शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा तालुक्यावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 5, 2015 01:57 IST

तिरोडा तालुक्यात पावसाअभावी रोवण्या थांबल्या असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील जुन व जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली होती.

शेतीची कामे खोळंबली : बळीराजाच्या डोळ्यात पाणी इंदोरा-बु. : तिरोडा तालुक्यात पावसाअभावी रोवण्या थांबल्या असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील जुन व जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. यात शेतकऱ्यांनी शेतामध्ये धान रोवणी पासून शेतीची मशागत केली. जुलै महिन्यात पावसाने सुरवात केली परंतु शेतीला रोवणीसाठी पाहिजे तसा पाऊस आला नाही. धानाच्या खारी जगल्या परंतु अनेक शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे अजुनपर्यंत लावले नाही. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनीच रोवणी केली आहे. मात्र वरथेंबी पाण्यावर अवलंबून असलेल्या ६५ टक्के शेतकऱ्यांनी रोवणी केलेली नाही. त्यामुळे यंदा दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. तिरोडा तालुक्यातील चिरेखनी, पालडोंगरी, करटी-बु., करटी-खु., बघोली, परसवाडा, खैरलांजी, अर्जुनी, सावरा पिपरीया, बोरा, गोंडमोहाळी या गावात अनेक शेतकऱ्यांनी रोवणी केली नाही. या भागात पावसाळा लागला तेव्हा पासून बांध्यामध्ये साचेल असा पाऊस आलाच नाही. जुन-जुलै महिना संपला आॅगस्ट महिना लागला तरी पाहिजे तसा पाऊस जिल्ह्यात बरसलेला नाही. पाऊस कधी बसरणार याची वाट शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पाण्याच्या कमीपणामुळे हलक्या प्रतीच्या धानाची पेरणी केली आहे. त्या धानाची रोवणी आज घडीला झाली पाहिजे होती. परंतु पावसाअभावी रोवणी खोळंबली आहे. या महिन्याच्या सुरूवातीला पाऊस आला नाही तर हलके धान होणार नाही याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. पाऊस नसल्यामुळे धानाच्या खारी लाल झाल्या व मरणाच्या अवस्थेत आहेत. १५ आॅगस्ट पर्यंत धानाच्या रोवण्या झाल्या पाहिजे, तेव्हाच धानाचे पीक होऊ शकते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आॅगस्टचा पहिला आठवडा संपण्याच्या मार्गावर असूनही पाऊस आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रोवण्यांना घेऊन संभ्रमाची स्थिती आहे. एकीकडे रोवणी न झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर रोवणी झालेल्यांना आता रोवणी जगावी यासाठी पाण्याची गरज आहे. एकंदर ईकडे आड व तिकडे विहीर अशी पंचाईत शेतकऱ्यांची झाली आहे. त्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. (वार्ताहर)