शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
3
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
4
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
5
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
6
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
7
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
8
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
9
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
10
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
11
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
12
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
13
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
14
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
15
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
16
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
17
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
18
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
19
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

बाघ नदीचे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्याचे स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:11 IST

जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्यास या भागातील शेतकरी अधिक संपन्न होतील. त्याच दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. रजेगाव काटी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सिंचनाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तालुक्यातील छिपिया येथे विविध कामांना सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्यास या भागातील शेतकरी अधिक संपन्न होतील. त्याच दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. रजेगाव काटी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सिंचनाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. भविष्यात बाघ नदीवर डांर्गोलीजवळ ४०० कोटी रुपयांच्या निधीतून बॅरेज तयार करुन या भागातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्याचे आपले स्वप्न असल्याचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी येथे सांगितले.तालुक्यातील छिपीया येथील २५ लाख रुपयांच्या निधीतून मंजूर रस्ता डांबरीकरण व सिमेंटीकरण कामाचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, जि.प.सदस्य कुंदन कटारे, विजय लोणारे, ओमप्रकाश भक्तवर्ती, सत्यम बहेकार, हुकुम नागपूरे, टिकाराम भाजीपाले, महेंद्र गेडाम, शालू परतेती, चेतन बहेकार, अनिरुध्द तांडेकर उपस्थित होते. आ. अग्रवाल म्हणाले, बाघ प्रकल्पाच्या बॅरेजमुळे गोंदिया तालुक्यातील शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली येईल. तसेच शेतकºयांना दोन्ही हंगामात पिके घेणे शक्य होईल.यामुळे हा परिसर सुजलाम सुफलाम होईल. परिसरातील अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली यावे यासाठी बाघ सिंचन प्रकल्पाच्या नहरांची दुरूस्ती व खोलीकरण करण्यात आले असून याची शेतकºयांना मदत होणार असल्याचे सांगितले. या वेळी विविध कामांचे भूमिपूजन आ.अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल