शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मावा-तुडतुड्याने लावली धान पिकाची वाट

By admin | Updated: October 19, 2014 23:39 IST

ओलिताच्या क्षेत्रात असलेल्या जमिनीत धानपिकावर पावसाळ्याच्या सुरुवातीला विलंबाने आलेल्या पावसाचा फटका आणि नंतर पिकावर मावा तुडतुडासारख्या रोगाचे आक्रमण यामुळे शेतकऱ्यांचे

सालेकसा : ओलिताच्या क्षेत्रात असलेल्या जमिनीत धानपिकावर पावसाळ्याच्या सुरुवातीला विलंबाने आलेल्या पावसाचा फटका आणि नंतर पिकावर मावा तुडतुडासारख्या रोगाचे आक्रमण यामुळे शेतकऱ्यांचे दिवाळे निघत आहे. शेतकरी वर्ग औषधीची फवारणी करुन करुन थकला तरी रोग दूर होण्याचे नाव घेत नाही. धानाच्या उत्पादनापेक्षा लागणारा खर्च चार पट लागल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत.यंदा सुरूवातीपासूनच असमाधानकारक पाऊस पडल्यामुळे सर्वत्र भरघोस धान पिक मिळण्याचे संकेत दिसत नव्हते. यात हलक्या प्रजातीचे धान पीक जे वरथेंबी पावसावर अवलंबून आहे, ते योग्य प्रमाणात होत असल्याचे दिसून येत नव्हते. परंतु ओलिताच्या क्षेत्रात असलेले व खाल भागात असलेल्या जमिनीतील पिकांना सुरुवातीपासून थोड्या प्रमाणात लाभ मिळत असल्याने त्या शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होताना दिसत नाही.यंदा अनेक ठिकाणी उन्हाळ्यात उन्हाळी धानपिक घेण्यात आले व ते उशिरा झाले. जमिनीचा ओलावा तुटण्यापूर्वीच पावसाचे आगमन झाले नाही. विलंबाने पाऊस पडूनही शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची शेती केली. परंतु खरीप हंगामात धानाची शेती सुरुवातीपासून रोगग्रस्त राहिल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. शेतकऱ्यांनी फवारणी केली व इतर वेगवेगळ्या किटकनाशकांचा पावडर व द्रव्याचा वापर केला. परंतु जडामुळात असलेले रोग दूर झालेले नाही. फवारणी केलेल्या औषधांचा प्रभाव जास्तीत जास्त एक आठवडा राहून पुन्हा रोग डोके वर काढू लागले. औषधी वापरानंतर आठ दिवसात तीच गत असा क्रम राहिला. अगदी धान कापणीपर्यंत शेतकऱ्यांना औषधीचा उपयोग करावा लागत आहे. कापणीच्या काळात औषधीचा उपयोग हा मनुष्याला व जनावरांना नुकसानकारक ठरतो. धानापासून तयार केलेले तांदूळ औषधीयुक्त तसेच जनावरांसाठी तयार केलेले कुकुस व तणीससुद्धा औषधीयुक्त राहते. त्यामुळे त्याचे सेवन शरीराला नुकसान करणारे ठरते. परंतु शेतकरी याची परवा न करता धानावरचा रोग दूर करण्यासाठी अगदी शेवटपर्यंत औषधीचा उपयोग करतो. याचा विपरीत परिणाम जास्त होतो. कृषी वैज्ञानिकांनी यावर संशोधन करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी पाऊल उचलावे, ही अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)