शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

साईनाथ अ‍ॅग्री कंपनीतील राखेमुळे पिकांची राखरांगोळी

By admin | Updated: February 19, 2017 00:16 IST

धानावर प्रक्रिया करून तांदूळ तयार करणाऱ्या एका कंपनीतुन धूर, गरम राख व रसायनयुक्त पाणी यामुळे मागील तीन वर्षात

शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ : तीन वर्षात शेतीचे लाखोंचे नुकसान खरबी (नाका) : धानावर प्रक्रिया करून तांदूळ तयार करणाऱ्या एका कंपनीतुन धूर, गरम राख व रसायनयुक्त पाणी यामुळे मागील तीन वर्षात परिसरातील शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागत आहे. कंपनीचा कोट्यवधींचा फायदा होत असला तरी या प्रकारामुळे शेतकरी मात्र लाखो रूपयाने तोटा सहन करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाकडे नुकसान भरपाईची मागणी करूनही कपंनीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच प्रदूषण विभाग, कृषी विभाग व जिल्हाधिकारी यांना वारंवार तक्रार करून सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरी निराश आली आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या खरबी व खराडी परिसरातील शेतकरी मागील बराच वर्षापासून धान, भाजीपाला, हिरवी मिरची, तुळ, सोयाबीन, कपाशी, हरभरा अशी इतर अनेक पिके घेतली जाते. आतापर्यंत सुरळीत सुरू असलेल्या शेतपिकांचा उत्पादनाचे काम मागील तीन वर्षाचा अडचणीत आले आहे. कोंडबा हिवसे यांच्या शेतीला लागून तीन वर्षापूर्वी साईनाथ अ‍ॅग्री इंडस्ट्रीज नावाने धानावर प्रक्रिया करून तांदूळ तयार करण्याचा प्रकल्प उभारला गेला. आधुनिक पद्धतीच्या या प्रकल्पामध्ये धान उकळून तांदूळ निर्मिती करण्यात येत असल्याने भट्टीसाठी विजेचा उपयोग केला जातो. जळालेल्या धानाच्या कोंड्याची गरम राख व बाहेर पडणारी धुळ ही लगतच्या शेतामध्ये पिकांवर जाऊन पडत असल्याने पिकांची नासाडी होत आहे. गरम राखेमुळे व धुरामुळे शेतातील पिके करपत आहे. शेतामधील पीक काळेकुट्ट पडले आहे. शेतामध्ये मजूर काम करायला सुद्धा येत नाही. आल्यास मजूर दिवसभरात काळेकुट्टे होत असून शरीरावर इजा होण्याची शक्यता जास्त आहे. मागील तीन वर्षापासून शेतकऱ्याना हा त्रास सहन करावा लागत आहे. आतापर्यंत ५० लाखांचे नुकसान सहन करावे लागल्याची खंत शेतकऱ्याचा मुलगा हरीचंद्र हिवसे यांने ‘लोकमत’ला सांगितले. शेतकऱ्याने जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण विभाग, कृषी विभाग यांना मागील एका वर्षापूर्वीपासून तक्रार केली असून सुद्धा कोणत्याही प्रकारच्या सकारात्मक कारवाई होताना दिसत नसल्याने येथील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. शेतकऱ्यांनी कर्ज फेडावे की पोट भरावे असा प्रश्न आता शेतकऱ्यासमोर निर्माण झाला आहे. शेतकऱ्याने इच्छा मरणाची मागणीही केली आहे, असे शेतकऱ्याने बोलून दाखविले. लाखो रूपयांचे पीक देणारी शेती तीन भावाचे कुटूंब व शेतमजूरांच्या कुटुंबाचे पालन पोषण करीत होती. मात्र उत्पादन येणे बंद झाल्याने कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. अखेरची आस म्हणून २० फेब्रुवारीला होणाऱ्या जनता दरबारामध्ये आपले प्रकरण सादर करून कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. न्याय मिळावा या अपेक्षेवर शेतकरी काळवंटलेल्या पिकांकडे पाहून दिवस काढीत आहे. (वार्ताहर)