शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

जिल्ह्यात २३ टक्के वीज गळती

By admin | Updated: August 20, 2016 00:49 IST

महागड्या वीजेचा सर्वांनाच फटका बसत असताना खुद्द वीज वितरण कंपनी वीज गळतीच्या समस्येने त्रस्त आहे.

वीज चोरीची समस्या गंभीर : मागील वर्षाच्या तुलनेत गळतीत घट कपिल केकत गोंदिया महागड्या वीजेचा सर्वांनाच फटका बसत असताना खुद्द वीज वितरण कंपनी वीज गळतीच्या समस्येने त्रस्त आहे. जिल्ह्यात सन २०१५-१६ या वर्षात २२.७३ टक्के वीज गळतीची नोंद करण्यात आली आहे. वीज गळतीसाठी अनेक कारणे असली तरी वीज चोरी हे त्यातील सर्वाधिक महत्वाचे कारण आहे. या आकडेवारीवरून वीज चोरीला आळा घालण्यात महावितरणला अपयश आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. वीजेची गळती म्हणजे थेट वीज कंपनीच्या मानगुटीवर येणारा विषय आहे. वीजेच्या गळतीसाठी ट्रान्समिशन, मीटर नादुरूस्ती, उपकरणांतील नादुरूस्ती व वीज चोरी अशी कारणे असतात. यात वीज चोरी हे कारण मात्र सर्वात गंभीर असून यापासून महावितरण कंपनीला सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. ट्रांसमिशन व मीटर-उपकरण नादुरूस्तीच्या कारणांवर तोडगा काढून महावितरणने त्यामध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे त्या कारणांनी होत असलेली वीज गळती बऱ्याच प्रमाणात बंद झाली आहे. त्यामुळेच गेल्यावर्षीच्या तुलनेत गळतीचे प्रमाण काही अंशी कमी करण्यात यश आले आहे. परिणामी सन २०१५-१६ मध्ये २२.७३ टक्के वीज गळतीची नोंद करण्यात आली आहे. यात लघुदाब वीज गळती ज्यावरून औद्योगिक, घरगुती, कृषी व व्यवसायिक कनेक्शन दिले जातात त्याची वीज गळती २६.४७ टक्के आहे. २०१४-१५ मध्ये लघुदाब वीज गळती २८.१५ टक्के होती व यंदा ती कमी असल्याचे यातून दिसून येते. ‘थेफ्ट ड्राईव्ह’चे चांगले परिणाम वीज चोरीच्या प्रकारावर आळा घालून वीज चोरट्यांकडून तेवढी रक्कम वसुल करता यावी यासाठी वीज वितरण कंपनीकडून वीज चोरट्यांविरोधात मोहीम राबविली जाते. सातत्याने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे सन २०१५-१६ मध्ये ८६ लाख रूपयांची वीज चोरी पकडण्यात आली आहे. यात भल्याभल्यांना दणका बसला आहे. मात्र ही मोहीम सातत्याने राबवून अनेक मोठ्या वीज चोरांना पकडण्याची हिंमत सदर पथकाने दाखविल्यास वीज गळतीचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी करण्यास मदत होणार आहे.