शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

युरियाचे दर पाच वर्षे वाढू देणार नाही

By admin | Updated: June 28, 2015 01:19 IST

भाजपाचे सरकार शेतकरी हिताचे सरकार असून शेती पाच वर्षे युरीयाचे दर वाढू देणार नाही असा निर्णय केंद्र शासनाने घेतल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली.

रावसाहेब दानवे : तिरोडा येथे प्रचार सभातिरोडा : भाजपाचे सरकार शेतकरी हिताचे सरकार असून शेती पाच वर्षे युरीयाचे दर वाढू देणार नाही असा निर्णय केंद्र शासनाने घेतल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. ते कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात आयोजित जि.प. व पं.स. उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, प्रमुख अतिथी म्हणून खा. नाना पटोले, पूर्व विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठीवार, प्रदेश महामंत्री रामदास आंबडकर, महिला मोर्चाच्या अर्चना डेहणकर, माजी आ. भजनदास वैद्य, हरीश मोरे, खोमेश्वर रहांगडाले, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, अशोक इंगळे, लिखेंद्र बिसेन उपस्थित होते. दानवे पुढे म्हणाले, पूर्वी शेतकऱ्यांचे ५० टक्के नुकसान झाले तरच नुकसान भरपाई दिली जात असे. मात्र शासनाने ते प्रमाण ३३ टक्केपर्यंत खाली आणले आहे. रक्ताच्या नात्यात मालमत्तेचे हस्तांतरण करण्याकरिता लागणारी स्टॅप ड्यूटी शासनाने रद्द केली आहे.तिरोडाचे आ. विजय रहांगडाले यांनी आपल्या प्रास्ताविकात क्षेत्रातील समस्या मांडल्या. धापेवाडा उपसासिंचन योजना पूर्ण झाल्यास येथील शेतकरी समृद्ध होईल व बेरोजगारी कमी होईल. चोरखमारा व खैरबंदा जलाशयात प्रकल्पाचे पाणी सोडल्यास हजारो एकर शेतीला सिंचन मिळेल असेही ते म्हणाले.खा. नाना पटोले यांनी राष्ट्रवादी नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी अदानी विद्युत प्रकल्पाला देवून शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिसकावला अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अदानी विद्युत प्रकल्पास राज्य व केंद्र शासनाची ६० टक्के सबसीडी असून सबसीडीचा पैसा हा जनतेचा पैसा आहे. प्रकल्पाची किंमत अवास्तव दाखवून हा प्रकल्प सबसीडीच्या पैशातूनच उभा झाला आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या धानाला व कोकणातील हापूस आंब्याला चांगला भाव न मिळण्यामागे माजी कृषीमंत्री शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी याप्रसंगी केला. एका स्थानिक राष्ट्रवादी नेत्याने गरीब महिलांकडून लक्षावधी रुपये लुबाडल्याचे ते म्हणाले. ना.राजकुमार बडोले यांनी केंद्राच्या विविध योजनांची माहिती दिली. धानाला ३५० रुपये दर वाढवून दिला. रमाई घरकुल योजनेंतर्गत लाभार्र्थींना ५० हजारापर्यंत भूखंड देऊन त्यावर घरकुल बांधून देण्याची योजना, जनसामान्यांकरिता पेंशन योजना, ओबीसींना शिष्यवृत्ती आदी संदर्भात माहिती दिली व शासनाच्या योजना जनमानसापर्यंत पोहोचविण्याकरिता जि.प. व पं.स. मध्ये भाजप उमेदवार निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जि.प. उपाध्यक्ष मदन पटले यांनी केले. याप्रसंगी सर्व जि.प. व पं.स. उमेदवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)