शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

‘त्या’ डॉक्टरांचा मार्ग मोकळा

By admin | Updated: November 24, 2014 23:00 IST

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत राज्यात ५४१ डॉक्टर काम करीत होते. परंतु १ ते ७ जुलै २०१४ दरम्यान मॅग्मो संघटनेने पुकारलेल्या संपाला या डॉक्टरांनी आपला पाठिंबा दर्शविल्यामुळे

मिळाला न्याय : पाच महिन्यांच्या लढाईची यशस्वी सांगतागोंदिया : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत राज्यात ५४१ डॉक्टर काम करीत होते. परंतु १ ते ७ जुलै २०१४ दरम्यान मॅग्मो संघटनेने पुकारलेल्या संपाला या डॉक्टरांनी आपला पाठिंबा दर्शविल्यामुळे त्यांना शासनाने कार्यमुक्त केले होते. परंतु या डॉक्टरांना उच्च न्यायालयाने पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे बाल स्वास्थ कार्यक्रमात काम करणाऱ्या डॉक्टरांचा पुन्हा सेवेत रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.आपल्या विविध मागण्यांसाठी मॅग्मो संघटनेने जिल्हा परिषदेसमोर राज्यभर संप पुकारला. या संपाला राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात काम करणाऱ्या डॉक्टरांनी पाठिंबा दर्शविल्यामुळे त्या डॉक्टरांना ४ जुलै रोजी शासनाने कार्यमुक्त केले होते. या संदर्भात बालस्वास्थ कार्यक्रमात काम करणाऱ्या डॉक्टरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या डॉक्टरांना रुजू करण्यात येत आहे. मात्र रुजू होताना अटी व शर्ती मान्य असल्याचा करारनामा त्या डॉक्टरांना लिहून द्यावे लागणार आहे. यानंतर हे डॉक्टर कोणत्याही संपात सहभागी होणार नाही. असे करारनामामध्ये लिहून द्यावे लागणार आहे. गोंदिया जिल्ह्यात ३६ डॉक्टर कार्यरत असून त्यांना लवकरच नियुक्ती आदेश दिला जाणार आहे. डॉ. योगेश पटले, सचिन दहिवले, विशाल गोळी, हरीश शेंडे, मुकेश मेश्राम, अमर आहूजा, योगेश हिरापुरे, राणा खान, दीशा पटले, सरिता ठाकूर, खेमलता पटले, श्वेता कांबळे, राहूल बिसेन, सुषमा पटले, मयुरी कोतवाल, प्रिया ताजने, श्रद्धांजली चौधरी, लक्ष्मीकांत वाघमारे, प्रिया चंद्रिकापुरे, पद्मा देवांगण, संकेत परशुरामकर, डॉ. नितीन पाटील, डॉ. वनिता कापगते, प्रगती खंडाते, नेतालसिंग बघेले, प्रशांत परशुरामकर, सुषमा डोये, तृप्ती घासले, मनीष दमाहे, सुरेखा मानकर, रोशन थोटे, अमित येडे, सरिता बघेले, दीक्षा पारधी, हेमंत ठाकरे, प्रिती बावनकर या डॉक्टरांचा समावेश आहे. या डॉक्टरांना कार्यमुक्त केल्यामुळे मागील पाच महिन्यापासून शाळेतील बालविद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली नव्हती. आरोग्य सेवा विस्कळीत झाल्यामुळे व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमात काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांना रुजू करण्यात येत आहे. कार्यमुक्त केल्यापासून आजतागायतचा महिन्याचा वेतन डॉक्टरांना मिळणार नाही, असे नमुद करण्यात आले आहे. मॅग्मोने आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. डॉक्टरांच्या संपाला आपणही पाठिंबा द्यावा जेणेकरुन ही संघटना आपल्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेईल, असे या डॉक्टरांना वाटत होते. मात्र मागील सरकारने संपात सहभागी झालेल्या डॉक्टरांना आश्वासन दिल्यामुळे त्यांनी संप मागे घेतला. व या संपाचा फटका राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमात काम करणाऱ्या डॉक्टरांना बसला. (तालुका प्रतिनिधी)