शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

कुणीही योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये

By admin | Updated: March 4, 2017 00:11 IST

प्रशासनाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे खेड्यापाड्यातील जनता बेजार झाली आहे.

नाना पटोले : जनता दरबारात ऐकल्या समस्या सडक-अर्जुनी : प्रशासनाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे खेड्यापाड्यातील जनता बेजार झाली आहे. अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. त्यांच्या समस्यांचे निराकरण करता यावे यासाठी हा जनता दरबार आहे. त्यामुळे शासकीय योजनेच्या लाभापासून कुणीही वंचित राहू नये असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीत शुक्रवारी (दि.३) आयोजीत जनता दरबारात ते बोलत होते. याप्रसंगी तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी विठ्ठल परळीकर, पंचायत समिती सभापती कविता रंगारी, उपसभापती विलास शिवणकर, जिल्हा परिषद सदस्य माधुरी पातोडे, नगराध्यक्ष रिता लांजेवार, पंचायत समिती सदस्य गिरधारी हत्तीमारे, खंडविकास अधिकारी आनंद लोकरे, माजी पं.स.उपसभापती दामोदर नेवारे, पं.स.सदस्य राजेश कठाणे, कृषी अधिकारी पेशेट्टीवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. बबन कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जनता दरबारात वनहक्क जमिनीचे पट्टे या विषयात अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन अतिक्रमण दाखवून पट्टे मिळवून घेतल्याची चर्चा झाली. यावर चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या चुकीची गय केली जाणार नसल्याचे खासदार पटोले यांनी सांगीतले. दरम्यान पाणी टंचाई, महावितरण संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या, महिला राजसत्ता आंदोलन, रोजगार हमी योजना, घरकूल योजना, स्वस्त धान्य वितरण व्यवस्था आदिंशी संबंधीत समस्या जाणून घेत संबंधीत अधिकाऱ्यांना खासदार पटोले यांनी सूचना केल्या. प्रथमच खासदारांचा जनता दरबार असल्याने तालुक्यातील हजारो नागरिक आपल्या समस्यांची निवेदने घेऊन आली होती. संचालन अनिल मेश्राम यांनी केले. आभार बिडीओ लोकरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)