शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

दुष्काळग्रस्त शेतकरी आर्थिक मोबदल्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:45 IST

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने १३ हजार ५०० ते १८ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई दिल्याचे मोठमोठे फलक लावून भाजपा नेत्यांनी श्रेय लाटले. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात केवळ हेक्टरी १ हजार ते १५०० रुपयांचा मोबदला मिळाला.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने १३ हजार ५०० ते १८ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई दिल्याचे मोठमोठे फलक लावून भाजपा नेत्यांनी श्रेय लाटले. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात केवळ हेक्टरी १ हजार ते १५०० रुपयांचा मोबदला मिळाला. स्थानिक भाजपा नेते केवळ श्रेयाचे राजकारण करीत असून खोटी माहिती देवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी अद्यापही योग्य आर्थिक मोबदल्यापासून वंचित असल्याचा आरोप आ.गोपालदास अग्रवाल यांनी केला.तालुक्यातील भाद्याटोला-जिरुटोला रस्ता रुंदीकरण कामाच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.शिक्षण सभापती रमेश अंबुले, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, देवेंद्र मानकर, लोकचंद दंदरे, बबीता देवाधारी, कैलाश देवाधारी, आनंद तुरकर, आशिष चव्हाण, झनकसिंग तुरकर, कत्तेलाल मातरे, निर्वतीबाई पाचे, दिलीप तुरकर, कपुरचंद पाचे, रामभगत पाचे, कांतीबाई पाचे, नेतलाल मात्रे, केशव नागफासे, महेश देवाधारी, संजय देवाधारी, बालाराम खैरवार, माणिकचंद तुरकर, श्यामराव तुरकर, धनिराम नागफासे उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले, बाघनदी परिसरातील सर्व रस्ते चांगले तयार करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.रस्त्यांसह या परिसरातील सिंचन, आरोग्य व नागरिकांच्या इतर समस्या मार्गी लावण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. अंबुले म्हणाले विरोधी पक्षातील आमदारांना शासनाकडून निधी खेचून आणणे हे सोपे काम नाही. मा.आ.अग्रवाल यांनी आपले राजकीय वजन वापरून तालुक्याच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. त्यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्यात विविध विकास कामे सुरू आहे. तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल