शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

फलोत्पादनात जिल्हा माघारला

By admin | Updated: May 5, 2017 01:40 IST

जिल्ह्यातील शेतकरी सततच्या नापिकीमुळे संकटात असतानाही अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचा कल धानपिकांकडेच असल्याचे दिसून येते

केवळ १५४ लाभार्थी : फळ पिकांकडे शेतकऱ्यांची अनास्था गोंदिया : जिल्ह्यातील शेतकरी सततच्या नापिकीमुळे संकटात असतानाही अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचा कल धानपिकांकडेच असल्याचे दिसून येते. पारंपरिक शेतीला बगल देत फळपिकांचे उत्पादन घेवून शेतकऱ्यांनी आपले जीवनमान सुधारावे, असा शासनाचा हेतू आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकरी फलोत्पादनात अनुत्सुक असल्याने जिल्हा फलोत्पादनात माघारल्याचे दिसून येते. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील केवळ १५४ शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. त्यातही सुटी फुले उत्पादनाचा लाभ केवळ तीन शेतकऱ्यांनी घेतला. तर मसाला पिके, हळद व सुकलेली मिरची याचा लाभ जिल्हाभरातील ७७ शेतकऱ्यांनी घेतला. भाजीपाला व फळपिकांसाठी मल्चिंगचा लाभ ६५ शेतकऱ्यांना मिळाला. तर पॅक हाऊसचा लाभ नऊ शेतकऱ्यांनी घेतला. याशिवाय मागील आर्थिक वर्षात सामूहिक शेततळे, संरक्षित शेती, हरितगृह, शेडनेड हाऊस, हरितगृहामधील निविष्ठा व लागवड साहित्य आदींचा लाभच शेतकऱ्यांनी घेतला नसल्याचे समजते. यावरून फलोत्पानात शेतकऱ्यांची अनास्था असल्याचेच दिसून येते. विशेष म्हणजे पॅक हाऊसचा लाभ ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना घेता येतो. यात दोन ते चार लाखापर्यंतची सदर योजना असून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दिले जाते. तर मल्चिंगचे अनुदान शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १६ हजार रूपये याप्रमाणे दिले जाते. मसाला पिकांवर हेक्टरी १२ हजार रूपये अनुदान दिले जाते. तर सुटी फुलांवर हेक्टरी १० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. (प्रतिनिधी) अनुदान सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम अभियानांतर्गत पॅक हाऊस सोडून इतर अनुदान संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे येथून सरसरट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गाच्या प्रस्तावांनुसार त्यांना अनुदान मंजूर केला जातो. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सदर अभियानांतर्गत ३१.१० लाखांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.