शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

दारूमुळेच होत आहेत महिलांचे संसार उद्ध्वस्त

By admin | Updated: March 8, 2015 01:14 IST

जिल्ह्यात पती-पत्नीत निर्माण होणारा कलह दारूमुळे होत आहे. पतीला दारूचे व्यसन जडल्यामुळे घर खर्चासाठी पैसे देत नाही म्हणून पती-पत्नीत कलह होऊन घटस्फोटापर्यंत प्रकरणे जातात.

लोकमतमुलाखतगोंदिया : जिल्ह्यात पती-पत्नीत निर्माण होणारा कलह दारूमुळे होत आहे. पतीला दारूचे व्यसन जडल्यामुळे घर खर्चासाठी पैसे देत नाही म्हणून पती-पत्नीत कलह होऊन घटस्फोटापर्यंत प्रकरणे जातात. याशिवाय नवीन जोडप्यांमध्येही एकमेकांना समजून घेण्याचे प्रमाण कमी आहे. त्यातूनही घटस्फोटाच्या दारापर्यंत प्रकरणे येऊन ठेपतात. या प्रकरणांत समझोता घडवून आणण्यासाठी महिला समुपदेशन केंद्र प्रयत्नशील आहे. मात्र प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर यादृष्टीने अधिक चांगल्या पद्धतीने समुपदेशन झाल्यास अशा तक्रारींचे प्रमाण अजून कमी होऊ शकते, असे मत गोंदिया शहर ठाण्यातील महिला समुपदेश केंद्राच्या सहायक पोलीस निरीक्षक सरिता भांड यांनी व्यक्त केले.महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या येणाऱ्या तक्रारी, त्यामागील पार्श्वभूमी आणि उपाय यावर ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. महिलांच्या पती व सासुरच्या मंडळींविषयी करण्यात आलेल्या तक्रारी निपटारा करण्यासाठी पोलीस विभागामार्फत जिल्हास्तरावर महिला समूपदेशन केंद्र तयार करण्यात आले. सन २०१४ या वर्षात पोलिसात सासरच्या मंडळींविषयी करण्यात आलेल्या ३९६ तक्रारी करण्यात आल्या. यापैकी १७८ प्रकरणात तडजोड करून त्यांना त्यांच्या संसारिक जीवनात या महिला तक्रार निवारण केंद्राने गुंतविले. समजावूनही ऐकत नसलेल्या ८१ दाम्पत्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा सल्ला शेवटी त्यांना देण्यात आला.वारंवार नोटीस पाठवूनही समझोता करण्यासाठी समूपदेशन केंद्रात न येणाऱ्या १०६ प्रकरणांना फाईलबंद करण्यात आले. सन २०१५ मध्ये ५५ प्रकरणे दाखल करण्यात आली. या सर्व प्रकरणांची परिस्थिती पाहता पतीला जडलेले दारूचे व्यसन, त्यातच घर सांभाळण्यासाठी पैसे देत नसल्यामुळे बहुतांश महिलांनी पतीविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांत महिलांचे समूपदेशन करण्यासाठी पोलीस विभागाकडून समूपदेशन केंद्र नाहीत. मात्र गोरेगाव, सडक-अर्जुनी व आमगाव येथे पंचायत समितीकडून समूपदेशन केंद्र तर जिल्हा परिषदेकडून गोंदिया शहरात समूपदेशन केंद्र आहे. महिला व बालविकास आयुक्तालय, पुणेतर्फे दिशा महिला समूपदेशन जिल्ह्यातील तिरोडा, अर्जुनी-मोरगाव, देवरी व गोंदिया या चार पोलीस उघडण्यात आले आहेत. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी किंवा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यांत पोलीस विभागाकडून तक्रार निवारण केंद्र आहे. मात्र तिथे वकील उपलब्ध नाही. जी प्रकरणे त्या स्तरावर हाताळणे शक्य होत नाही त्यांना जिल्हास्तरावर पाठविले जाते. (तालुका प्रतिनिधी)हेल्पलाईनवर ४ वर्षापासून एकही तक्रार नाहीमहिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी गोंदिया पोलीस विभागातर्फे सन २०११ मध्ये नियंत्रण कक्षात टोल फ्री हेल्पलाईन क्र.१०९१ हे तयार करण्यात आला. परंतु या हेल्पलाईनच्या क्रमांकावर मागील चार वर्षात महिलांची एकही तक्रार आली नाही हे विशेष. म्हणजेच महिलांच्या हेल्पलाईनविषयी जनजागृती करण्यात कुठेतरी कसर राहिली, असे यावरून म्हणता येईल.