शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जिल्ह्याला मिळाले आणखी १५८०० डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:26 IST

गोंदिया : लसींचा मोजकाच साठा असल्याने व तोही सोमवारी (दि. १२) संपणार असल्याने लसीकरणाला ब्रेक लागणार असे वाटत असताना ...

गोंदिया : लसींचा मोजकाच साठा असल्याने व तोही सोमवारी (दि. १२) संपणार असल्याने लसीकरणाला ब्रेक लागणार असे वाटत असताना सोमवारी सायंकाळी जिल्ह्याला आणखी १५८०० डोस मिळाले आहेत. हे संपूर्ण डोस कोव्हीशिल्डचे असून, आता लसीकरणातील अडचण सुटली आहे. अशात आता जिल्ह्यात पुन्हा जोमाने लसीकरण करता येणार आहे.

१६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक व १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे मात्र लसींचा पुरवठा कमी होत असल्याचे जाणवत आहे. सुरुवातील मोठ्या प्रमाणात मिळत असलेल्या लसींचा आता मोजकाच साठा येत असून १-२ दिवसांतच तो संपत असल्याने लसीकरणाला ब्रेक लागण्याची स्थिती निर्माण होते. असाच प्रकार सोमवारी घडला होता.

जिल्ह्यातील लसींचा साठा संपल्याने शुक्रवारी (दि. ९) जिल्ह्याला ९९२० कोव्हॅक्सिन लसींच्या डोसेसचा पुरवठा करण्यात आला. या साठ्यातून शनिवारी, रविवारी व सोमवारी लसीकरण करण्यात आल्यानंतर सोमवारी साठा पूर्णपणे संपला होता. अशात मंगळवारी लसीकरणाला ब्रेक लावावा लागणार, अशी स्थिती निर्माण झाली होती. एकीकडे शासनाकडून लसीकरणावर जोर दिला जात असतानाच दुसरीकडे लस नसल्याने लसीकरणात खंड पडण्याची पाळी आली होती. मात्र सोमवारी (दि. १२) सायंकाळी जिल्ह्याला कोव्हीशिल्डचे १५८०० डोस मिळाले आहेत. त्यामुळे आता आणखी काही दिवसांचा प्रश्न सुटला आहे.

----------------------------------------

आतापर्यंत मिळाले सुमारे २.२२ लाख डोस

१६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरूवात झाली असून तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्याला सुमारे २२२२६० डोस मिळाले आहेत. यात १ एप्रिल रोजी ९२९२० डोसेसचा सर्वात मोठा पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर आता मात्र मोजकेच डोसेस पाठविले जात असल्याने लसीकरणाला कधी ब्रेक लागेल हे सांगता येत नाही. मात्र आतापर्यंत तरी अशी स्थिती निर्माण झालेली नाही. साठा संपण्यापूर्वीच जिल्हयाला लसींचा पुरवठा केला जात असल्याचे दिसत असून असेच सोमवारीही घडले.

---------------------------

आता नागरिकांच्या पुढाकाराची गरज

अवघ्या देशातच पुन्हा एकदा कोरोना कहर करीत असून यंदा त्याचा प्रादुर्भाव मागील वर्षा कितीतरी पट जास्त दिसून येत आहे. परिणामी मृतांची संख्याही झपाट्याने वाढत असून जिल्ह्याचे त्याचे पडसाद दिसून आले आहेत. अशात शासनाने जास्तीतजास्त लसीकरणावर भर दिला आहे. लसीकरणाने कोरोनापासून सुरक्षितता मिळणार असल्याने नागरिकांना लस घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. मात्र त्यानंतरही जिल्ह्यात अद्याप कित्येकांनी लस घेतली नसल्याचे दिसते. आता कोरोना कहर बघता अशांनी स्वत: पुढे येऊन लस घेण्याची व स्वत:सह कुटुंबीयांना सुरक्षित करण्याची गरज आहे.