शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

जिल्ह्याला मिळाले आणखी १५८०० डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 05:00 IST

१६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक व १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे मात्र लसींचा पुरवठा कमी होत असल्याचे जाणवत आहे. सुरुवातील मोठ्या प्रमाणात मिळत असलेल्या लसींचा आता मोजकाच साठा येत असून १-२ दिवसांतच तो संपत असल्याने लसीकरणाला ब्रेक लागण्याची स्थिती निर्माण होते.

ठळक मुद्देलसीकरणातील अडचण सुटली : कोव्हीशिल्डचे डोस मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  लसींचा मोजकाच साठा असल्याने व तोही सोमवारी (दि. १२) संपणार असल्याने लसीकरणाला ब्रेक लागणार असे वाटत असताना सोमवारी सायंकाळी जिल्ह्याला आणखी १५८०० डोस मिळाले आहेत. हे संपूर्ण डोस कोव्हीशिल्डचे असून, आता लसीकरणातील अडचण सुटली आहे. अशात आता जिल्ह्यात पुन्हा जोमाने लसीकरण करता येणार आहे. १६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक व १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे मात्र लसींचा पुरवठा कमी होत असल्याचे जाणवत आहे. सुरुवातील मोठ्या प्रमाणात मिळत असलेल्या लसींचा आता मोजकाच साठा येत असून १-२ दिवसांतच तो संपत असल्याने लसीकरणाला ब्रेक लागण्याची स्थिती निर्माण होते. असाच प्रकार सोमवारी घडला होता. जिल्ह्यातील लसींचा साठा संपल्याने शुक्रवारी (दि. ९) जिल्ह्याला ९९२० कोव्हॅक्सिन लसींच्या डोसेसचा पुरवठा करण्यात आला. या साठ्यातून शनिवारी, रविवारी व सोमवारी लसीकरण करण्यात आल्यानंतर सोमवारी साठा पूर्णपणे संपला होता. अशात मंगळवारी लसीकरणाला ब्रेक लावावा लागणार, अशी स्थिती निर्माण झाली होती.  एकीकडे शासनाकडून लसीकरणावर जोर दिला जात असतानाच दुसरीकडे लस नसल्याने लसीकरणात खंड पडण्याची पाळी आली होती. मात्र सोमवारी (दि. १२) सायंकाळी जिल्ह्याला कोव्हीशिल्डचे १५८०० डोस मिळाले आहेत. त्यामुळे आता आणखी काही दिवसांचा प्रश्न सुटला आहे. आतापर्यंत मिळाले सुमारे २.२२ लाख डोस १६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरूवात झाली असून तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्याला सुमारे २२२२६० डोस मिळाले आहेत. यात १ एप्रिल रोजी ९२९२० डोसेसचा सर्वात मोठा पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर आता मात्र मोजकेच डोसेस पाठविले जात असल्याने लसीकरणाला कधी ब्रेक लागेल हे सांगता येत नाही. मात्र आतापर्यंत तरी अशी स्थिती निर्माण झालेली नाही. साठा संपण्यापूर्वीच जिल्हयाला लसींचा पुरवठा केला जात असल्याचे दिसत असून असेच सोमवारीही घडले. आता नागरिकांच्या पुढाकाराची गरज अवघ्या देशातच पुन्हा एकदा कोरोना कहर करीत असून यंदा त्याचा प्रादुर्भाव मागील वर्षा कितीतरी पट जास्त दिसून येत आहे. परिणामी मृतांची संख्याही झपाट्याने वाढत असून जिल्ह्याचे त्याचे पडसाद दिसून आले आहेत. अशात शासनाने जास्तीतजास्त लसीकरणावर भर दिला आहे. लसीकरणाने कोरोनापासून सुरक्षितता मिळणार असल्याने नागरिकांना लस घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. मात्र त्यानंतरही जिल्ह्यात अद्याप कित्येकांनी लस घेतली नसल्याचे दिसते. आता कोरोना कहर बघता अशांनी स्वत: पुढे येऊन लस घेण्याची व स्वत:सह कुटुंबीयांना सुरक्षित करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस