शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा होणार ‘एलईडी’ने प्रकाशमान

By admin | Updated: January 19, 2016 02:55 IST

विजेचा वाढत असलेला वापर लक्षात घेता त्यावर आवर घालण्याच्या दृष्टीने ग्राहकांना आता एलईडी बल्बचे वितरण

आजपासून वाटप : प्रत्येक ग्राहकाला मिळणार १० बल्बगोंदिया : विजेचा वाढत असलेला वापर लक्षात घेता त्यावर आवर घालण्याच्या दृष्टीने ग्राहकांना आता एलईडी बल्बचे वितरण करण्याचा कार्यक्रम राबविला जात आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या या ‘डोमेस्टिक इफीशियंट लाईटनिंग प्रोग्राम’ अंतर्गत प्रत्येक वीज मीटर धारकाला (ग्राहकाला) हे एलईडी बल्ब दिले जाणार असून मंगळवारपासून (दि.१९) जिल्ह्यात हा कार्यक्रम सुरू होणार आहे. कमी वीज जाळून अधिक उजेड देणारे एलईडी बल्ब असल्याने आता जिल्हा एलईडीच्या उजेडाने प्रकाशमान होणार आहे.विजेच्या वाढत्या वापरामुळे वीज निर्मितीसाठी खनिज संपत्तीचा ऱ्हास होत चालला आहे. यावर वेळीच नियंत्रण घालण्यात आले नाही तर खनिज संपत्तींसह पर्यावरणावरही धोकादायक परिणाम होणार यात शंका नाही. याकरिता वीजेची वाढत चाललेली मागणी व त्यावर आळा घालण्याच्या उद्देशातून केंद्रीय उर्जा मंत्रालयाने एलईडी बल्ब वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. एलईडी बल्ब कमी वीज जाळून जास्त उजेड देतात. जानेवारी २०१४ पासून सुरू झालेल्या या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक वीज मीटर धारकाला (ग्राहकाला) एलईडी बल्ब दिले जाणार आहे. केंद्र शासनाच्या एनर्जी इफिशिएंसी सर्विसेस लिमीटेड (ईईएसएल) या कंपनीच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविला जात असून यासाठी जिल्हास्तरावर एजंसी देण्यात आली आहे. राज्यात आॅक्टोबर २०१४ पासून हा कार्यक्रम सुरू झाला असून त्यांतर्गत रत्नागिरी, सिंधूदुर्ग, अमरावती, यवतमाळ, जळगाव, औरंगाबाद, पूणे, कल्याण, मुंबई, धुळे, नागपूर व वर्धा येथे बल्ब विक्री करण्यात आले आहेत. आता गोंदिया जिल्ह्यात हा कार्यक्रम सुरू होणार असून जिल्ह्यात सुमारे दोन लाख वीज मीटर धारक असल्याने त्यांना हे एलईजी बल्ब पुरविण्याच्या दृष्टीने एजन्सीची तयारी सुरू आहे. मंगळवारपासून (दि.१९) जिल्हयात वितरणाचे काम सुरू होणार असल्याची माहिती आहे. प्रायोगीक तत्वावर महावितरणचे मुख्य अभियंता जनवीर, अधिक्षक अभियंता कबीरदास चव्हाण, सहायक अभियंता सुहास धामनकर यांच्या हस्ते काही लोकांना सोमवारी बल्बचे वितरण करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)बिलातून कापणार बल्बचे पैसे४या बल्ब वितरणासाठी काही अटी ठरवून देण्यात आल्या आहेत. यामध्ये एका ग्राहकाला जास्तीत जास्त १० व किमान दोन बल्ब द्यावयाचे आहेत. त्यात सहा बल्ब रोख तर चार बल्ब हप्त्यांनी घेता येतील. मात्र अगोदर सहा बल्ब रोख स्वरूपात घेतल्यानंतर उरलेले चार बल्ब हप्त्याने घेता येणार नाही. हप्त्याने बल्ब घेण्यासाठी ग्राहकाला त्यांचे ओळखपत्र व आताच्या वीज बिलाची झेरॉक्स द्यायची आहे. फक्त १० रूपये एका बल्बसाठी या पद्धतीने द्यायचे असून उर्वरीत रक्कम ग्राहकाच्या वीज बिलातून दरमहा कपात केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही सुविधा फक्त घरगुती वीज मीटर धारकांसाठी आहे. व्यवसायीक वीज मीटरधारकांना मात्र १० बल्ब रोख स्वरूपातच घ्यावे लागणार आहेत. कसे राहणार हे बल्ब?४हे बल्ब केंद्र शासनाने तयार करवून घेतलेले असून त्यावर ‘डीईएलपी’ लिहिलेले राहणार आहे. प्रत्येकी सात वॉल्टचे हे बल्ब असून त्यांची किंमत सुमारे ४०० रूपये आहे. मात्र केंद्र शासनाने हा विशेष कार्यक्रम राबविला असल्याने ग्राहकांना प्रत्येकी १०० रूपये दराने बल्ब दिले जात आहेत. हे बल्ब ग्राहकांना घेता यावे यासाठी वीज विभागाच्या ३६ शाखा कार्यालय, नऊ उप विभागीय कार्यालय, वीज बिल संकलन केंद्रात उपलब्ध करवून दिले जातील. शिवाय गर्दीच्या ठिकाणांवरही स्टॉल्स लावून त्यांची विक्री केली जाणार आहे. या बल्बची तीन वर्षांची गॅरंटी राहणार असून एखादा बल्ब खराब निघाल्यास जिल्ह्यातील कोणत्याही केंद्रावर बल्ब खरेदी करतानाची पावती दाखवून ते परत करता येतील.केंद्र शासनाचा हा अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रम आहे. ग्राहकांनी बल्ब घेताना त्यावर ‘डीईएलपी’ बघून व पूर्ण खात्री करूनच बल्बची खरेदी करावी. कबीरदास चव्हाणअधीक्षक अभियंता, गोंदिया