शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
7
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
8
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
9
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
10
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
11
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
12
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
13
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
14
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
15
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
16
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
17
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
18
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
19
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
20
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा

साईनाथ अ‍ॅग्री कंपनीतील राखेमुळे पिकांची राखरांगोळी

By admin | Updated: February 19, 2017 00:16 IST

धानावर प्रक्रिया करून तांदूळ तयार करणाऱ्या एका कंपनीतुन धूर, गरम राख व रसायनयुक्त पाणी यामुळे मागील तीन वर्षात

शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ : तीन वर्षात शेतीचे लाखोंचे नुकसान खरबी (नाका) : धानावर प्रक्रिया करून तांदूळ तयार करणाऱ्या एका कंपनीतुन धूर, गरम राख व रसायनयुक्त पाणी यामुळे मागील तीन वर्षात परिसरातील शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागत आहे. कंपनीचा कोट्यवधींचा फायदा होत असला तरी या प्रकारामुळे शेतकरी मात्र लाखो रूपयाने तोटा सहन करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाकडे नुकसान भरपाईची मागणी करूनही कपंनीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच प्रदूषण विभाग, कृषी विभाग व जिल्हाधिकारी यांना वारंवार तक्रार करून सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरी निराश आली आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या खरबी व खराडी परिसरातील शेतकरी मागील बराच वर्षापासून धान, भाजीपाला, हिरवी मिरची, तुळ, सोयाबीन, कपाशी, हरभरा अशी इतर अनेक पिके घेतली जाते. आतापर्यंत सुरळीत सुरू असलेल्या शेतपिकांचा उत्पादनाचे काम मागील तीन वर्षाचा अडचणीत आले आहे. कोंडबा हिवसे यांच्या शेतीला लागून तीन वर्षापूर्वी साईनाथ अ‍ॅग्री इंडस्ट्रीज नावाने धानावर प्रक्रिया करून तांदूळ तयार करण्याचा प्रकल्प उभारला गेला. आधुनिक पद्धतीच्या या प्रकल्पामध्ये धान उकळून तांदूळ निर्मिती करण्यात येत असल्याने भट्टीसाठी विजेचा उपयोग केला जातो. जळालेल्या धानाच्या कोंड्याची गरम राख व बाहेर पडणारी धुळ ही लगतच्या शेतामध्ये पिकांवर जाऊन पडत असल्याने पिकांची नासाडी होत आहे. गरम राखेमुळे व धुरामुळे शेतातील पिके करपत आहे. शेतामधील पीक काळेकुट्ट पडले आहे. शेतामध्ये मजूर काम करायला सुद्धा येत नाही. आल्यास मजूर दिवसभरात काळेकुट्टे होत असून शरीरावर इजा होण्याची शक्यता जास्त आहे. मागील तीन वर्षापासून शेतकऱ्याना हा त्रास सहन करावा लागत आहे. आतापर्यंत ५० लाखांचे नुकसान सहन करावे लागल्याची खंत शेतकऱ्याचा मुलगा हरीचंद्र हिवसे यांने ‘लोकमत’ला सांगितले. शेतकऱ्याने जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण विभाग, कृषी विभाग यांना मागील एका वर्षापूर्वीपासून तक्रार केली असून सुद्धा कोणत्याही प्रकारच्या सकारात्मक कारवाई होताना दिसत नसल्याने येथील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. शेतकऱ्यांनी कर्ज फेडावे की पोट भरावे असा प्रश्न आता शेतकऱ्यासमोर निर्माण झाला आहे. शेतकऱ्याने इच्छा मरणाची मागणीही केली आहे, असे शेतकऱ्याने बोलून दाखविले. लाखो रूपयांचे पीक देणारी शेती तीन भावाचे कुटूंब व शेतमजूरांच्या कुटुंबाचे पालन पोषण करीत होती. मात्र उत्पादन येणे बंद झाल्याने कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. अखेरची आस म्हणून २० फेब्रुवारीला होणाऱ्या जनता दरबारामध्ये आपले प्रकरण सादर करून कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. न्याय मिळावा या अपेक्षेवर शेतकरी काळवंटलेल्या पिकांकडे पाहून दिवस काढीत आहे. (वार्ताहर)