शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

ढगाळ वातावरणामुळे तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: December 13, 2015 01:59 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे धान पिकाने दगा दिला. शेतकऱ्यांच्या पूर्ण आशा तूर पिकावर होत्या मात्र त्या पिकावर विविध रोगाने आक्रमण केले.

शेतकरी चिंताग्रस्त : कृषी अधिकारी मार्गदर्शन करीत नाहीरावणवाडी : निसर्गाच्या लहरीपणामुळे धान पिकाने दगा दिला. शेतकऱ्यांच्या पूर्ण आशा तूर पिकावर होत्या मात्र त्या पिकावर विविध रोगाने आक्रमण केले. चिंतातूर शेतकऱ्यांचा आशेवर पाणी फेरले जाण्याची शक्यता शेतकऱ्यांना आतापासूनच सतावत आहे. यावर्षी धानाचा उत्पादनात मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. तूरीचे पिक हाती येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र तेही हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशात वर्षभराचा कुटूंबाचा गाडा कसा चालवायचा वेळेवर आलेले प्रासंगीक खर्च करायचे कसे याची काळजी शेतकऱ्यांना आतापासूनच सतावू लागली आहे. परिसरातील शेतपिकाची एवढी गंभीर परिस्थिती असतानाही जिल्हा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कुठलेही मार्गदर्शन मिळत नाही. शेतकऱ्यांचा शेतापर्यंत पोहचण्याची तसदी घेत नसल्यामुळे शेतकरी पुन्हा दुहेरी संकटात सापडण्याची चिन्हे आता पासूनच दिसत आहे. दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सरळ शेतकऱ्यांना बसत आहे. पावसाने बऱ्याच काळापर्यंत दही आणि आवश्यकतेच्या वेळी पावसाची माघारमुळे धानाचे नगदी पिक हातून गेले ऐनवेळी पावसाची गरज असताना त्यावेळी पाऊस बरसला नाही. त्यामुळे तूर पिकाचे उत्पन्न हाती येईलच अशी मनस्थिती शेतकऱ्याची होती. त्यातून कुटूंबाचा निर्वाह होईल मात्र उलटच होऊन नियमित ढगाळ वातावरणामुळे पिकावर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. यास्थितीत काय उपाय योजना करायला पाहिजे. त्याबद्दल शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळत नाही. शेतकरी संकटात सापडले असताना त्यांना साधे मार्गदर्शन कृषी कार्यालयाकडून होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. (वार्ताहर)