शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

कालव्याची पाळ फुटल्याने शेतात पाणीच पाणी

By admin | Updated: August 23, 2014 01:53 IST

मालकनपूरनजीक साखळी क्रमांक १६३०० या स्थळी इटियाडोह धरणाच्या कालव्याची पाळ फुटली. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने धानपिकाचे मोठे नुकसान झाले.

अर्जुनी/मोरगाव : मालकनपूरनजीक साखळी क्रमांक १६३०० या स्थळी इटियाडोह धरणाच्या कालव्याची पाळ फुटली. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने धानपिकाचे मोठे नुकसान झाले. लायनिंगला तडे जावून पाळ फुटल्यांचे बोलल्या जात आहे.प्राप्त माहितीनुसार, तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली. रोवणी झाल्यानंतर शेतात पाणी नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. इटियाडोह पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता कालव्यातून पाणी सोडले. या कालव्यांची पाणी वहन क्षमता १४०० क्युसेक्स आहे. धरणातून कालव्यात ६०० क्युसेस पाणी सोडण्यात आले. या धरणाचे लाभक्षेत्र भंडारा जिल्ह्यातील बारव्हापर्यंत ७२ किमी आहे. या शेवटच्या टोकावर कालव्याचे पाणी पोहोचत नाही म्हणून पाणीवापर संस्थेने विभागाकडे १ हजार क्युसेस पाणी सोडल्याचा आग्रह धरला.कालव्यातून ११०० क्युसेस पाणी सोडण्यात आले. शुक्रवारी (२२) सकाळी १२ वाजताच्या सुमारास पाळ खचत असल्याची माहिती शाखा अभियंता चौरागडे यांना मिळाली. त्यांनी त्याचक्षणी धरणातून कालव्यात सोडण्यात येणारे पाणी बंद केले. बघता बघता निकृष्ट असलेले लायनिंग तुटले व सुमारे १० मीटर पर्यंतच्या पाळीला भगदाड पडले. कालव्यानजीक असलेल्या चिंतामण ठाकरे, चैतराम कलारी, आनंदराव कलारी, फागो कलारी, बुद्धी साफा, किसन वाळवे, बळीराम नेवारे व डोंगरे माहुरकुडा या शेतकऱ्यांचे सुमारे १४ एकर शेतीत पाणी घुसले. पाणी पसरण्यासाठी जागा नसल्याने शेतात घुसलेले पाणी परत कालव्याकडे येत आहे. हा कालवा बंद झाल्यानंतर पुर्णत: बंद व्हायला सुमारे १८ तास लागतात. त्यामुळे साचलेल्या पाण्यात धानपीक काही प्रमाणात सडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जागतिक बँकेच्या सहकार्याने २०१० मध्ये कालव्याच्या काही भागात सिमेंट काँक्रिटचे लायनिंगचे काम झाले आहे. यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने कालवा फुटला असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. विशेष उल्लेखनिय म्हणजे मातीकाम असलेल्या ठिकाणी ही पाळ न फुटता सिमेंट काँक्रिटने तयार केलेल्या आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कालव्याच्या पाळीला छिद्र असल्याची बाब उन्हाळ्यात संबंधित विभागाला सांगण्यात आली होती. मात्र याकडे कानाडोळा केल्यामुळे ही घटना घडण्याचे शेतकरी सांगतात. घटनास्थळाला उपविभागीय अभियंता राठोड, शाखा अभियंता दिलीप चौरागडे यांनी भेट देऊन पाहणी केली. धरणाचे पाणी बंद करण्यात आले. ते उद्या (दि.२३) दूपारपर्यंत पुर्णत: बंद होईल व फुटलेल्या ठिकाणी विभागाला दुरुस्तीकाम करणे सुलभ होईल. हे काम दोन दिवसात पुर्ण होईल अशी अपेक्षा इटियाडोह पटबंधारे उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)