शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका

By admin | Updated: March 1, 2015 01:11 IST

देशाच्या प्रगतीत महिलांचा सहभाग महत्वाचा आहे. स्त्री आणि पुरुष हे जीवनरथाचे दोन चाक आहेत. जीवनरथ चांगल्याप्रकारे चालण्यासाठी पुरुषांनी स्त्रीयांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता ...

गोंदिया : देशाच्या प्रगतीत महिलांचा सहभाग महत्वाचा आहे. स्त्री आणि पुरुष हे जीवनरथाचे दोन चाक आहेत. जीवनरथ चांगल्याप्रकारे चालण्यासाठी पुरुषांनी स्त्रीयांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत शारदा राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात २६ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या महिला आरोग्य अभियान पंधरवड्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवि धकाते होते. प्रमुख पाहुणे म्हणून दंत शल्यचिकित्सक डॉ. अंशू सैनी, डॉ. दीपक बहेकार, लायंस क्लबचे अध्यक्ष कालुराम अग्रवाल, प्रा. सविता बेदरकर, प्रा. माधूरी नासरे, डॉ. सीमा यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.बडोले पुढे म्हणाल्या, श्रमाची कामे मोठ्या प्रमाणात स्त्रीया करतात. कुटुंबाची महत्वपुर्ण जबाबदारिही महिला यशस्वीपणे सांभाळतात. हे सर्व करीत असताना त्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. देशाच्या प्रगतीत महत्वाचा वाटा असलेल्या स्त्रीया या आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने महिला आरोग्य अभियानातून त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले आहे. शासनाचे हे अभियान कौतुकास्पद असून जिल्ह्यातील महिलांनी या अभियानाचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.अध्यक्षस्थानावरुन बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धकाते यांनी, जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्याप्रकारच्या आरोग्यसेवा देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. शासनाच्या आरोग्यसेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. कोबाल्ट युनिट जिल्ह्यासाठी मंजूर झाल्याचे सांगत, या युनिटमुळे जिल्ह्यातील कर्करुग्णांना भविष्यात जिल्ह्यातच उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. महिला आरोग्य अभियानामुळे महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. अंशू सैनी यांनी, आजची स्त्री कामाच्या व्यस्ततेमुळे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे त्यांना मोठ्याप्रमाणात अ‍ॅनिमीया होतो. देशातील ८५ टक्के स्त्रीया अ‍ॅनिमीयाग्रस्त असल्याचे सांगत, महिलांनी आरोग्य अभियानादरम्यान आरोग्य तपासणी करुन आरोग्याची काळजी घ्यावी व निरोगी राहावे असे आवाहन केले.प्रा. बेदरकर यांनी, देशातील स्त्री जर सक्षम असेल तर तो देश प्रगती करतो. स्त्रीयांनी सुदृढ असले पाहिजे. ती आजारी पडणारच नाही यासाठी काळजी घेतली पाहिजे. स्त्री सुदृढ असली तर जन्माला येणारा बालक सुदृढ असतो. प्रत्येक स्त्रीने आपण आरोग्यसंपन्न कसे राहू याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत व्यक्त केले.डॉ. बहेकार यांनी, स्त्री-पुरुष भेदीभाव मिटला पाहिजे, आज अनेक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चांगले काम करीत आहेत. मुलगी ही दोन्ही घरचा उद्धार करीत असल्यामुळे तिच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे. तसेच महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळाले पाहिजे. केवळ कायद्याच्या उपयोगातून हे होणार नाही तर त्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. महिलांनी निरोगी राहण्यासाठी चांगला आहार घ्यावा व आरोग्याची काळजी घ्यावी असेही ते म्हणाले.प्रा. नासरे यांनी, महिला आरोग्य अभियानासारख्या कार्यक्रमातून महिलांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. महिलांनी आरोग्याची काळजी घेताना रुढी, परंपरा आणि अंधश्रद्धा दूर ठेवाव्यात असे मत मांडले. दरम्यान शारदा बडोले यांचा डॉ. अंशू सैनी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके यांनी मांडले. संचालन डॉ. भावना बजारे यांनी केले. आभार रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी मानले. कार्यक्रमाला अतिरिक्त शल्यखिकित्सक डॉ. दुधे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, डॉ. अमरिश मोहबे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ. सायस केंद्रे, डॉ. तृप्ती कटरे, डॉ. प्रियंका उभाळ, डॉ. दुर्गाप्रसाद पटले, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)रूग्णवाहिकेचे लोकार्पण व समुपदेशन केंद्राचे उद्घाटन प्रारंभी शारदा बडोले यांच्या हस्ते वात्सल्य रूग्णवाहिकेचे लोकार्पण आणि महिला समुपदेशन केंद्राचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. लायंस क्लबचे अध्यक्ष कालुराम अग्रवाल यांनी वात्सल्य रूग्णवाहिकेसाठी एलसीडी टीव्ही भेट दिला. गरोदर मातांना बाळंतपणासाठी शासकीय रुग्णालयात आणणे आणि बाळंतपणानंतर माता व बालकाला घरी सुखरुप सोडून देण्याचे काम वात्सल्य या रुग्णवाहिकेतून करण्यात येणार आहे. या रूग्णवाहिकेवर माता व बालिकेचे चित्र आणि मुलींच्या जन्माचे स्वागत करु या हा संदेश, स्त्री भ्रुण हत्या रोखण्यात जनजागृती करण्यासाठी महत्वपुर्ण ठरणार आहे.