शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

महाराष्ट्रात ‘ज्योतिषशास्त्र’ हा विषय सुरू करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:32 IST

सडक अर्जुनी : महाराष्ट्रात इग्नू (इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ) यांचा ‘ज्योतिषशास्त्र’ हा विषय सुरू न करण्याबाबतचे निवेदन ...

सडक अर्जुनी : महाराष्ट्रात इग्नू (इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ) यांचा ‘ज्योतिषशास्त्र’ हा विषय सुरू न करण्याबाबतचे निवेदन सोमवारी (दि.९) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका सडक अर्जुनीच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले.

महाराष्ट्राला संत आणि समाज सुधारकांची शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आहे. आपल्या भूमीचा ‘बुद्धीच्या देशा’ असा उल्लेख केला जातो. संत चक्रधर स्वामींपासून ते थेट संत गाडगे महाराजांपर्यंत प्रबोधनाची परंपरा आहे, तर दुसऱ्या बाजूला महात्मा जोतीराव फुलेंपासून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते प्रबोधनकार ठाकरेपर्यंत समाज सुधारक होऊन गेलेत. त्यांची परंपरा चालू ठेवणे, हे प्रत्येक महाराष्ट्रातील सुज्ञ युवकाचे कर्तव्य आहे. अशावेळी ‘इग्नू’तर्फे यंदाच्या वर्षापासून ‘ज्योतिषशास्त्र’ या विषयात पदवी आणि पदविका हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. खगोलशास्त्रज्ञ ज्योतिषाला

मान्यता देत नाहीत

ज्योतिषाचा अभ्यासक्रम सुरू करणे म्हणजे लोकांना अंधश्रद्धेच्या दरीत लोटण्यासारखे आहे. स्वामी विवेकानंद व स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही ज्योतिषशास्त्राला कडाडून विरोध केलेला आहे. ज्योतिषशास्त्र हा अभ्यासक्रम शिकून महाराष्ट्रामध्ये कर्मकांड करणारे आणि आपला वेळ पैसा आणि श्रम वाया घालवणारे तरुण युवक तयार होतील. समाज विज्ञानाच्या दिशेने जाण्याऐवजी अज्ञानाच्या दिशेने ढकलला जाईल, हे थांबवण्यासाठी इग्नूच्या ‘ज्योतिषशास्त्र’ या अभ्यासक्रमाला मान्यता देऊ नये, म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका सडक अर्जुनीच्या वतीने नायब तहसीलदार आर.एस. खोकले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अंनिसचे तालुकाध्यक्ष उमेश उदापुरे, सचिव अनिरुद्ध पारधी, मार्गदर्शक डॉ. राजकुमार भगत, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख आर.व्ही. मेश्राम, सदस्य अमोल खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश काशीवार, शिवाजी गहाणे उपस्थित होते.