शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे फोटो असलेले डाक तिकिटे बंद करू नका

By admin | Updated: September 20, 2015 02:20 IST

टपाल तिकीटावरुन इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची प्रतिमा असलेली तिकीटे बंद करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे.

आंदोलनाचा इशारा : शिक्षण सभापती कटरे आक्रमकगोंदिया : टपाल तिकीटावरुन इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची प्रतिमा असलेली तिकीटे बंद करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. हा निर्णय अत्यंत बालीशपणाचा असून त्याबद्दल मोदी सरकारचा निषेध करीत असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे यांनी म्हटले आहे. संपुआच्या कारकीर्दित आधुनिक भारताचे शिल्पकार या नावाने काढलेल्या टपाल तिकीटाच्या मालीकेत इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, होमी जहांगीर भाभा, जेआरडी टाटा आणि मदर टेरेसा यांचा समावेश होता. सन २००९ साली यामध्ये ए.व्ही. शामास्वामी, सी.व्ही. रमन आणि रुक्मीनी देवी अंरुदले यांचा समावेश करण्यात आला.एखादे नवीन सरकार देशात सत्तेवर आले तर त्या सरकारला वाटत असेल तर त्यांनी टपाल तिकीटांची नवीन मालीका सुरू करावी. तो त्या निर्वाचित सरकारचा तो अधिकर आहे. आम्हाला त्याचा विरोध नाही. परंतु ज्या महान विभुतींनी हा देश घडविण्यासाठी मोलाचे कार्य केले देशासाठी प्राणाची आहुती दिली त्यांना टपाल तिकीटाच्या मालीकेतून हद्दपार करणे कितपत योग्य आहे. याचा विचार देशातील सरकारने करणे क्रमप्राप्त आहे. परंतु देशातील मोदी सरकारने माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची प्रतिमा असलेल्या टपाल तिकीटांना बंद करणे म्हणजे गांधी कुटुंबियांच्या प्रति असलेला मोदी सरकारचा नकारात्मक दृष्टीकोण व द्वेश भावना देशातील जनतेला समजल्या शिवाय राहणार नाही. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. देशातील जनता भोळी राहिलेली नाही.इंदिरा गांधी व राजीव गांधी या साध्या व्यक्ती नव्हत्या. तर त्यांनी देशाचे पंतप्रधान पद भूषविले आहे. इंदिरा गांधीनी पाकिस्तानच्या विरोधात लढा देत पाकिस्तानला त्याची जागा दाखवून बांग्ला देशाची निर्मिती केली. राजीव गांधी यांनी देशात तंत्रज्ञानाची क्रांती घडवून देशाला प्रगती पथावर नेणारा दीपस्तंभ होते. हे कोणीही नाकारु शकत नाही. त्यामुळे त्यांची प्रतिमा असलेली टपाल तिकीटे हद्दपार करणे म्हणजेच देशातील सरकारची सुडभावनेची प्रवृत्ती स्पष्ट होते. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची प्रतिमा असलेली टपाल तिकीटे बंद केल्यास काँग्रेसला रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल आम्ही त्यासाठी वचनबद्ध आहोत, असा इशारा जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती पी.जी. कटरे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)