शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

लाखोंची योजना पाणी देईना

By admin | Updated: October 9, 2015 02:13 IST

अर्जुनी गावात पाणी पुरवठा योजनेंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. गोंदियाच्या वतीने ६५ हजार लिटर क्षमतेचे सन २०१३-१४ मध्ये लाखो रूपये खर्चून जलकुंभ तयार करण्यात आले.

ग्रामपंचायतचे दुर्लक्ष : नळ लागले पण पाणी येत नाही, टाकीवर लाखोंचा खर्चविजेंद्र मेश्राम  खातियाअर्जुनी गावात पाणी पुरवठा योजनेंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. गोंदियाच्या वतीने ६५ हजार लिटर क्षमतेचे सन २०१३-१४ मध्ये लाखो रूपये खर्चून जलकुंभ तयार करण्यात आले. गावात घरोघरी नळांची जोडणीसुद्धा करण्यात आली. मात्र या नळांद्वारे पिण्याचे शुद्ध पाणीच मिळत नसल्याने पिण्याच्या पाण्याची मोठीच समस्या उद्भवली आहे. यात पाईप लाईनची फिटिंगच चुकीची करण्यात आल्याने अनेकांच्या घरी नळांना पाणीच येत नाही. गावात एकूण ३५४ नळ जोडण्या आहेत. आजही अनेक लोक नळ कनेक्शन घेत आहेत. मात्र पाणीच मिळत नसल्याने गावकरी त्रस्त होवून गेले आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी यासाठी शासनाच्या वतीने लाखो रूपये खर्च करून जलकुंभ तयार करण्यात येत आहेत. परंतु पाणी पुरवठा योजनेच्या क्रियान्वयनाबाबत प्रशासन सजग नसल्यामुळे पाणी टंचाई भासत आहे. याचा परिणाम ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.सदर समस्येबाबत गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सांगितले आहे. परंतु या समस्येचे निवारण अद्यापही करण्यात न आल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. अर्जुनी गावातील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र गजभिये यांनी सांगितले की, सन २०१३-१४ मध्ये सदर जलकुंभ तयार करण्यात आला. त्याची क्षमता ६५ हजार लिटरची आहे. या जलकुंभामधून नळ जोडण्या लावण्यात आल्या. मात्र अनेक महिन्यांपासून नागरिकांच्या घरी नळापर्यंत पाणी पोहोचतच नाही. तसेच अनेक ठिकाणातून पाईप लाईन फुटून पाणी बेवारस पाणी जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकाराबाबत गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. जर ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देणार नाही, तर कोण देईल? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. सदर समस्या त्वरित सोडवून नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचविण्यात यावे, अशी मागणी अर्जुनीवासीयांनी केली आहे.