शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान थांबवू नका-पटेल

By admin | Updated: March 20, 2015 00:57 IST

महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व आंतरभारती शिक्षण संशोधन मंडळ, ...

गोंदिया : महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व आंतरभारती शिक्षण संशोधन मंडळ, संत बांगळुबाबा शैक्षणिक सुधारणा मंडळ यांच्या संयुक्त विद्ममाने जिल्हा पर्यटन महोत्सव कोसमतोंडी (नागझिरा) येथे पार पडला. मात्र म्हसवाणी येथील पवन शिक्षण संस्थेत महोत्सव झाल्याचे दाखवून त्याचा अनुदान निधी थांबविण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी अमित सैनी करीत असल्याचा आरोप राजू पटेल मलनस यांनी केला आहे.कोसमतोंडी येथील महोत्सव तत्कालिन आमदार व सध्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व आयोजक संस्थांव्दारे पार पडले होते. महोत्सवात नेते डॉ. खुशाल बोपचे, माजी आ. हेमंत पटले, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे व माजी आ. रामरतनबापू राऊत, तुरकर, राजेश चतुर, पोलीस अधिकारी, तत्कालिन जिल्हा कृषी अधीक्षक मनोहर चंद्रिकापुरे, अविनाश काशिवार व जिल्ह्यातील हजारो कलावंत साहित्यीक व वरिष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीत पार पडले होते. सदर महोत्सवाचा खर्च आंतरभारती शिक्षण संशोधन मंडळ व संत बांगळुबाबा शैक्षणिक सुधारणा मंडळाने केला. याकरिता निधी मंजूर करण्यात आले व जिल्हाधिकारी गोंदिया यांना निधी संस्थेला वितरित करण्याचे आदेश दिले. संस्थेने कर्जाऊ रक्कम घेऊन महोत्सवावर खर्च केला. मात्र महोत्सव निधी जिल्हाधिकाऱ्यांकडून वितरित न झाल्यामुळे आयोजकांवर संकट ओढवले आहे. याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विनंती केली आहे. अधिवेशन काळात तत्कालिन महोत्सवाचे अध्यक्ष आताचे सामाजिक न्यायमंत्री बडोले व खा. नाना पटोले यांना निवेदन देऊन प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांना फोन करून संस्थेला निधी वितरित करण्यासंबधी कळविले आहे. परंतु पवन शिक्षण संस्थेच्या मागणीनुसार म्हसवाणी येथे महोत्सव झाल्याचे जिल्हाधिकारी सैनी दाखवित असल्याचा आरोप राजू पटेल यांनी केला आहे. त्यामुळे कोसमतोंडी (नागझिरा) येथे झालेल्या महोत्सवाची शहानिशा करावी, पोलीस, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत चौकशी करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही संस्थांना आमोरासमोर बोलवून निधी वाटप करावा अन्यथा शासनाचा अनुदान रोखून पर्यटन योजनेला बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पर्यटनभूषण राजू पटेल मलनस यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)