शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेची उद्दिष्टपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST

खरीप आणि रब्बी हंगामात शेतकरी सर्वाधिक पीक कर्जाची उचल जिल्हा बँकेतून करीत असतात. या बँकेतून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया फारशी किचकट नसल्याने ही बँक शेतकऱ्यांना आपली वाटते. खरीप हंगामात पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेने सुरूवातीपासूनच आघाडी घेतली होती. ती कायम ठेवित उद्दिष्टापेक्षा अधिक पीक कर्जाचे वाटप केले आहे. नार्बाड आणि शासनाने यंदा जिल्हा बँकेला १३६ कोटी ६२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते.

ठळक मुद्देराष्ट्रीयीकृत बँका उद्दिष्टापासून दूर : ४१ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक अडचण जावू नये यासाठी शेतकऱ्यांना बँकांच्या माध्यमातून पीक कर्जाचे वाटप केले जाते. यंदा गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिलेले १३६ कोटी ६२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट या बँकेने पूर्ण केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँका अद्यापही पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापासून बऱ्याच दूर असल्याचे चित्र आहे.खरीप आणि रब्बी हंगामात शेतकरी सर्वाधिक पीक कर्जाची उचल जिल्हा बँकेतून करीत असतात. या बँकेतून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया फारशी किचकट नसल्याने ही बँक शेतकऱ्यांना आपली वाटते. खरीप हंगामात पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेने सुरूवातीपासूनच आघाडी घेतली होती. ती कायम ठेवित उद्दिष्टापेक्षा अधिक पीक कर्जाचे वाटप केले आहे. नार्बाड आणि शासनाने यंदा जिल्हा बँकेला १३६ कोटी ६२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी जिल्हा बँकेने आतापर्यंत एकूण १३६ कोटी ६४ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करीत उद्दिष्टपूर्ती केली आहे.ग्रामीण बँकांना २८ कोटी आठ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी २५ कोटी २० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँकांना १०५ कोटी ३० लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी ३५ कोटी २८ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे.राष्ट्रीयकृत बँका पीक कर्जाच्या उद्दिष्टापासून अद्यापही बऱ्याच लांब असल्याने यंदाच्या हंगामात या बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करणे कठीण असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीयकृत बँकांमधून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया फारच किचकट आहे. त्यामुळे बरेच शेतकरी सुद्धा या बँकामधून पीक कर्जाची उचल करणे टाळत असल्याचे चित्र आहे.आतापर्यंत जिल्हा बँकेतून शेतकऱ्यांनी सर्वाधिक पीक कर्जाची उचल केली आहे. तीन्ही बँकांनी मिळून आतापर्यंत एकूण ४१ हजार शेतकºयांना १९७ कोटी १३ लाख ५९ हजार रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज