शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेची उद्दिष्टपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST

खरीप आणि रब्बी हंगामात शेतकरी सर्वाधिक पीक कर्जाची उचल जिल्हा बँकेतून करीत असतात. या बँकेतून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया फारशी किचकट नसल्याने ही बँक शेतकऱ्यांना आपली वाटते. खरीप हंगामात पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेने सुरूवातीपासूनच आघाडी घेतली होती. ती कायम ठेवित उद्दिष्टापेक्षा अधिक पीक कर्जाचे वाटप केले आहे. नार्बाड आणि शासनाने यंदा जिल्हा बँकेला १३६ कोटी ६२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते.

ठळक मुद्देराष्ट्रीयीकृत बँका उद्दिष्टापासून दूर : ४१ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक अडचण जावू नये यासाठी शेतकऱ्यांना बँकांच्या माध्यमातून पीक कर्जाचे वाटप केले जाते. यंदा गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिलेले १३६ कोटी ६२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट या बँकेने पूर्ण केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँका अद्यापही पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापासून बऱ्याच दूर असल्याचे चित्र आहे.खरीप आणि रब्बी हंगामात शेतकरी सर्वाधिक पीक कर्जाची उचल जिल्हा बँकेतून करीत असतात. या बँकेतून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया फारशी किचकट नसल्याने ही बँक शेतकऱ्यांना आपली वाटते. खरीप हंगामात पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेने सुरूवातीपासूनच आघाडी घेतली होती. ती कायम ठेवित उद्दिष्टापेक्षा अधिक पीक कर्जाचे वाटप केले आहे. नार्बाड आणि शासनाने यंदा जिल्हा बँकेला १३६ कोटी ६२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी जिल्हा बँकेने आतापर्यंत एकूण १३६ कोटी ६४ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करीत उद्दिष्टपूर्ती केली आहे.ग्रामीण बँकांना २८ कोटी आठ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी २५ कोटी २० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँकांना १०५ कोटी ३० लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी ३५ कोटी २८ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे.राष्ट्रीयकृत बँका पीक कर्जाच्या उद्दिष्टापासून अद्यापही बऱ्याच लांब असल्याने यंदाच्या हंगामात या बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करणे कठीण असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीयकृत बँकांमधून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया फारच किचकट आहे. त्यामुळे बरेच शेतकरी सुद्धा या बँकामधून पीक कर्जाची उचल करणे टाळत असल्याचे चित्र आहे.आतापर्यंत जिल्हा बँकेतून शेतकऱ्यांनी सर्वाधिक पीक कर्जाची उचल केली आहे. तीन्ही बँकांनी मिळून आतापर्यंत एकूण ४१ हजार शेतकºयांना १९७ कोटी १३ लाख ५९ हजार रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज