शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

कुणीही योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये

By admin | Updated: March 4, 2017 00:11 IST

प्रशासनाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे खेड्यापाड्यातील जनता बेजार झाली आहे.

नाना पटोले : जनता दरबारात ऐकल्या समस्या सडक-अर्जुनी : प्रशासनाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे खेड्यापाड्यातील जनता बेजार झाली आहे. अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. त्यांच्या समस्यांचे निराकरण करता यावे यासाठी हा जनता दरबार आहे. त्यामुळे शासकीय योजनेच्या लाभापासून कुणीही वंचित राहू नये असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीत शुक्रवारी (दि.३) आयोजीत जनता दरबारात ते बोलत होते. याप्रसंगी तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी विठ्ठल परळीकर, पंचायत समिती सभापती कविता रंगारी, उपसभापती विलास शिवणकर, जिल्हा परिषद सदस्य माधुरी पातोडे, नगराध्यक्ष रिता लांजेवार, पंचायत समिती सदस्य गिरधारी हत्तीमारे, खंडविकास अधिकारी आनंद लोकरे, माजी पं.स.उपसभापती दामोदर नेवारे, पं.स.सदस्य राजेश कठाणे, कृषी अधिकारी पेशेट्टीवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. बबन कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जनता दरबारात वनहक्क जमिनीचे पट्टे या विषयात अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन अतिक्रमण दाखवून पट्टे मिळवून घेतल्याची चर्चा झाली. यावर चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या चुकीची गय केली जाणार नसल्याचे खासदार पटोले यांनी सांगीतले. दरम्यान पाणी टंचाई, महावितरण संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या, महिला राजसत्ता आंदोलन, रोजगार हमी योजना, घरकूल योजना, स्वस्त धान्य वितरण व्यवस्था आदिंशी संबंधीत समस्या जाणून घेत संबंधीत अधिकाऱ्यांना खासदार पटोले यांनी सूचना केल्या. प्रथमच खासदारांचा जनता दरबार असल्याने तालुक्यातील हजारो नागरिक आपल्या समस्यांची निवेदने घेऊन आली होती. संचालन अनिल मेश्राम यांनी केले. आभार बिडीओ लोकरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)