शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

तिरोडा तालुक्यावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 5, 2015 01:57 IST

तिरोडा तालुक्यात पावसाअभावी रोवण्या थांबल्या असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील जुन व जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली होती.

शेतीची कामे खोळंबली : बळीराजाच्या डोळ्यात पाणी इंदोरा-बु. : तिरोडा तालुक्यात पावसाअभावी रोवण्या थांबल्या असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील जुन व जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. यात शेतकऱ्यांनी शेतामध्ये धान रोवणी पासून शेतीची मशागत केली. जुलै महिन्यात पावसाने सुरवात केली परंतु शेतीला रोवणीसाठी पाहिजे तसा पाऊस आला नाही. धानाच्या खारी जगल्या परंतु अनेक शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे अजुनपर्यंत लावले नाही. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनीच रोवणी केली आहे. मात्र वरथेंबी पाण्यावर अवलंबून असलेल्या ६५ टक्के शेतकऱ्यांनी रोवणी केलेली नाही. त्यामुळे यंदा दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. तिरोडा तालुक्यातील चिरेखनी, पालडोंगरी, करटी-बु., करटी-खु., बघोली, परसवाडा, खैरलांजी, अर्जुनी, सावरा पिपरीया, बोरा, गोंडमोहाळी या गावात अनेक शेतकऱ्यांनी रोवणी केली नाही. या भागात पावसाळा लागला तेव्हा पासून बांध्यामध्ये साचेल असा पाऊस आलाच नाही. जुन-जुलै महिना संपला आॅगस्ट महिना लागला तरी पाहिजे तसा पाऊस जिल्ह्यात बरसलेला नाही. पाऊस कधी बसरणार याची वाट शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पाण्याच्या कमीपणामुळे हलक्या प्रतीच्या धानाची पेरणी केली आहे. त्या धानाची रोवणी आज घडीला झाली पाहिजे होती. परंतु पावसाअभावी रोवणी खोळंबली आहे. या महिन्याच्या सुरूवातीला पाऊस आला नाही तर हलके धान होणार नाही याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. पाऊस नसल्यामुळे धानाच्या खारी लाल झाल्या व मरणाच्या अवस्थेत आहेत. १५ आॅगस्ट पर्यंत धानाच्या रोवण्या झाल्या पाहिजे, तेव्हाच धानाचे पीक होऊ शकते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आॅगस्टचा पहिला आठवडा संपण्याच्या मार्गावर असूनही पाऊस आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रोवण्यांना घेऊन संभ्रमाची स्थिती आहे. एकीकडे रोवणी न झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर रोवणी झालेल्यांना आता रोवणी जगावी यासाठी पाण्याची गरज आहे. एकंदर ईकडे आड व तिकडे विहीर अशी पंचाईत शेतकऱ्यांची झाली आहे. त्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. (वार्ताहर)