शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

संपूर्ण पीक नष्ट झाल्यावर सवलतीचे औषध देणार का?

By admin | Updated: September 1, 2016 00:43 IST

यावर्षी चांगल्या पावसाच्या अंदाजाने हरखून गेलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाने पुन्हा दगा दिला आहे.

शेतकऱ्यांचा सवाल : रोगपीडित धानावर फवारणीसाठी सवलतीचे कीटकनाशक नाहीगोंदिया : यावर्षी चांगल्या पावसाच्या अंदाजाने हरखून गेलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाने पुन्हा दगा दिला आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे धानपिकावर कीडीचा प्रादुर्भाव झाला. त्यासाठी सवलतीच्या दरात कीटकनाशक उपलब्ध करून दिले जाणार आहे. मात्र त्याबाबतची मागणी करूनही कीटकनाशकाचा पुरवठा अद्याप झालेला नाही. त्यामुळे कीडींनी संपूर्ण पिक नष्ट केल्यावर कीटकनाशक देणार का? असा प्रश्न तमाम शेतकऱ्यांना पडला आहे.यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे अनेकांना दुबार पेरणी करण्याची पाळी आली. पावसाच्या अभावाने काही ठिकाणी आवत्या टाकण्यात आल्या. नैसर्गिक संकटात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या संकटात आता पुन्हा निसर्गाने भर टाकली. सध्या भापपिकांवर खोडकिडा व लष्कळी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने हवे तेवढे उत्पन्न मिळणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी गोंदिया व सडक-अर्जुनी या दोन तालुक्यांत भातपिकांवर खोडकिडा (वायएसबी) व लष्करी अळी) यांचा प्रादुर्भाव आढळला आहे. मागील आठ दिवसांपूर्वी गोंदिया तालुक्याच्या आसोली व परिसरात खोडकिड्याचा प्रादुर्भाव आढळला होता. मात्र कृषी विभागाच्या सल्ल्याने व औषधाने सध्या नियंत्रणात असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत सडक-अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार, ब्राह्मणी, रेंगेपार, खोबा व जवळील परिसरात खोडकिडा व लष्कळी अळींनी धानपिकांना ग्रासले आहे. मात्र ते आर्थिक नुकसान पातळीच्या आत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे म्हणणे आहे. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होणार, यात शंका नाही. याशिवाय इतरही क्षेत्रात धानपिकांना रोगांनी ग्रासले आहे. क्लोरोपायरीपास्ट ही औषध गादमाशी, खोडकिडा व पिकांशी संबंधित सर्वच रोगांवर प्रभावी असून आठ हजार लिटर प्रात्यक्षिकांमागे उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या औषधाचे दर २६३ रूपये असून यातील १९२ रूपये कृषी विभाग देईल तर ७१ रूपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे. मात्र ही औषधसुद्धा अद्याप उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)