शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

मावा-तुडतुड्याने लावली धान पिकाची वाट

By admin | Updated: October 19, 2014 23:39 IST

ओलिताच्या क्षेत्रात असलेल्या जमिनीत धानपिकावर पावसाळ्याच्या सुरुवातीला विलंबाने आलेल्या पावसाचा फटका आणि नंतर पिकावर मावा तुडतुडासारख्या रोगाचे आक्रमण यामुळे शेतकऱ्यांचे

सालेकसा : ओलिताच्या क्षेत्रात असलेल्या जमिनीत धानपिकावर पावसाळ्याच्या सुरुवातीला विलंबाने आलेल्या पावसाचा फटका आणि नंतर पिकावर मावा तुडतुडासारख्या रोगाचे आक्रमण यामुळे शेतकऱ्यांचे दिवाळे निघत आहे. शेतकरी वर्ग औषधीची फवारणी करुन करुन थकला तरी रोग दूर होण्याचे नाव घेत नाही. धानाच्या उत्पादनापेक्षा लागणारा खर्च चार पट लागल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत.यंदा सुरूवातीपासूनच असमाधानकारक पाऊस पडल्यामुळे सर्वत्र भरघोस धान पिक मिळण्याचे संकेत दिसत नव्हते. यात हलक्या प्रजातीचे धान पीक जे वरथेंबी पावसावर अवलंबून आहे, ते योग्य प्रमाणात होत असल्याचे दिसून येत नव्हते. परंतु ओलिताच्या क्षेत्रात असलेले व खाल भागात असलेल्या जमिनीतील पिकांना सुरुवातीपासून थोड्या प्रमाणात लाभ मिळत असल्याने त्या शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होताना दिसत नाही.यंदा अनेक ठिकाणी उन्हाळ्यात उन्हाळी धानपिक घेण्यात आले व ते उशिरा झाले. जमिनीचा ओलावा तुटण्यापूर्वीच पावसाचे आगमन झाले नाही. विलंबाने पाऊस पडूनही शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची शेती केली. परंतु खरीप हंगामात धानाची शेती सुरुवातीपासून रोगग्रस्त राहिल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. शेतकऱ्यांनी फवारणी केली व इतर वेगवेगळ्या किटकनाशकांचा पावडर व द्रव्याचा वापर केला. परंतु जडामुळात असलेले रोग दूर झालेले नाही. फवारणी केलेल्या औषधांचा प्रभाव जास्तीत जास्त एक आठवडा राहून पुन्हा रोग डोके वर काढू लागले. औषधी वापरानंतर आठ दिवसात तीच गत असा क्रम राहिला. अगदी धान कापणीपर्यंत शेतकऱ्यांना औषधीचा उपयोग करावा लागत आहे. कापणीच्या काळात औषधीचा उपयोग हा मनुष्याला व जनावरांना नुकसानकारक ठरतो. धानापासून तयार केलेले तांदूळ औषधीयुक्त तसेच जनावरांसाठी तयार केलेले कुकुस व तणीससुद्धा औषधीयुक्त राहते. त्यामुळे त्याचे सेवन शरीराला नुकसान करणारे ठरते. परंतु शेतकरी याची परवा न करता धानावरचा रोग दूर करण्यासाठी अगदी शेवटपर्यंत औषधीचा उपयोग करतो. याचा विपरीत परिणाम जास्त होतो. कृषी वैज्ञानिकांनी यावर संशोधन करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी पाऊल उचलावे, ही अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)