शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

ढगाळ वातावरणामुळे तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: December 13, 2015 01:59 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे धान पिकाने दगा दिला. शेतकऱ्यांच्या पूर्ण आशा तूर पिकावर होत्या मात्र त्या पिकावर विविध रोगाने आक्रमण केले.

शेतकरी चिंताग्रस्त : कृषी अधिकारी मार्गदर्शन करीत नाहीरावणवाडी : निसर्गाच्या लहरीपणामुळे धान पिकाने दगा दिला. शेतकऱ्यांच्या पूर्ण आशा तूर पिकावर होत्या मात्र त्या पिकावर विविध रोगाने आक्रमण केले. चिंतातूर शेतकऱ्यांचा आशेवर पाणी फेरले जाण्याची शक्यता शेतकऱ्यांना आतापासूनच सतावत आहे. यावर्षी धानाचा उत्पादनात मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. तूरीचे पिक हाती येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र तेही हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशात वर्षभराचा कुटूंबाचा गाडा कसा चालवायचा वेळेवर आलेले प्रासंगीक खर्च करायचे कसे याची काळजी शेतकऱ्यांना आतापासूनच सतावू लागली आहे. परिसरातील शेतपिकाची एवढी गंभीर परिस्थिती असतानाही जिल्हा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कुठलेही मार्गदर्शन मिळत नाही. शेतकऱ्यांचा शेतापर्यंत पोहचण्याची तसदी घेत नसल्यामुळे शेतकरी पुन्हा दुहेरी संकटात सापडण्याची चिन्हे आता पासूनच दिसत आहे. दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सरळ शेतकऱ्यांना बसत आहे. पावसाने बऱ्याच काळापर्यंत दही आणि आवश्यकतेच्या वेळी पावसाची माघारमुळे धानाचे नगदी पिक हातून गेले ऐनवेळी पावसाची गरज असताना त्यावेळी पाऊस बरसला नाही. त्यामुळे तूर पिकाचे उत्पन्न हाती येईलच अशी मनस्थिती शेतकऱ्याची होती. त्यातून कुटूंबाचा निर्वाह होईल मात्र उलटच होऊन नियमित ढगाळ वातावरणामुळे पिकावर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. यास्थितीत काय उपाय योजना करायला पाहिजे. त्याबद्दल शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळत नाही. शेतकरी संकटात सापडले असताना त्यांना साधे मार्गदर्शन कृषी कार्यालयाकडून होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. (वार्ताहर)