शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: December 13, 2015 01:59 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे धान पिकाने दगा दिला. शेतकऱ्यांच्या पूर्ण आशा तूर पिकावर होत्या मात्र त्या पिकावर विविध रोगाने आक्रमण केले.

शेतकरी चिंताग्रस्त : कृषी अधिकारी मार्गदर्शन करीत नाहीरावणवाडी : निसर्गाच्या लहरीपणामुळे धान पिकाने दगा दिला. शेतकऱ्यांच्या पूर्ण आशा तूर पिकावर होत्या मात्र त्या पिकावर विविध रोगाने आक्रमण केले. चिंतातूर शेतकऱ्यांचा आशेवर पाणी फेरले जाण्याची शक्यता शेतकऱ्यांना आतापासूनच सतावत आहे. यावर्षी धानाचा उत्पादनात मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. तूरीचे पिक हाती येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र तेही हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशात वर्षभराचा कुटूंबाचा गाडा कसा चालवायचा वेळेवर आलेले प्रासंगीक खर्च करायचे कसे याची काळजी शेतकऱ्यांना आतापासूनच सतावू लागली आहे. परिसरातील शेतपिकाची एवढी गंभीर परिस्थिती असतानाही जिल्हा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कुठलेही मार्गदर्शन मिळत नाही. शेतकऱ्यांचा शेतापर्यंत पोहचण्याची तसदी घेत नसल्यामुळे शेतकरी पुन्हा दुहेरी संकटात सापडण्याची चिन्हे आता पासूनच दिसत आहे. दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सरळ शेतकऱ्यांना बसत आहे. पावसाने बऱ्याच काळापर्यंत दही आणि आवश्यकतेच्या वेळी पावसाची माघारमुळे धानाचे नगदी पिक हातून गेले ऐनवेळी पावसाची गरज असताना त्यावेळी पाऊस बरसला नाही. त्यामुळे तूर पिकाचे उत्पन्न हाती येईलच अशी मनस्थिती शेतकऱ्याची होती. त्यातून कुटूंबाचा निर्वाह होईल मात्र उलटच होऊन नियमित ढगाळ वातावरणामुळे पिकावर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. यास्थितीत काय उपाय योजना करायला पाहिजे. त्याबद्दल शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळत नाही. शेतकरी संकटात सापडले असताना त्यांना साधे मार्गदर्शन कृषी कार्यालयाकडून होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. (वार्ताहर)