शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
4
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
5
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
6
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
7
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
8
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
9
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
11
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
12
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
13
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
14
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
15
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
16
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
17
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
18
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
19
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
20
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

कालव्याची पाळ फुटल्याने शेतात पाणीच पाणी

By admin | Updated: August 23, 2014 01:53 IST

मालकनपूरनजीक साखळी क्रमांक १६३०० या स्थळी इटियाडोह धरणाच्या कालव्याची पाळ फुटली. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने धानपिकाचे मोठे नुकसान झाले.

अर्जुनी/मोरगाव : मालकनपूरनजीक साखळी क्रमांक १६३०० या स्थळी इटियाडोह धरणाच्या कालव्याची पाळ फुटली. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने धानपिकाचे मोठे नुकसान झाले. लायनिंगला तडे जावून पाळ फुटल्यांचे बोलल्या जात आहे.प्राप्त माहितीनुसार, तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली. रोवणी झाल्यानंतर शेतात पाणी नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. इटियाडोह पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता कालव्यातून पाणी सोडले. या कालव्यांची पाणी वहन क्षमता १४०० क्युसेक्स आहे. धरणातून कालव्यात ६०० क्युसेस पाणी सोडण्यात आले. या धरणाचे लाभक्षेत्र भंडारा जिल्ह्यातील बारव्हापर्यंत ७२ किमी आहे. या शेवटच्या टोकावर कालव्याचे पाणी पोहोचत नाही म्हणून पाणीवापर संस्थेने विभागाकडे १ हजार क्युसेस पाणी सोडल्याचा आग्रह धरला.कालव्यातून ११०० क्युसेस पाणी सोडण्यात आले. शुक्रवारी (२२) सकाळी १२ वाजताच्या सुमारास पाळ खचत असल्याची माहिती शाखा अभियंता चौरागडे यांना मिळाली. त्यांनी त्याचक्षणी धरणातून कालव्यात सोडण्यात येणारे पाणी बंद केले. बघता बघता निकृष्ट असलेले लायनिंग तुटले व सुमारे १० मीटर पर्यंतच्या पाळीला भगदाड पडले. कालव्यानजीक असलेल्या चिंतामण ठाकरे, चैतराम कलारी, आनंदराव कलारी, फागो कलारी, बुद्धी साफा, किसन वाळवे, बळीराम नेवारे व डोंगरे माहुरकुडा या शेतकऱ्यांचे सुमारे १४ एकर शेतीत पाणी घुसले. पाणी पसरण्यासाठी जागा नसल्याने शेतात घुसलेले पाणी परत कालव्याकडे येत आहे. हा कालवा बंद झाल्यानंतर पुर्णत: बंद व्हायला सुमारे १८ तास लागतात. त्यामुळे साचलेल्या पाण्यात धानपीक काही प्रमाणात सडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जागतिक बँकेच्या सहकार्याने २०१० मध्ये कालव्याच्या काही भागात सिमेंट काँक्रिटचे लायनिंगचे काम झाले आहे. यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने कालवा फुटला असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. विशेष उल्लेखनिय म्हणजे मातीकाम असलेल्या ठिकाणी ही पाळ न फुटता सिमेंट काँक्रिटने तयार केलेल्या आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कालव्याच्या पाळीला छिद्र असल्याची बाब उन्हाळ्यात संबंधित विभागाला सांगण्यात आली होती. मात्र याकडे कानाडोळा केल्यामुळे ही घटना घडण्याचे शेतकरी सांगतात. घटनास्थळाला उपविभागीय अभियंता राठोड, शाखा अभियंता दिलीप चौरागडे यांनी भेट देऊन पाहणी केली. धरणाचे पाणी बंद करण्यात आले. ते उद्या (दि.२३) दूपारपर्यंत पुर्णत: बंद होईल व फुटलेल्या ठिकाणी विभागाला दुरुस्तीकाम करणे सुलभ होईल. हे काम दोन दिवसात पुर्ण होईल अशी अपेक्षा इटियाडोह पटबंधारे उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)