शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

तिरोडा तालुक्यावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 5, 2015 01:57 IST

तिरोडा तालुक्यात पावसाअभावी रोवण्या थांबल्या असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील जुन व जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली होती.

शेतीची कामे खोळंबली : बळीराजाच्या डोळ्यात पाणी इंदोरा-बु. : तिरोडा तालुक्यात पावसाअभावी रोवण्या थांबल्या असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील जुन व जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. यात शेतकऱ्यांनी शेतामध्ये धान रोवणी पासून शेतीची मशागत केली. जुलै महिन्यात पावसाने सुरवात केली परंतु शेतीला रोवणीसाठी पाहिजे तसा पाऊस आला नाही. धानाच्या खारी जगल्या परंतु अनेक शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे अजुनपर्यंत लावले नाही. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनीच रोवणी केली आहे. मात्र वरथेंबी पाण्यावर अवलंबून असलेल्या ६५ टक्के शेतकऱ्यांनी रोवणी केलेली नाही. त्यामुळे यंदा दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. तिरोडा तालुक्यातील चिरेखनी, पालडोंगरी, करटी-बु., करटी-खु., बघोली, परसवाडा, खैरलांजी, अर्जुनी, सावरा पिपरीया, बोरा, गोंडमोहाळी या गावात अनेक शेतकऱ्यांनी रोवणी केली नाही. या भागात पावसाळा लागला तेव्हा पासून बांध्यामध्ये साचेल असा पाऊस आलाच नाही. जुन-जुलै महिना संपला आॅगस्ट महिना लागला तरी पाहिजे तसा पाऊस जिल्ह्यात बरसलेला नाही. पाऊस कधी बसरणार याची वाट शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पाण्याच्या कमीपणामुळे हलक्या प्रतीच्या धानाची पेरणी केली आहे. त्या धानाची रोवणी आज घडीला झाली पाहिजे होती. परंतु पावसाअभावी रोवणी खोळंबली आहे. या महिन्याच्या सुरूवातीला पाऊस आला नाही तर हलके धान होणार नाही याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. पाऊस नसल्यामुळे धानाच्या खारी लाल झाल्या व मरणाच्या अवस्थेत आहेत. १५ आॅगस्ट पर्यंत धानाच्या रोवण्या झाल्या पाहिजे, तेव्हाच धानाचे पीक होऊ शकते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आॅगस्टचा पहिला आठवडा संपण्याच्या मार्गावर असूनही पाऊस आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रोवण्यांना घेऊन संभ्रमाची स्थिती आहे. एकीकडे रोवणी न झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर रोवणी झालेल्यांना आता रोवणी जगावी यासाठी पाण्याची गरज आहे. एकंदर ईकडे आड व तिकडे विहीर अशी पंचाईत शेतकऱ्यांची झाली आहे. त्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. (वार्ताहर)