शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

शहिदांना जातीव्यवस्थेत मर्यादित ठेवू नका

By admin | Updated: March 25, 2017 01:45 IST

देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांना जातीपुरते मर्यादित ठेवून त्यांच्या बलिदानाचे महत्त्व कमी करू नये.

पोवारीटोला येथे बलिदानदिन : भेरसिंह नागपुरे म्हणाले, शहिदांचे कार्य चिरकाल स्मरणात राहणारे सालेकसा : देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांना जातीपुरते मर्यादित ठेवून त्यांच्या बलिदानाचे महत्त्व कमी करू नये. शहिदांनी आपले सर्वस्व त्यागून देश व नागरिकांचा त्यांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. त्यामुळे समाज व जातीव्यवस्थेच्या पलिकडे विचार करून त्यांच्याप्रती आदर व सन्मान ठेवावे, असे प्रतिपादन माजी आमदार भेरसिंह नागपुरे यांनी केले. सन १८५७ च्या प्रथम स्वातंत्र संग्राम सेनानी विरांगना अवंतीबाई लोधी यांची पुण्यतिथी पोवारीटोला (कोटजंभुरा) येथे त्यांच्या पुतळ्यासमोर पार पडली. त्यांच्या बलिदान दिनानिमित्त नागरिकांना ते संबोधित करीत होते. अध्यक्षस्थानी यादनलाल बनोठे होते. उद्घाटन माजी आ. भेरसिंह नागपुरे यांनी केले. अतिथी म्हणून खेमराज लिल्हारे, पं.स.सदस्य प्रमिला दसरिया, अ‍ॅड.वाय.एच. उपराडे, छाया वल्हारे, लोधी शक्ती संघटनेचे सचिव दयालदास डहारे, सरपंच मनिषा नागपुरे, उपसरपंच हेमराज सुलाखे, ज्ञानीराम दमाहे, प्राचार्य डी.आर. माहुले, मधुकर दमाहे, लीला नागपुरे, पुनाराम मोहारे, आडकूदास माहुले, उपसरपंच ममता गौतम व इतर मान्यवर उपस्थित होते. पोवारीटोला येथे तालुक्यातील एकमात्र अवंतीबाई यांचा अश्वारोही पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांच्या बलिदान दिनी उपस्थित पाहुण्यांनी त्या पुतळ्याचे पूजन करुन माल्यार्पण केले व आदरांजली वाहिली. याप्रसंगी लोधी समाजासह इतर समाजबांधवांनीसुद्धा पुष्पांजली अर्पित केली. समाजाचे कार्यकर्ते कारूलाल नागपुरे यांची समर्पन भावना व स्वकृत्यामुळे पोवारीटोला येथे अवंतीबाईचा पुतळा साकार झाला. भेरसिंह नागपुरे पुढे म्हणाले, शहीद राणी अवंतीबाई लोधी समाजाच्या होत्या तरी त्यांनी राणी असताना रामगढचे शासन चालविताना सर्व समाजासाठी लोककल्याणाचे कार्य केले. राज्याला इंग्रजाच्या गुलामगिरीपासून दूर ठेवण्यासाठी इंग्रजाशी मरेपर्यंत संघर्ष केला, परंतु गुलामगिरी पत्करली नाही. त्यांनी केलेले कार्य सर्वांना प्रेरणा देणारे आहेत, असे ते म्हणाले. या वेळी यादनलाल बनोटे यांनी, शहिदांचे कार्य चिरकाल आठवणी ठेवणारे असतात, असे सांगितले. लोधी शक्ती संघटनचे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. येशुलाल उपराडे यांनी अवंतीबाई यांच्या विविध ऐतिहासीक कामगिरीवर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक किशोर नागपुरे यांनी मांडले. संचालन विजय मानकर यांनी केले. आभार डी.आर. माहुले यांनी मानले. कार्यक्रमासाठी कारूलाल नागपुरे, मुलचंद नागपुरे, डोमनलाल नागपुरे, अजित नागपुरे, किशोर नागपुरे, धनराज नागपुरे, अजय नागपुरे, गोरेलाल सोनवाने, सेवंती नागपुरे, कमला पालेवार, सुरेश पंधरे, मुकेश दमाहे आदिंनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)