शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

‘ग्राम उदय ते भारत उदय’साठी जिल्हा सज्ज

By admin | Updated: April 15, 2016 02:18 IST

केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाच्या निर्देशानुसार ग्राम उदय ते भारत उदय कार्यक्रम १४ ते २४ एप्रिलदरम्यान राबविण्यात येत आहे.

प्रत्येक दिवशी विशेष कार्य: व्हीएचएनएससीअंतर्गत विशेष कार्यक्रम गोंदिया : केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाच्या निर्देशानुसार ग्राम उदय ते भारत उदय कार्यक्रम १४ ते २४ एप्रिलदरम्यान राबविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात हे कार्यक्रम व्हीएचएनएससीच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दिवशी एक खास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाच्या निर्देशानुसार गोंदिया जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासून २४ एप्रिल पर्यंत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (वीएचएनएससी) अंतर्गत प्रत्येक गाव निहाय कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आयोजन करण्यात येत आहे. अभियान चालविण्यासाठी व नियोजनासाठी २० एप्रिलपासून गाव निहाय व्हीएचएनएससी ची बैठक ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. बैठकीत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्राम पंचायत सदस्य, शिक्षक, आंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचा समावेश आहे. कार्यक्रमांतर्गत २१ एप्रिल रोजी आरोग्य विषयक जनजागृतीसाठी सकाळी प्रभातफेरी काढणे, ग्रामसभेचे आयोजन करून विषयावर चर्चा करणे, गाव स्तरावर विविध विभागाच्या माध्यमातून प्राप्त निधीच्या माध्यमातून गावाचा विकासाचे नियोजन करणे, आरोग्य स्तरावर सुधारासाठी स्वच्छता, पाणीपुरवठा व स्वच्छतीसाठी प्रयत्न करणे, ग्रामीण विकासात महिलांचा सहभाग वाढविणे, गावात अनुसूचित जाती, जमाती, अपंग व मागास वर्गासाठी उपयुक्त प्रयत्न करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या सोबत २१ ते २४ एप्रिल दरम्यान शंभर टक्के गर्भवतींची नोंदणी, संस्थेतच प्रसूती,रक्त तपासणी, सर्व गटातील हिमोग्लोबीन तपासणी करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त रक्तदाब, मधुमेह, कर्करोग (स्तन कर्करोग, सर्विकल कर्करोग व इतर), तंबाखू नियंत्रण व तोंडाचा आजार या विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे. ३ ते ५ रक्तदान शिबिर, मोतियाबिंदू महिलांच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. सिकलसेल थैलेसेमिया चा पाठपुरावा करण्यात येणार आहे. आरजीजेएवाय शिबिर, आरबीएसके महिला लाभार्थी, रेफर महिला, महिला रोग निदान उपचार, ईएसआईएस अस्पताल में आॅपरेशन शिबिर, आशा व इतर महिलांची तपासणी तज्ज्ञांद्वारे करण्यात येईल. २२ ते २४ एप्रिल दरम्यान आयुष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ५-७ आयुष शिबिर आयोजित करणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)