शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे फोटो असलेले डाक तिकिटे बंद करू नका

By admin | Updated: September 20, 2015 02:20 IST

टपाल तिकीटावरुन इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची प्रतिमा असलेली तिकीटे बंद करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे.

आंदोलनाचा इशारा : शिक्षण सभापती कटरे आक्रमकगोंदिया : टपाल तिकीटावरुन इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची प्रतिमा असलेली तिकीटे बंद करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. हा निर्णय अत्यंत बालीशपणाचा असून त्याबद्दल मोदी सरकारचा निषेध करीत असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे यांनी म्हटले आहे. संपुआच्या कारकीर्दित आधुनिक भारताचे शिल्पकार या नावाने काढलेल्या टपाल तिकीटाच्या मालीकेत इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, होमी जहांगीर भाभा, जेआरडी टाटा आणि मदर टेरेसा यांचा समावेश होता. सन २००९ साली यामध्ये ए.व्ही. शामास्वामी, सी.व्ही. रमन आणि रुक्मीनी देवी अंरुदले यांचा समावेश करण्यात आला.एखादे नवीन सरकार देशात सत्तेवर आले तर त्या सरकारला वाटत असेल तर त्यांनी टपाल तिकीटांची नवीन मालीका सुरू करावी. तो त्या निर्वाचित सरकारचा तो अधिकर आहे. आम्हाला त्याचा विरोध नाही. परंतु ज्या महान विभुतींनी हा देश घडविण्यासाठी मोलाचे कार्य केले देशासाठी प्राणाची आहुती दिली त्यांना टपाल तिकीटाच्या मालीकेतून हद्दपार करणे कितपत योग्य आहे. याचा विचार देशातील सरकारने करणे क्रमप्राप्त आहे. परंतु देशातील मोदी सरकारने माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची प्रतिमा असलेल्या टपाल तिकीटांना बंद करणे म्हणजे गांधी कुटुंबियांच्या प्रति असलेला मोदी सरकारचा नकारात्मक दृष्टीकोण व द्वेश भावना देशातील जनतेला समजल्या शिवाय राहणार नाही. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. देशातील जनता भोळी राहिलेली नाही.इंदिरा गांधी व राजीव गांधी या साध्या व्यक्ती नव्हत्या. तर त्यांनी देशाचे पंतप्रधान पद भूषविले आहे. इंदिरा गांधीनी पाकिस्तानच्या विरोधात लढा देत पाकिस्तानला त्याची जागा दाखवून बांग्ला देशाची निर्मिती केली. राजीव गांधी यांनी देशात तंत्रज्ञानाची क्रांती घडवून देशाला प्रगती पथावर नेणारा दीपस्तंभ होते. हे कोणीही नाकारु शकत नाही. त्यामुळे त्यांची प्रतिमा असलेली टपाल तिकीटे हद्दपार करणे म्हणजेच देशातील सरकारची सुडभावनेची प्रवृत्ती स्पष्ट होते. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची प्रतिमा असलेली टपाल तिकीटे बंद केल्यास काँग्रेसला रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल आम्ही त्यासाठी वचनबद्ध आहोत, असा इशारा जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती पी.जी. कटरे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)