शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याची पाळ फुटल्याने शेतात पाणीच पाणी

By admin | Updated: August 23, 2014 01:53 IST

मालकनपूरनजीक साखळी क्रमांक १६३०० या स्थळी इटियाडोह धरणाच्या कालव्याची पाळ फुटली. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने धानपिकाचे मोठे नुकसान झाले.

अर्जुनी/मोरगाव : मालकनपूरनजीक साखळी क्रमांक १६३०० या स्थळी इटियाडोह धरणाच्या कालव्याची पाळ फुटली. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने धानपिकाचे मोठे नुकसान झाले. लायनिंगला तडे जावून पाळ फुटल्यांचे बोलल्या जात आहे.प्राप्त माहितीनुसार, तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली. रोवणी झाल्यानंतर शेतात पाणी नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. इटियाडोह पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता कालव्यातून पाणी सोडले. या कालव्यांची पाणी वहन क्षमता १४०० क्युसेक्स आहे. धरणातून कालव्यात ६०० क्युसेस पाणी सोडण्यात आले. या धरणाचे लाभक्षेत्र भंडारा जिल्ह्यातील बारव्हापर्यंत ७२ किमी आहे. या शेवटच्या टोकावर कालव्याचे पाणी पोहोचत नाही म्हणून पाणीवापर संस्थेने विभागाकडे १ हजार क्युसेस पाणी सोडल्याचा आग्रह धरला.कालव्यातून ११०० क्युसेस पाणी सोडण्यात आले. शुक्रवारी (२२) सकाळी १२ वाजताच्या सुमारास पाळ खचत असल्याची माहिती शाखा अभियंता चौरागडे यांना मिळाली. त्यांनी त्याचक्षणी धरणातून कालव्यात सोडण्यात येणारे पाणी बंद केले. बघता बघता निकृष्ट असलेले लायनिंग तुटले व सुमारे १० मीटर पर्यंतच्या पाळीला भगदाड पडले. कालव्यानजीक असलेल्या चिंतामण ठाकरे, चैतराम कलारी, आनंदराव कलारी, फागो कलारी, बुद्धी साफा, किसन वाळवे, बळीराम नेवारे व डोंगरे माहुरकुडा या शेतकऱ्यांचे सुमारे १४ एकर शेतीत पाणी घुसले. पाणी पसरण्यासाठी जागा नसल्याने शेतात घुसलेले पाणी परत कालव्याकडे येत आहे. हा कालवा बंद झाल्यानंतर पुर्णत: बंद व्हायला सुमारे १८ तास लागतात. त्यामुळे साचलेल्या पाण्यात धानपीक काही प्रमाणात सडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जागतिक बँकेच्या सहकार्याने २०१० मध्ये कालव्याच्या काही भागात सिमेंट काँक्रिटचे लायनिंगचे काम झाले आहे. यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने कालवा फुटला असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. विशेष उल्लेखनिय म्हणजे मातीकाम असलेल्या ठिकाणी ही पाळ न फुटता सिमेंट काँक्रिटने तयार केलेल्या आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कालव्याच्या पाळीला छिद्र असल्याची बाब उन्हाळ्यात संबंधित विभागाला सांगण्यात आली होती. मात्र याकडे कानाडोळा केल्यामुळे ही घटना घडण्याचे शेतकरी सांगतात. घटनास्थळाला उपविभागीय अभियंता राठोड, शाखा अभियंता दिलीप चौरागडे यांनी भेट देऊन पाहणी केली. धरणाचे पाणी बंद करण्यात आले. ते उद्या (दि.२३) दूपारपर्यंत पुर्णत: बंद होईल व फुटलेल्या ठिकाणी विभागाला दुरुस्तीकाम करणे सुलभ होईल. हे काम दोन दिवसात पुर्ण होईल अशी अपेक्षा इटियाडोह पटबंधारे उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)