शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

परिसरातील पिकांसाठी सिरपूर धरणाचे दार उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2017 00:44 IST

सध्या मान्सून दडी मारुन बसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतीची कामे पावसाअभावी पूर्णपणे खोळंबली असून शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे वळल्या आहेत.

शेतकरी सुखावला : पिकांना मिळणार जीवनदान लोकमत न्यूज नेटवर्कसिरपूरबांध : सध्या मान्सून दडी मारुन बसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतीची कामे पावसाअभावी पूर्णपणे खोळंबली असून शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे वळल्या आहेत. दडी मारुन बसलेला पाऊस कधी बरसेल याचीच वाट बघत राहावी लागत आहे. अशात मात्र पिकांसाठी सिरपूर धरणाची दारे उघडण्यात आली असून यामुळे पिकांना जिवदान मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे साधन आहे त्यांनी कशीबशी रोवणीची कामे सुरु केली. पण त्या स्त्रोतांनी पाण्याची पातळी खालावल्याने शेताला पुरेसे पाणी मिळत नाही. परिसरात वाघ नदीच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांनी विद्युत पंपाद्वारे पाणी ओढून शेतीची कामे सुरु केली. परंतु नदी सुध्दा कोरडी पडत चालल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पावसाअभावी सिरपूर जलाशय सुद्धा कोरडा असल्याने शेतकऱ्यांना मुबलक पाणी पुरवठा करणे सुध्दा शक्य नाही. असे असताना मात्र, नदी काठा जवळील शेतकऱ्यांच्या पिकांना जीवनदान मिळावे या करीता आमदार संजय पुराम यांच्या आदेशावरुन सिरपूर जलाशयाचे पाणी शनिवारी (दि.८) दुपारी सोडण्यात आले. या पाण्यामुळे नदीकाठावरील शेतपिकांना निश्चितच काही प्रमाणात फायदा होईल. शेतकऱ्यांनी आ. संजय पुराम यांना सिरपूर जलाशयातून पिकांना पाणी मिळावे यासाठी विनंती केली असता तत्काळ दखल घेत आमदारांनी संबंधित विभागाला पाणी सोडण्याचे आदेश दिले.