शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

जिल्हावासीयांनो, मास्क लावणे अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आल्याचे दिसत असून, नवीन बाधितांची दररोजची आकडेवारी कमी झाली आहे. मात्र याचा अर्थ कोरोना ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आल्याचे दिसत असून, नवीन बाधितांची दररोजची आकडेवारी कमी झाली आहे. मात्र याचा अर्थ कोरोना पूर्णपणे गेला नसतानाही नागरिकांकडून कोरोनाविषयक उपाययोजनांना बगल दिली जात आहे. कित्येक नागरिक मास्क न लावता फिरताना दिसत आहेत. तर बाजार व अन्य ठिकाणांवरही शारीरिक अंतराचे पालन टा‌ळले जात आहे. हा प्रकार धोकादायक असल्याने आता खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हावासीयांना मास्क लावणे अनिवार्य असल्याचे आदेश काढले आहेत. अन्यथा १०० रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. तेव्हा प्रत्येकजण मास्क, शारीरिक अंतर तसेच सॅनिटायझर या तीन शस्त्रांचे काटेकोरपणे पालन करताना दिसत होते. मात्र दिवाळीनंतर कोरोनाच उद्रेक कमी झाला असून, जिल्ह्यात कधी ३ अंकांमध्ये नोंदविली जाणारी दररोजच्या कोरोना बाधितांची संख्या आता १ अंकी झाली आहे. शिवाय जिल्ह्यातील क्रियाशील रुग्णांची संख्या आजघडीला १०० च्या आत आली आहे. ही जिल्ह्यासाठी नक्कीच दिलासादायक बाब असली तरिही याचा अर्थ कोरोना पूर्णपणे गेला, असा होत नाही. कारण, आताही दररोज नवीन बाधितांची भर पडत असून, कोरोनामुळे मृतांची संख्याही वाढत चालली आहे. हे टाळता येणार नाही.

अशात जिल्हावासीयांनी आजही पूर्वीप्रमाणेच कोरोनाविषयक ३ शस्त्रांचे न विसरता पालन करण्याची गरज दिसून येत आहे. मात्र कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याचा अर्थ जिल्हावासी काही भलताच काढत आहेत. नेमकी हीच बाब हेरून व जिल्हावासीयांच्या या अतिरेकी वागणुकीला बघता जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी लागणार, असे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे मास्क हेच सर्वात प्रभावी शस्त्र ठरले असल्याने मास्कचा वापर अनिवार्य राहणार, असे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी आदेशातून कळविले आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित व्यक्ती तसेच आस्थापनांवर भारतीय दंड संहिता १८६० (४५) च्या कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे समजण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.

------------------------------

५०० ऐवजी आता १०० रुपयांचा दंड

मध्यंतरी कोरोनाचा उद्रेक असताना जिल्ह्यात मास्क न वापरता फिरणाऱ्यांवर ५०० रुपयांचा दंड ठोठावला जात होता. मात्र मध्यंतरी पालकमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीत हा दंड कमी करीत १०० रुपयांवर आणला आहे. त्यामुळे आता मास्क न वापरणाऱ्यांवर १०० रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. यामुळे नागरिकांनी दंडासाठी नाही, तर किमान आपल्या व पुढील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी तरी मास्क लावणे गरजेचे आहे.