शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

जिल्हा ग्राहक न्यायमंचचा टाटा मोटर्सला दणका

By admin | Updated: August 15, 2015 01:46 IST

नवीन वाहन खरेदी केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच इंजिन गरम होवून गाडी बंद पडत होती.

उत्पादन दोष : एक लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशगोंदिया : नवीन वाहन खरेदी केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच इंजिन गरम होवून गाडी बंद पडत होती. वारंवार दुरूस्तीसाठी नेवूनही त्यातील दोष दूर होवू शकले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने टाटा मोटर्स कंपनीकडे वाहनात उत्पादन दोष असल्याचे सांगून नवीन वाहन देण्याची मागणी केली. मात्र मागणी फेटाळणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने चांगलात दणका देत वाहन बदलवून एक लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.सहाया आनंनधम क्रिष्णनम जॉन रा.अर्जुनी-मोरगाव असे तक्रारकर्तीचे नाव आहे. त्यांनी टाटा मोटर्स लि.च्या अधिकृत डिलर ए.के. गांधी कार नागपूर येथील टाटा व्हेंचर कार (एमएच ३५/पी-२१७८) चार लाख ६७ हजार ३८३ रूपयांना ८ जुलै २०११ रोजी विकत घेतली होती. मात्र अवघ्या दोन महिन्यानंतर सदर वाहनाचे इंजिन अतिशय गरम होत होते व वाहन चालताना अचानक बंद पडत होते. त्यामुळे सहाया जॉन यांनी ती कार अर्जुनी-मोरगाववरून नागपूर येथील टाटा मोटर्सच्या सर्व्हिस स्टेशनमध्ये नेले. त्यात सर्व दोष दूर करण्यात आल्याचे सांगून कार परत देण्यात आली. तसेच रिपेरिंग चार्ज म्हणून सहा हजार २५० रूपये घेण्यात आले. परंतु पुन्हा तीन दिवसांनंतर कारमध्ये पूर्वीचीच इंजिन गरम होणे व कार बंद पडण्याची समस्या निर्माण झाली. अनुभवी यांत्रिक व अभियंते यांच्याकडून अनेक प्रयत्न करूनही दोष दूर होवू शकले नाही. निर्माण होणे व इंजिन वाहनाच अत्यावश्यक मूलभूत अंग असतो. सदर दोष पुन्हापुन्हा निर्माण होणे व दुरूस्त न होणे, तसेच इंजिन योग्यरित्या काम करीत नसल्यामुळे त्यात उत्पादन दोष असावा, असे दिसून आले. हे उत्पादन दोष तक्रारकर्तीने उत्तमरित्या जॉब कार्डमध्ये तसेच नोंदवून सिद्ध केले. परंतु विरूद्ध पक्ष उत्पादन दोष असल्याचे मानण्यास तयार नव्हते. तसेच त्यांच्या तज्ज्ञांनुसार दोष नसल्याचा आपला लिखित जबाब न्यायमंचात दाखल केला. परंतु कारमध्ये उत्पादन दोष नसल्याचे ते सिद्ध करू शकले नाही. मात्र तक्रारकर्ती व तिचे वकील अ‍ॅड. एस.बी. राजनकर यांनी ६ जून २०१४ व १६ जून २०१४ रोजी पाठविलेल्या नोटिसमध्ये कारच्या इंजिनमध्ये दोष असून अनेक प्रयत्न करूनही तो दूर होवू शकला नाही, याकडे लक्ष वेधले. त्यामुळे टाटा मोटर्स त्याच कारचा सारखाच नवीन मॉडेल देण्यासाठी व नोंदणीसुद्धा करून देण्यासाठी पात्र आहे, असे न्यायमंचाचे मत झाले.जिल्हा तक्रार ग्राहक निवारण न्यायमंचाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य वर्षा पाटील यांनी प्रकरणाची कारणमिमांसा केली व सहाया जॉन यांची तक्रार मान्य केली. तसेच कारमध्ये उत्पादन दोष असून तो दोष दूर होणार नसल्यामुळे टाटा मोटर्स कंपनीने तक्रारकर्तीस नवीन गाडी बदलून द्यावे, नुकसान भरपाई म्हणून एक लाख रूपये द्यावे व तक्रारीच्या खर्चापोटी दहा हजार रूपये द्यावे तसेच सदर आदेशाचे पालन ३० दिवसांच्या आत करावे, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने दिला. (प्रतिनिधी)