शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला मिळाले आणखी १५८०० डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:26 IST

गोंदिया : लसींचा मोजकाच साठा असल्याने व तोही सोमवारी (दि. १२) संपणार असल्याने लसीकरणाला ब्रेक लागणार असे वाटत असताना ...

गोंदिया : लसींचा मोजकाच साठा असल्याने व तोही सोमवारी (दि. १२) संपणार असल्याने लसीकरणाला ब्रेक लागणार असे वाटत असताना सोमवारी सायंकाळी जिल्ह्याला आणखी १५८०० डोस मिळाले आहेत. हे संपूर्ण डोस कोव्हीशिल्डचे असून, आता लसीकरणातील अडचण सुटली आहे. अशात आता जिल्ह्यात पुन्हा जोमाने लसीकरण करता येणार आहे.

१६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक व १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे मात्र लसींचा पुरवठा कमी होत असल्याचे जाणवत आहे. सुरुवातील मोठ्या प्रमाणात मिळत असलेल्या लसींचा आता मोजकाच साठा येत असून १-२ दिवसांतच तो संपत असल्याने लसीकरणाला ब्रेक लागण्याची स्थिती निर्माण होते. असाच प्रकार सोमवारी घडला होता.

जिल्ह्यातील लसींचा साठा संपल्याने शुक्रवारी (दि. ९) जिल्ह्याला ९९२० कोव्हॅक्सिन लसींच्या डोसेसचा पुरवठा करण्यात आला. या साठ्यातून शनिवारी, रविवारी व सोमवारी लसीकरण करण्यात आल्यानंतर सोमवारी साठा पूर्णपणे संपला होता. अशात मंगळवारी लसीकरणाला ब्रेक लावावा लागणार, अशी स्थिती निर्माण झाली होती. एकीकडे शासनाकडून लसीकरणावर जोर दिला जात असतानाच दुसरीकडे लस नसल्याने लसीकरणात खंड पडण्याची पाळी आली होती. मात्र सोमवारी (दि. १२) सायंकाळी जिल्ह्याला कोव्हीशिल्डचे १५८०० डोस मिळाले आहेत. त्यामुळे आता आणखी काही दिवसांचा प्रश्न सुटला आहे.

----------------------------------------

आतापर्यंत मिळाले सुमारे २.२२ लाख डोस

१६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरूवात झाली असून तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्याला सुमारे २२२२६० डोस मिळाले आहेत. यात १ एप्रिल रोजी ९२९२० डोसेसचा सर्वात मोठा पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर आता मात्र मोजकेच डोसेस पाठविले जात असल्याने लसीकरणाला कधी ब्रेक लागेल हे सांगता येत नाही. मात्र आतापर्यंत तरी अशी स्थिती निर्माण झालेली नाही. साठा संपण्यापूर्वीच जिल्हयाला लसींचा पुरवठा केला जात असल्याचे दिसत असून असेच सोमवारीही घडले.

---------------------------

आता नागरिकांच्या पुढाकाराची गरज

अवघ्या देशातच पुन्हा एकदा कोरोना कहर करीत असून यंदा त्याचा प्रादुर्भाव मागील वर्षा कितीतरी पट जास्त दिसून येत आहे. परिणामी मृतांची संख्याही झपाट्याने वाढत असून जिल्ह्याचे त्याचे पडसाद दिसून आले आहेत. अशात शासनाने जास्तीतजास्त लसीकरणावर भर दिला आहे. लसीकरणाने कोरोनापासून सुरक्षितता मिळणार असल्याने नागरिकांना लस घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. मात्र त्यानंतरही जिल्ह्यात अद्याप कित्येकांनी लस घेतली नसल्याचे दिसते. आता कोरोना कहर बघता अशांनी स्वत: पुढे येऊन लस घेण्याची व स्वत:सह कुटुंबीयांना सुरक्षित करण्याची गरज आहे.