शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

डाॅ. आंबेडकरांचे विचार मानवाला प्रेरणादायी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:28 IST

बोंडगावदेवी : समस्त मानवाला सन्मानाने जगता यावे, कोणीही आपल्या अधिकारापासून वंचित राहू नये, महिलांना वंचितांना समाजामध्ये मानसन्मान मिळावा यासाठी ...

बोंडगावदेवी : समस्त मानवाला सन्मानाने जगता यावे, कोणीही आपल्या अधिकारापासून वंचित राहू नये, महिलांना वंचितांना समाजामध्ये मानसन्मान मिळावा यासाठी अपार कष्ट करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नवसंजीवनी दिली. त्यांचे विचार आजही मानवी समूहाला प्रेरणादायी ठरणारे असल्याचे प्रतिपादन चान्ना-बाक्टी येथील मिलिंद विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजन बोरकर यांनी केले.

मिलिंद विद्यालयात आयोजित डॉ. आंबेडकर जयंतीदिनी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. गिरीश बोरकर, जयेश भोवते, मिलिंद रामटेके, प्रा. तारक माटे, प्रा. मंगेश दोनोडे, लोकमत प्रतिनिधी अमरचंद ठवरे उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. प्राचार्य राजन बोरकर म्हणाले डॉ. आंबेडकर यांनी घटना लिहून देशातील विविध जाती-पंथांच्या लोकांना एकसंध ठेवले. अप्रतिम अशा संविधान निर्मितीमुळे आज लोकशाही प्रणाली कायम आहे. अखेरच्या क्षणापर्यंत पुस्तकप्रेमी असणारे डॉ. आंबेडकर यांनी देशातील शोषित, पीडित, बहुजन समाजाला मूलभूत अधिकार संपादित करून सन्मानाने जीवन जगण्याची संधी निर्माण करून दिली. जीवनात पराकोटीचे ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन करून आभार जयेश भोवते यांनी मानले.