८.६९ दलघमी व कालीसराड जलाशयाची २७.७५ दलघमी जलसाठ्याची क्षमता आहे. आतापर्यंत कालीसराडच्या डाव्या कालव्यातून ४४.९७४ एमएमक्यू व उजव्या कालव्यातून २७.०४७ एमएमक्यू पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले आहे. एकूण ७२.०२१ दलघमी पाण्याचा विसर्ग झालेला आहे. याशिवाय इटियाडोह जलाशयातून ७०.६२ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. इटियाडोहाच्या डाव्या कालव्यातून आताही पाणी सोडले जात आहे. यावर्षी सुरूवातीपासूनच पाऊस योग्य प्रमाणात पडला नाही. त्यामुळे पूजारीटोला, कालीसराड व इटियाडोह जलाशयातून सिंचनासाठी वेळेपूर्वीच पाणी सोडावे लागले. सिंचन विभागाच्या म्हणण्यानुसार २५ आॅक्टोबरपर्यंत शेतातील पीक वाचविण्यासाठी पाणी सोडण्याचा शासकीय आदेश आहे. त्यानुसार आता दीड महिन्यापर्यंत पाणी सोडले जावू शकते. परंतु जलसाठा कमी झाला तर पाणी सोडण्यात समस्या उद्भवू शकते. यानंतरही कमीत कमी एक महिन्यापर्यंत शेतातील पिकांना पाणी दिले जाईल. (प्रतिनिधी)